वातावरणात दिवसेंदिवस बदल पाहायला मिळत आहे, कधी कमी-जास्त तापमान तर कधी अवकाळी पाऊस यामुळे आंबा वनस्पतीची फळगळती, फळावरील रोग किंबहुना आंबा उत्पादनात घट होणे सुरू झाले आहे. त्यामुळे शेतकरी बंधूनी वेळीच खबरदारी घेणे गरजेचे आहे.
* फळगळती व फळावरील येणाऱ्या रोगाचे कारण *
१. मोहर येऊन गेल्यानंतर साधरणता मार्च-एप्रिल मध्ये आंबे यायला सुरुवात होते. सामान्यपणे याच महिन्यामध्ये वातावरणात बऱ्याच प्रमाणात पिकासाठी अनव्याशक असे बदल होतात. यात प्रामुख्याने हवा ही कोरडी व उष्ण वाहू लागते, जी सुष्क होऊन जाते व वातावरणमध्ये नमी राहत नाही, त्यामुळे पिकामधे जीवनसत्व, नायट्रोजनची कमतरता भासून फळ लागून ही त्याची पूर्णता वाढ होत नाही परिणामी त्याची गळती होते.
२. फळ लागणीच्या वेळेस झाडाला पाण्याचा पुरवठा कमी असल्यास फळ संकुचित पावतात व ही पिकण्या पूर्वीच जमिनीवर गळून पडतात
३. बहुतांश वेळेस अपुऱ्या परागकण प्रक्रियेमुळे तसेच अतिघन बागेतील झाडामध्ये पोषणतत्वासाठी आपापसात होणाऱ्या प्रतीस्पर्धेमुळे देखील फळांची वाढ स्थगित होऊन गळती होते
४. वनस्पती वाढनियामक PGR ची कमतरता आढळल्यास, फळे ही किडीला व रोगला आमंत्रण देतात
५. मोहरच संरक्षण केल्यानंतर आंब्यावर फळमाशी, पिठ्या ढेकूण, तुडतुडे, फुलकिडे यासारख्या अनेक घातक किडयाचा प्रादुर्भाव वाढतो. त्याच प्रकारे पानावर, फळावर काळी बुरशी पाहायला मिळते ज्यामुळे आंब्याची घट झालेली दिसते. दुर्गंध, काळ्या रंगाचे टिपके व अति पिकलेली फळ यामुळे शेतकऱ्याच्या उत्पादनास मोठया प्रमाणात नुकसान होत.
*फळगळती व रोग यावरील नियंत्रणात्मक उपाययोजना *
१ . उष्ण वातावरणामुळे झाडामध्ये पाण्याची कमतरता भासते म्हणून फळ धारणेच्या काळात झाडाला वेळोवेळी भरपूर प्रमाणात पाणी द्यावे. त्यामुळे फळगळती थांबते, झाडामध्ये नमी टिकून राहून फळे ही रोगमुक्त व जमिनीतून पोषणतत्वाचा शोषण करत राहतात. झाडामध्ये होणाऱ्या सर्व जैविक-रासायनिक प्रक्रियेला प्रतिसाद देत फळ ही काढणीसाठी परिपकव् बनतात.
२. झाडाला पानी दिल्यानंतर दीर्घकाळ त्याचा ओलावा टिकून ठेवण्यासाठी आपण प्लॅस्टिक मलचिंगचे व्यवस्थापन करून फळ गळती रोखू शकतो (टीप : आंब्याला ठिबक सिंचनने पाणीपुरवठा करावा )
३. आंबा पिकावरील भुरी रोग हा विशेषतः गंभीर मानला जातो. यात फळे ही विकृत होतात त्याचा रंग हा साधारण रंगापेक्षा फिकट होत जातो व आंबा हा पिकण्यापूर्वीच गळून पडतो.
व्यवस्थापन : सल्फर ८० wp (०.२ %), २ ग्राम सलफेक्स प्र.लि, ट्रायडेमोरफ ०.१% (१ मी.ली क्यालिक्झिण प्र.ली) व बाविसटीन @०.१% दर १५ दिवसाच्या कालावधीत फवारावा .
४. फळमाशी ही फलगळतीचे कारण:
फळगळतीला मुख्य कारणीभूत फळमाशी असते. फळधारणे नंतर फळे जशीजशी मोठी व्हायला लागतात तसे आंब्यावरील फळमशीचा प्रकोप मोठ्या प्रमाणात दिसून येतो. फळ पिकल्यानंतर फळाच्या वरच्या लुसलुशीत कांती मध्ये ही फळमाशीतली मादा अंडी घालते व ४-५ दिवसामध्ये त्यातून अळी बाहेर निघते ही अळी फळाचा पूर्ण गाभा खाऊन टाकते, अंडी घातलेल्या फळावर काळ्या रंगाचा डाग निर्माण होतो व त्यातून सुद्धा जिवाणू आत शिरतात व फळ कुजायला लागत सरतेशेवटी फळ गळून पडते.
* फळमाशीचे एकात्मिक कीड नियंत्रण :
१. किडलेले फळ खाली पडल्यानंतर त्यातल्या अळ्या पुन्हा कोषावस्थेत जातात व पुन्हा नुकसान करायला तयार होतात त्यामुळे शेतातमध्ये किंवा बागेत सवछता राखण गरजेच आहे, तण विरहित शेत करावे व त्याच प्रमाने खाली पडलेली फळ गोळा करून जाळून टाकावी .
२. कपड्याच्या लहान पिशव्या किंवा पॉलीबॅग यांनी फळाला झाकून फळमाशीचा प्रवेश रोखता येतो
३. मोठया बागेत /शेतात फळाचे रक्षण करण्यासाठी रक्षक सापळयचा चा ९/हेक्टर असा वापर करावा .
४. २० मी.लि मेलयआथिऑन व २०० ग्राम गूळ ही २०० लि पाण्यात ढवळून फळावर मारावे. किटाकणशकाचे डोस जास्त प्रमाणात दिल्यास ग्राहकाला त्याचे विपरीत परिणाम होणार नाही याची दक्षता घ्यावी .
५. तुडतुडे व फुलकिडे हे फलगळतीचे कारण : तुडतुडे व फुलकिडे ही देठातील रस शोषून घेतात व देठला फळाचे वजन पेलल्या जात नाही म्हणून बरेच ठिकाणी आपल्याला लहान लहान फळ खाली पडलेली आढळून येतात. रसशोषण करतांना हे किडे आपल्या अंगाद्वारे चिकट द्रव बाहेर टाकतात व त्यामुळे पानावर, फळावर काळ्या रंगाच्या बूरशीची वाढ होते. या बुरशीमुळे देखील आंब्याची घळ पाहायला मिळते .
व्यवस्थापन :
- तुडतुडयाच्या नियंत्रणासाठी इमिडॅक्लोप्रिड 4 मिली /10 ली पानी, क्वीनॉलफोस १८ मिली प्रती १० ली पानी+ डायथानियम ४५ @ ३० ग्राम/१५ ली पानी .ल्यांबडासायलोथरिंन १२ मिली/१५ ली पंप , (बुरशीनाशक) कॉपर ऑक्सीकलोरइड २५ ग्राम.फवारणी करावे. (टीप: फुलकिडेवर इमिडाकलोप्रीड मारू नये)
- लहान आंब्याच्या गळतीसाठी NAA 10-15 PPM साधारणत 10-15 ग्रॅम प्रती लिटर फवारणी केली तर फळगळ थांबवता येते. (0:52:34) या विद्रव्य खताचा फवारा जर दिला तर आंब्याची वाढ मोठी होते. (टीप: खत किंवा NAA हे वेगळ मारावे, किटाकनाशकंबरोबर मिसळून मारू नये)
- 6. झाडाला पोटाशियम डोज योग्य दरात द्यावा व नायट्रोजन चे प्रमाण कमी ठेवावे कारण असे न केल्यास फळ गळतीला वेग मिळतो. वनस्पती वाढ नियामक PGR (plant growth regulator) चा आवशकतेनुसार वापर करावा
*जर पुन्हा पाऊस पडला तर फळगळ होऊ नये म्हणून वरील सांगितलेल्या बंदोबस्ताच्या उपाय योजनेचा वापर शेतकरी बंधुणे केल्यास उत्तम-दर्जेदार आंब्याची लागवड होते व उत्पादनात झपाट्याने वाढ होते .
By: Achal Devendra Ingale
(6thsem,B.Sc.Agriculture)