मका
ज्वारीनंतर मक्याची लागवड चार्यासाठी मोठ्या प्रमाणावर केली जाते. महाराष्ट्रात सर्वत्र मका लावला जातो. पण गुजरातमधील पंचमहाल जिल्ह्यात याची विशेष लागवड आहे. 25 सेंटिमीटरपासून 500 सें.मी.पर्यंतच्या पर्जन्यमानाच्या प्रदेशात मक्याची लागवड केली जाते. परंतु वाढीच्या काळात 50 ते 70 सें.मी. पाऊस पिकाला पोषक असतो. हे मुख्यत: खरीप हंगामातील पीक आहे पण कडाक्याची थंडी नसलेल्या प्रदेशात विहिरीच्या किंवा कालव्याच्या पाण्यावर वर्षभर मक्याची लागवड करता येते. चांगल्या निचर्याच्या खोल व सुपीक जमिनीत मक्याचे पीक चांगलेयेते. परंतु चांगल्या निचर्याच्या खोल,भारी पासून हलक्या रेताड कोणत्याही जमिनीत मक्याची लागवड करता येते.
मक्याच्या खरीप पिकाची पेरणी पावसाच्या पहिल्या सरी पडल्यावर करतात. महाराष्ट्रात वैरणीसाठी उन्हाळी मका मार्च-एपिलमध्ये पेरतात. वैरणीच्या पिकासाठी बी फोकून पेरण्याची पद्धती पुष्कळ ठिकाणी प्रचलित आहे. वैरणीच्या पिकासाठी हेक्टरी 35-40 कि.बियाणे लागते. मक्याच्या रब्बी व उन्हाळी पिकाला पाणी द्यावे लागते. जमिनीच्या मगदुराप्रमाणे 5-10 पाण्याच्या पाळ्या द्याव्या लागतात. पावसाने ताण दिल्यास खरीप पिकाला पाणी द्यावे लागते. मक्याची काढणी दाणे, वैरण आणि मुरघास या तीन गोष्टींसाठी करतात. सर्वसाधारणपणे मक्याचे पीक पेरणीपासून 80 ते 100 दिवसांत तयार होते. वैरणीसाठी पिकाची कापणी पीक फुलावर येण्याच्या सु ारात केली जाते. मुरघासासाठी कणसातील दाणे नख जाण्याइतपत घट्ट होऊ लागल्यावर पीक कापले जाते. दाण्यांसाठी कणसे कापून घेतल्यावर ताबडतोब झाडे कापून जनावरांना खाऊ घालतात. ज्वारी किंवा बाजरीप्रमाणे मक्याच्या झाडात विषारी अन्नघटक नसतात, त्यामुळे मक्याची वैरण कोणत्याही अवस्थेत कापून जनावरांना खाऊ घालता येते. हिवाळी व उन्हाळी पिकाचे उत्पादन पावसाळी पिकापेक्षा जास्त असते. कारण पावसाळी पिकाला रोग व किडींचा जास्त प्रादूर्भात होतो. साधारणपणे मक्याचे 85% पीक खरीप हंगामात व काही ठिकाणी उन्हाळी हंगामात घेतले जाते. या पिकाच्या रब्बी हंगामातील लागवडीचा विशेष अभ्यास केला जात आहे. महाराष्ट्राच्या काही भागात रब्बी पीक जास्त फायदेशीर होऊ शकेल, असे आढळून आले आहे. महाराष्ट्र कृषी विद्यापीठाने ‘आफि‘कन टॉल’ हा लुसलुशीत वैरणीचा र?कार शोधून काढला आहे. 60 ते 70 दिवसांत वैरणीचे पीक तयार होते. हेक्टरी 60 ते 70 क्विंटल हिरव्या वैरणीचे उत्पन्न मिळते. भारतातील मक्याच्या दाण्यात जलांश 14.9%,प‘थिने 11.1%,स्निग्ध पदार्थ 3.6%, कार्बोहायड्रेट 66.2%, तंतू 2.7% आणि खनिज पदार्थ 1.4% असतात. मका हिरवा चारा म्हणून जनावरांना देतात. याची ताटे गुरांना उत्कृष्ट आहार आहे. शिवाय मक्याचा मुरघास चांगला होतो. गुरेढोरे, कोंबड्या आणि सर्व पाळीव प्राण्यांसाठी मका हा उत्कृष्ट आहार आहे. चार्याची गुणवत्ता सुधारण्यासाठी मक्याबरोबर चवळी लावता येते. मक्याचा उपयोग जनावरांचे खाद्य व हिरवा चारा या स्वरूपात मोठ्या प्रमाणात केला जातो. भारतात 80 ते 90 % मक्याचे उत्पादन मनुष्याच्या अन्नासाठी केले जाते. अमेरिकेच्या संयुक्त संस्थानात व युरोपातील अनेक देशांत मक्याची लागवड बहुतांशी मांसोत्पादक जनावरे, दुभती जनावरे, घोडे, कोंबड्या यांचे खाद्य म्हणून केली जाते.
नाचणी, नागली
नाचणीचे पीक साधारणपणे अतिवृष्टीच्या प्रदेशात घेतले जात असले तरी कमी पावसाच्या प्रदेशात नाचणी लावता येईल. आफ्रिकेत कमी पाऊस पडणार्या प्रदेशात बर्याच वेळा मका व ज्वारीबरोबर नाचणी पेरतात. पाऊस नेहमीप्रमाणे वेळेवर पडला नाही तर निदान नाचणीचे पीक तरी मिळू शकते. पाऊस थोडा थोडा पण जास्त काळ पडत राहिला तर 130 मि.मी. पावसावर पीक येऊ शकते. 970 मि.मी.पाऊस असल्यास पीक चांगले येते. सुरुवातीच्या काळात अवर्षण पडले तरी पीक ते सहन करते. पाऊस पडल्यानंतर पिकाची वाढ जोाने होते. रत्नागिरी व नाशिक जिल्ह्यात नाचणी मु‘यत: लावली जाते. भाताप्रमाणे रोपे तयार करून लावणी करतात. पीक दगडगोट्यांच्या जमिनीवर लावता येते पण सुपीक जमिनीवर जेव्हा पीक घेतले जाते तेव्हा भरपूर उत्पन्न येते. पिकाची वाढ 4 ते 5 महिन्यांत पूर्ण होते. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये कापणी करतात. नाचणीवर कीड क्वचित पडते, पण कणसे कोवळी असताना पक्षी नाश करू शकतात. बी लहान असते, ते लवकर वाळते. त्यामुळे हे धान्य कीटकनाशके न वापरता दीर्घकाळ साठवता येते. याला दुष्काळी पीक म्हणतात. केनिया, टांझानियात नव्याने तयार केलेल्या शेतजमिनीवर हे पीक प्रथम लावतात. ओला चारा गुरांना खायला देतात. वैरणीचे बारीक तुकडे भुसाबरोबर जनावरांना देतात. नाचणीचा मुरघास करता येतो.