शेत जमिनीतील माती परिक्षणाव्दारे जमिनीतील अन्नद्रव्यांचे प्रमाण जाणुन घेणे व त्यानुसार पुढील हंगामात घेतल्या जाणार्या पिकांसाठी खतमात्रांची शिफारस करणे व त्यानुसार खतांचे प्रमाण निश्चित करणे आणि त्यांचा संतुलित व कार्यक्षम वापर करणे, या बाबींचा अवलंब केल्यास खतांच्या समतोल वापरास व एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनास चालना मिळेल. या सर्व बाबींचा विचार करुन सन 2015-16 पासून राज्यात मृद आरोग्य पत्रिका योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे.
यामध्ये सर्व शेतकर्यांना प्रत्येक 2 वर्षांनी त्याच्या शेतजमिनीची मृद आरोग्य पत्रिका उपलब्ध करुन देणे व मृद आरोग्य पत्रिकेनुसार खताच्या वापरास प्रोत्साहन देणे हा या योजनेचा प्रमुख उद्देश आहे. या योजनेची प्रथम सायकल माहे मार्च 2017 मध्ये पूर्ण झालेली आहे. प्रथम सायकलमध्ये राज्यातील सर्व शेतकर्यांना जमिन आरोग्य पत्रिका वितरीत करण्यात आलेल्या आहेत. आता सन 2017-18 पासून या योजनेची दुसरी सायकल माहे एप्रिल 2017 पासून सुरु होत आहे.पहिल्या सायकलनुसार आताही शेतकर्यांना जमिन आरोग्य पत्रिकेच्या माध्यमातुन त्यांच्या शेतजमिनीची रासायनिक गुणधर्म स्थिती, प्रमुख अन्नद्रव्यांची पातळी व सुक्ष्म मुलद्रव्य कमतरता स्थितीची माहिती देण्यात येणार आहे. सदर योजनेच्या अंमलबजावणीमध्ये केंद्र शासनाचा 60 टक्के व राज्य शासनाचा 40 टक्के आर्थिक सहभाग राहणार आहे.
योजनेचा उद्देश ः
(अ) रासायनिक खतांचा अनिर्बंध वापर कमी करुन मृद
तपासणीवर आधारित तसेच अन्नद्रव्यांच्या कमतरतेनुसार खतांच्या संतुलित व परिणामकारक वापरास प्रोत्साहन देणे.
(ब) मृद आरोग्य मृद आरोग्य पत्रिका योजना सुधारण्यासाठी तसेच मुलद्रव्यांची परिणामकारकता वाढविण्यासाठी जेेविक खते, सेंद्रीय खते, गांडूळ खत, निंबोळी/ सल्फर आच्छादित युरियासारख्या संथगतीने नत्र पुरवठा करणार्या खतांच्या वापरास प्रोत्साहन देणे.
(क) एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनाद्वारे पिकांच्या
उत्पादकतेत वाढ करणे.
(ड) समस्याग्रस्त जमिनीमध्ये भूसुधारकांचा वापर करुन
जमिनीच्या उत्पादकतेत वाढ करणे.
- राज्यातील 34 जिल्हयांमध्ये योजनेची प्रभावी अंमलबजावणी या योजनेंतर्गत राज्यातील सर्व शेतकर्यांना लाभ देण्यात येणार असून गावांतील लागवडीलायक क्षेत्रामधून बागायत व जिरायत क्षेत्रामधून खालीलप्रमाणे मृद नमूने काढण्यात येणार आहेत.
अ) बागायत क्षेत्रामधून सिमांतिक व लहान शेतकर्यांकरीता : प्रत्येक 2.5 हेक्टर परिघ क्षेत्रासाठी 1 मृद नमुना, अर्ध-मध्यम, मध्यम व मोठया शेतकर्यांसाठी प्रत्येकी 1 मृद नमुना.
ब) जिरायत क्षेत्रामधून सिमांतिक, लहान, अर्ध-मध्यम व मध्यम शेतकर्यांकरीता : प्रत्येक 10 हेक्टर परिघ क्षेत्रासाठी 1 मृद नमुना.
योजनेचे स्वरुप ः क्षेत्रिय पातळीवर कार्यरत असलेल्या कृषि विभागाच्या यंत्रणेमार्फत मृद नमूने काढले जातात व विश्लेषणासाठी मृद चाचणी प्रयोगशाळेत पाठविण्यात येतात. मृद चाचणी प्रयोगशाळेत मृद नमूना प्राप्त झाल्यानंतर विश्लेषनासाठी मृद नमूना तयार करण्यात येतो. मृद नमूना तयार झाल्यानंतर पुढील घटकांसाठी मृद नमून्यांची तपासणी प्रयोगशाळेत केली जाते. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार पुढीलप्रमाणे एकूण 12 घटकांची विहीत पध्दतीने तपासणी करण्यात येते.
अ) जमिनीचा सामू (कि) व क्षारता (एउ)
ब) सेंद्रिय कर्ब, उपलब्ध नत्र, स्फुरद, पालाश, गंधक
क) सूक्ष्ममूलद्रव्ये ः उपलब्ध जस्त, तांबे, लोह, मंगल, बोरॉन मद़ृ नमन्ुयाचीं प्रयागेशाळते तपासणी केल्यानतंर घटकनिहाय आलेली वाचन केंद्र शासनाने विकसित केलल्ेया सगंणक प्रणालीमध्ये भरली जातात व त्याआधारे जमीन आराग्ेयपत्रिका तयार हाते. जमीन आराग्ेयपत्रिकेमध्ये विविध पिकासांठी विद्यापिठाच्ंया शिफारसीनसुार खतमात्रा दण्ेयात यतेात.
योजनेची अंमलबजावणी ः
योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याकरीता जिल्हास्तरावर कार्यकारी समिती गठीत करण्यात आलेली आहे. या समितीच्या माध्यमातून योजनेचे संनियंत्रण सुध्दा करण्यात येते. सन 2017-18 मध्ये एकूण 13.12 लाख मृद नमूने काढणे व तपासणीचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे. तसेच या वर्षी एकूण 67.64 लाख मृद आरोग्य पत्रिकेचे वितरण शेतकर्यांना करण्यात येणार आहे