ज्वारीची लागवड चार्यासाठी केली जाते. ज्वारीचा मुख्य फायदा म्हणजे प्रतिकूल परिस्थितीत ती सुप्तावस्थेत राहते आणि कडक अवर्षणानंतर अल्पावधीत वाढू शकते. वाढणारा शेंड्याचा कोंब काढल्याने पिकाची अवर्षणाला तोंड देण्याची क्षमता कमी होते. ज्वारीचे पीक बर्याच प्रकारच्या जमिनींवर येऊ शकते. जमिनीनुसार वेगवेगळ्या जाती लावल्या जातात. पाण्याचा निचरा चांगला होणे मात्र जरुरीचे असते.
ज्वारीची मुळे मातीत खोल जातात व खालच्या थरातून पाणी शोषून घेऊ शकतात. या पिकाला जमिनीत सोडिअम कार्बोनेटचे क्षार असले तरी चालते. खाट्या ठेवलेल्या काळ्या जमिनीत खत घालण्याची जरूर नसते. शिंबीवर्गीय पिकाबरोबर फेरपालट केला असता मातीतील अन्नद्रव्ये वाढतात. चारा व मुरघासासाठी बर्याच वेळा चवळीसार‘या शिंबीवर्गीय पिकाबरोबर लावतात. चार्यासाठी ज्वारी लावताना बी दाट पेरले जाते. त्यामुळे खोडे खूप उंच ( 15 फुटांपर्यंत) वाढतात. उन्हाळ्यात विहिरीच्या पाण्यावर चार्यासाठी ज्वारी लावतात. पीक फुलावर आल्यावर ताटे कापून ती ओली वैरण म्हणून किंवा मुरघास करून गुरांना खायला घालतात. फुलावर येण्यापूर्वी ताटे गुरांना खाऊ घातल्यास त्यातील धुरोन या विषारी पदार्थाुळे विषबाधा होऊ शकते. कडबा उन्हात वाळवल्याने अथवा ओल्या वैरणीचा मुरघास केल्याने अल्प प्रमाणातील धुरीनचे प्रमाण नाहीसे होते. बाजरी किंवा भातापेक्षा ज्वारीची ताटे अधिक सकस असतात. महाराष्ट्रात वैरणीसाठी खरिपात निळवा व उतावळी,रब्बीत दगडी व मालदांडी आणि उन्हाळ्यात हंडी व काळबोंडी या जाती लावतात. या सर्व जाती पेरल्यानंतर 60 ते 70 दिवसात फुलावर येतात. धान्य काढून घेतल्यानंतर राहिलेली ज्वारीची ताटे व नंतरची नवी फूट हिवाळ्यात गुरांना चांगला चारा पुरवते. जमिनीची सुपीकता व पावसाप्रमाणे ज्वारीच्या गोड जातीपासून 25000 ते 75000 कि. प्रती हेक्टरी हिरवा चारा मिळतो.
बाजरी
बाजरीला कोरडी हवा व कमी पाऊस लागतो. हलक्या जमिनीत व कमी पाण्यात हे पीक घेता येते. कमी पावसाच्या प्रदेशात जिथे ज्वारी, मका येऊ शकत नाही, तिथे बाजरी लावता येते. चार्यासाठी लागवड करावयाची असेल तर 500 मि.मी. पाऊस आवश्यक असतो. बाजरीचे पीक पुष्कळ प्रकारच्या जमिनींवर लावता येते. हे पीक अतिशय आम्लयुक्त जमिनीवर वाढते. पिकाची क्षार सहन करण्याची क्षमता चांगली आहे. सिंधमध्ये खार्या जमिनी सुधारण्यासाठी बाजरी लावतात. पाण्याचा निचरा चांगला होणार्या सुपीक जमिनीवर पिकाची उत्तम वाढ होते. उशिरा पक्व होणारी बाजरीची जात चांगली समजली जाते. कारण तिच्यावर पाला जास्त असतो. चार्यासाठी बियाणे दाटीने पेरतात. त्यामुळे तणे दबली जातात. हिरव्या चार्यासाठी 6 ते 7 आठवड्यांच्या अंतराने कापणी करता येते. पीक फुलोर्यावर आल्यावर कापणी करतात. यापासून हेक्टरी 25,000 ते 30,000 कि. ओली वैरण मिळते. बाजरीचा मुरघास करता येतो. फुले आल्यावर 3 आठवड्यांनी कापणी करून मुरघास करतात. चार्यासाठी बहुधा मोठ्या दाण्यांचे प्रकार लावतात. महाराष्ट्र कृषी विद्यापीठाने भरपूर उंच वाढणारा व वर्षातून दोन वेळा चार्याचे उत्पादन देऊन धान्यही मिळू शकेल, असा बाजरीचा र?कार विकसित केला आहे. चार्याचे पहिले उत्पादन पेरणीपासून अवघ्या 50 ते 55 दिवसांत हाती येते. त्यावेळी हेक्टरी 50-75 टन ओला चारा मिळतो. त्यानंतर 50 दिवसांनी ओल्या चार्यासाठी पुन्हा कापणी करता येते. हेक्टरी 30 ते 40 टन चारा मिळतो. ओल्या चार्यासाठी कापणी न केल्यास हेक्टरी 20-25 क्विंटल बाजरी व वैरण मिळते. पंजाब, गुजरात,तामिळनाडू, आंध‘ प्रदेश या राज्यांतून पावसाळी हंगामात चार्यासाठी बाजरी लावली जाते. जनावरे व कोंबड्यांचे खाद्य म्हणून बाजरीचा उपयोग करतात. बाजरीच्या दाण्यांध्ये 12.4% पाणी, 11.6% प्रथिने, 5% स्निग्ध पदार्थ, 67.1% कर्बोदके, 1.2 %तंतू आणि 2.7 % खनिजे असतात. गुजरातेत धान्य व हिरवी ताटे दुभत्या जनावरांना खाऊ घालतात. हिरव्या चार्यात प्रथिनांचे प्रमाण 11% असते.