शेतकरी असो वा नोकरदार किंवा व्यापारी या सर्वांच्याच आयुष्यात २०-२५ वर्षांपूर्वी पोस्ट ऑफिस हा एक महत्वाचा घटक होता. याच पोस्ट ऑफिसची आज रोजी सुरुवात झाली होती. ९ ऑक्टोबर १८७४ मध्ये रोजी स्वित्झर्लंडमधील बर्न येथे ‘युनिव्हर्सल पोस्टल युनियन’ची स्थापना करण्यात आली. ही घटना दळण-वळणाची जागतिक क्रांती मानली जाते. या दिवसाची आठवण म्हणून जागतिक टपाल दिन साजरा केला जातो. भारतात १ ऑक्टोबर १८५४ या दिवशी भारतीय पोस्ट ऑफिसची स्थापना झाली. स्वातंत्राच्या वेळी २३३४४ टपाल घर असलेल्या खात्याची आज देशात १ लाख ५५ हजार ३३३ पोस्ट ऑफिस आहेत. माहिती तंत्रज्ञानाच्या युगातही हे ऑफिसेस आपल्या नवनवीन उपक्रमामुळे अस्तित्व टिकवून आहेत.
प्राचीन काळापासून एकमेकांशी संपर्क साधण्यासाठी पत्र पाठविणे हाच पर्याय वापरला जात असे. हे पत्र कधी पक्षांमार्फत तर कधी दूतामार्फत पाठविले जात असे. दोन राजे एकमेकांशी संपर्क साधण्यासाठी हाच पर्याय वापरत, किंतु आजच्याच दिवशी ९ ऑक्टोबर १८७४ मध्ये रोजी स्वित्झर्लंडमधील बर्न येथे ‘युनिव्हर्सल पोस्टल युनियन’ची स्थापना झाली आणि एका नवीन क्रांतीला सुरुवात झाली.
सध्याच्या टपालव्यवस्थेची सुरवात सतराव्या शतकात इस्ट इंडिया कंपनीच्या काळात झाली. १६८८ मध्ये मुंबई आणि मद्रास इथे कंपनी पोस्टची कार्यालये स्थापन झाली. मात्र त्याद्वारे केवळ कंपनीच्या टपालाचीच ने-आण होई. वॉर्न हेस्टिंग्ज बंगाल प्रांताचा गव्हर्नर असताना आणि मुंबई आणि मद्रास प्रांताचे देखरेखीचे अधिकार त्यांच्याकडे असताना सन १७७४ मध्ये टपालसेवा जनतेसाठी खुली करण्यात आली. पोस्टमास्टर जनरलची प्रथमच नियुक्ती करण्यात आली आणि टपालसेवेसाठी पैसे भरल्याचा पुरावा म्हणून धातूची टोकन टपालासोबत वापरायला सुरूवात झाली. सुरवातीच्या काळातील अडचणींवर मात करण्यासाठी सर्व प्रेसिडेन्सींअंतर्गतची टपाल सेवा एकसूत्री असावी असा विचार पुढे आला. त्यातूनच पहिला भारतीय टपाल कायदा, १८३७ हा अस्तित्वात आला. त्यात पुढे बदल करून १८५४चा टपाल कायदा अस्तित्वात आला, त्याद्वारे देशात टपाल सेवेचा एकाधिकार हा टपाल खात्याला देण्यात आला व १ ऑक्टोबर १८५४ या दिवशी भारतीय पोस्ट ऑफिसची स्थापना झाली. २०११ पर्यंत त्यात बदल झालेला नाही. पैसे भरल्याचा पुरावा म्हणून धातूची टोकन मागे पडून, १ ऑक्टोबर १८५४ पासून चिकट पार्श्वभाग असलेली टपाल तिकीटे अस्तित्वात आली.
पोस्ट ऑफिस बद्दल महत्त्वाचे
जगातील सर्वात उंच टपाल कार्यालय भारतातील हिमाचल प्रदेशाच्या हिकिम नावाच्या गावात असून ते ४४४० मीटर उंचीवर आहे. ज्याठिकाणी ठिकाणी श्वास घेण्यास देखील अडचण येते त्याठिकाणी हे ऑफिस १९८४ पासून अविरत कार्यरत आहे. देशात पहिल्या तिकीटाची सुरुवात सिंध जिह्यात १८५२ साली झाली तर, देशातील पहिले रंगीत तिकीट १९३१ मध्ये छापल्या गेले. स्वंतंत्र भारताचे पहिले तिकीट १९९४७ ला निघाले त्यावर भारतीय झेंडा मुद्रित होता.
आज जगाने माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतली आहे. फेसबुक, मेसेंजर, व्हाॅटसअॅप व इतरही डिजिटल माध्यमातून त्वरित संपर्क साधता येतो. मात्र पोस्टमनची वाट पाहत खुशाली ऐकण्याचा आनंद आज या डिजिटल युगात पोस्ट ऑफिसच्या पत्राप्रमाणेच लोप पावला आहे. 20-25 वर्षांपुर्वी पत्र हे अनेकांच्या आयुष्याची लाइफ लाइन होते. मागील 20 वर्षांपासून पत्रांचा वापर कमी होत गेला आहे. आज पत्रांची जागा ई-मेल आणि सोशल मीडियाने घेतली आहे. लोक लांब असले तरीही पत्राद्वारे प्रेम व्यक्त करत असत, मात्र आज लोक आधुनिक तर होत आहेत, मात्र एकमेंकांपासून लांब जात आहेत.