खासदार उन्मेशदादा पाटील यांच्या संकल्पनेतून व महाराजस्व अभियान विस्तारीय समाधान योजना अंतर्गत 27 ते 29 ऑगस्ट दरम्यान चाळीसगाव येथे शासकीय योजनांची जत्रा, कृषी व सांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांना विविध शासकीय योजना एकाच छताखाली उपलब्ध करण्यात आल्या असून ज्या नागरिकांना जिल्ह्याच्या ठिकाणी होणाऱ्या कृषी प्रदर्शन व सांस्कृतिक कार्यक्रमांना हजर राहणे शक्य होत नाही त्यांना त्या माध्यामातून कृषिविषयक माहिती ,नवनवीन तंत्रज्ञान याची माहिती व विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी याद्वारे उपलब्ध होणार आहे.
कार्यक्रमाचे उद्घाटन मंगळवार (ता.२७ ऑगस्ट) ला सहकार राज्यमंत्री मा. ना. गुलाबरावजी पाटील यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमास कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष मा. ना. पाशा पटेल, कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाधयक्ष मा. ना. हरिभाऊ जावळे, ग्रामविकास राज्यमंत्री मा. ना. दादा भुसे, खासदार रक्षाताई खडसे, तापी महामंडळाचे उपाध्यक्ष चिमणराव पाटील, माजी मंत्री तथा आमदार एकनाथराव खडसे, आमदार किशोर पाटील, आमदार राजुमामा भोळे, आमदार शिरीष चौधरी, आमदार संजय सावकारे, विधान परिषदेचे सदस्य आमदार चंदुलाल पटेल, आमदार डॉ. सतीश पाटील, आमदार स्मिता वाघ, आमदार चंद्रकांत सोनवणे, जळगावच्या महापौर सीमा भोळे, पारोळ्याचे नगराध्यक्ष करणदादा पाटील, एरंडोलचे नगराध्यक्ष रमेश परदेशी, चाळीसगावच्या नगराध्यक्षा आशालता चव्हाण, धरणगावच्या प्रभारी नगराध्यक्षा अंजली विसावे, पाचोऱ्याचे नगराध्यक्ष संजय मोहील, अमळनेरच्या नगराध्यक्षा पुष्पलता पाटील, भडगावचे नगराध्यक्ष अतुल पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
विशेष उपस्थिती म्हणून विभागीय आयुक्त श्री. राजाराम माने, जिल्हाधिकारी श्री. अविनाश ढाकणे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, जिल्हा पोलिस अधिक्षक पंजाबराव उगले, चाळीसगावचे उपविभागीय अधिकारी शरद पवार, जिल्हा कृषी अधिकारी एस. के. ठाकूर, जळगावचे कृषी उपसंचालक अनिल भोकरे, उपविभागीय कृषी अधिकारी दीपक ठाकूर, चाळीसगावचे तहसीलदार अमोल मोरे, चाळीसगावचे गटविकास अधिकारी अतुल पाटील यांचीही उपस्थिती राहणार आहे.
मंगळवार (ता. २७ ऑगस्ट) ला सायंकाळी सातला ” हे मृत्यूंजय ” स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनावर आधारीत नाट्य सादरीकरण करण्यात येणार आहे.
बुधवारी (ता. २८ ऑगस्ट) ला सकाळी दहाला स्त्री शक्ती जागर कार्यक्रमात उमेद अभियानांतर्गंत महिला बचत गटांना मार्गदर्शन, अर्थसहाय्य वाटप नंदुरबारच्या खासदार डॉ. हिना गावित यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. तर डॉ. विद्या राजेंद्र पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहील.
तसेच दुपारी दोनला ग्रामविकास व कृषी परिषद आयोजित केली आहे. यात जिल्हा परिषद, पंचायत समिती, सरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्य, विविध कार्यकारी सोसायटी यांना मार्गदर्शन कार्यशाळा होईल. कार्यशाळेचे उद्घाटन राज्याचे कृषी मंत्री मा. ना. अनिल बोंडे, कृषी राज्यमंत्री मा. ना. सदाभाऊ खोत, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा उज्वलाताई पाटील, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. मार्गदर्शक म्हणून आदर्शगाव पाटोदा येथील भास्करराव पेरे पाटील, बारीपाड्याचे सरपंच, व यशदा प्रतिष्ठानचे संचालक चैत्राम पवार उपस्थित राहणार आहेत.
सायंकाळी सातला जगभरात नावाजलेले व सर्वसामान्यांच्या घराघरात पोहचलेले हास्य विनोदी नाट्य चला हवा… येऊ द्या… हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. यामध्ये विशेष कलाकार भाऊ कदम, भारत गणेशपुरे, कुशल बद्रीके, सागर कारंडे, श्रेया बुगडे, योगेश शिरसाठ या हास्यसम्राटांची सहभागी असणार आहेत.
गुरुवारी (ता. २९ ऑगस्ट) ला सकाळी दहाला एक पाऊल समाज परिवर्तनाकडे व क्रीडा परिषद, खेलरत्न पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. जलसंपदामंत्री तथा जळगावचे पालकमंत्री मा. ना. गिरीशभाऊ महाजन अध्यक्षस्थानी असतील. विशेष अतिथी म्हणून उत्तर महाराष्ट्र म्हाडाचे अध्यक्ष मा. ना. शिवाजीराव ढवळे, आमदार निलय नाईक, ट्रीपल महाराष्ट्र केसरी व डिवायएसपी मा. ना. विजय चौधरी, यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. तर माजी केंद्रीयमंत्री एम. के. पाटील, भाजपाचे जिल्हाध्यक्ष डॉ. संजीव पाटील, चाळीसगावचे माजी आमदार साहेबराव घोडे यांची उपस्थिती राहणार आहे.
तसेच सायंकाळी सातला डॉ. सलील कुलकर्णी व संदीप खरे यांचा एक हृदयस्पर्शी कार्यक्रम आयुष्यावर बोलू काही आयोजित करण्यात आला आहे.
या शासकीय जत्रेच्या ठिकाणी २७, २८, २९ ऑगस्ट २०१९ तिनही दिवस मोफत नेत्रतपासणी, चष्मे वाटप, महालॅबतर्फे रक्त तपासणी शिबीर आयोजित केले आहे.