प्रतिनिधी/ पालघर
आजकाल प्लास्टीकचा अमर्यादित वापर हा सर्वत्र प्रदुर्षणास कारणीभूत ठरत आहे. जागतिक पातळीवर याच्या पुनर्वापर आणि पर्यायावर काम सुरु आहे. आपल्याकडे काही शेतकरी देशी जुगाड वापरून शेतीत विविध प्रयोग करत असतात. ज्यामुळे शेतातील कष्टाची कामे सोपी होतात. असेच एक प्रयोगशील शेतकरी कोकणात आहेत ज्यांनी प्लास्टिकचा वापर हा सेंद्रिय शेतीसाठी केला आहे.
सेंद्रिय शेती आणि प्लास्टिक दोन्ही विरुद्ध टोकाचे विषय, परंतु आशिष समर्थ या तरुण शेतकऱ्याने या दोघांची योग्य सांगड घालत आपल्या शेतीत अमुलाग्र बदल घडविला आहे.
रुईया अॅग्रो फार्म गाव अवांधे. ता. वाडा. जि. पालघर. येथील आशिष समर्थ हा तरुण शेतकरी गेली अनेक वर्ष सेंद्रिय शेती करत आहे. आणि सेंद्रिय शेती हाच मुळी ध्यास. ते आपल्या शेतात सेंद्रिय शेतीसाठी. गांडूळ खत , शेणखत, कंपोस्ट खत, शेणाची स्लरी, अमृत पाणी इत्यादी. गोष्टींचा वापर सेंद्रिय घटक महणुन उपयोगात आणतात, तेथे वेगवेगळी पिके ही हंगामानुसार घेतली जातात. उदा.. टोमॅटो , काकडी, कलिंगड, खरबूज, स्ट्रॉबेरी, वांगी, भेंडी. यासाठी आधुनिक पद्धतीचा उपयोग केला जातो. जसे ठिबक संच. प्लास्टिक मल्चिंग पेपरचा उपयोग फारच उपयुक्त ठरतो.
पिकांसाठी गांडूळ खत, शेणखत, एकदा जमिनीत टाकता येते. पण प्लास्टिक मल्चिंगवर असलेल्या उभ्या पिकात कसे द्यायचे. गाळून ड्रीपमधून देणे योग्य नाही. माणसांकडवी ते पिकांना देणे अधिक श्रमाचे, वेळखाऊ, व न परवडणारे व ते योग्य प्रमाणात पडेल का हा यक्ष प्रश्न . शेणाची स्लरी कशी देता येईल यासाठी विचार करण्यास सुरावत केली. आपण जेवण्याच्या पंक्तीला बसलो की पाणी वाढणारा आपल्याला न विचारता जसे आपला पाण्याचा ग्लास भरतो. अशाच एका कार्यक्रमा ठिकाणी जेवणाच्या पंक्तीला गेले असता
त्याच वेळेस पाण्याचा ग्लास गळका निघाला सर्व पाणी जमिनीत झिरपून गेली. तेथेच कल्पना सुचली. टाकाऊ पाण्याच्या बाटलीचा वापर यासाठी करायचा .
पाणी पिऊन उकिरड्यावर टाकलेल्या पाण्याच्या रिकाम्या बाटल्या हॉटेल चालकास पैसे देऊन. टेम्पो भाडे करुन आणल्या. बाटलीचा तळाचा भाग कापून त्यात कार्व्हीची काडी आरपार नेली. त्यात चार/ पाच खडी टाकल्या.व बाटलीचा तोंडा कडील भाग जमिनीत रोवला व त्यात शेणाची स्लरी टाकली. ती स्लरी जमिनीत जायला 1 मिनिट एवढा कालावधी लागला. आणी हेच तर हवे होते. शेणाची स्लरी उभ्या पिकात हळू हळू जाणे अपेक्षित होते. ते या टाकाऊ प्लास्टिक बॉटलचा उपयोग करून साध्य करता आले. वेळेची बचत.. श्रम फार वाचले. योग्य प्रमाणात देणे सोपे झाले.. त्यांचे येवढेच काम आहे की स्लरी ही प्लास्टिक बॉटल भरून टाकायची जेवण्याच्या पंक्तीत पाणी वाढतो त्याप्रमाणे. या स्लरीचा उपयोग सतत 8 दिवसाने पिकास देत असल्यामुळे. जमिनीची सुपीकता वाढते. आरोग्य उत्तम राहते. त्याचप्रमाणे सेंद्रिय शेतीसाठी नवी प्रेरणा, ऊर्जा व आनंद काम करण्यास मिळत आहे..