• Home
    • आमच्याविषयी
  • Services
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

दिवाळीपूर्वी शेतकर्‍यांना पैसे मिळायलाच हवे… कृषीमंत्र्यांची विमा कंपन्यांना तंबी : छाननी संख्या वाढवण्याचा आदेश

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 28, 2021
in हॅपनिंग
0
कृषीमंत्री दादाजी भुसे यांच्या मान्यतेनंतर कृषी व संलग्न महाविद्यालये सुरू होणार “या” तारखेपासून.. विद्यार्थ्यांसाठी लसीकरण मोहिमही राबविणार..
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

मुंबई (प्रतिनिधी) – नुकसानीचे पंचनामे झालेल्या राज्यातील दहा लाख शेतकर्‍यांना विमा कंपन्यांकडून दिवाळीपूर्वीच पैसे अदा करायला हवेत, अशी तंबी राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांनी संबंधित विमा कंपनींच्या प्रतिनिधींसोबत नुकत्याच घेतलेल्या बैठकीत दिली. कृषीमंत्र्यांनी दिलेल्या या तंबीमुळे शेतकर्‍यांच्या खात्यांवर विमा कंपनींकडून लवकरच रक्कम जमा होणार असल्याने संबंधित शेतकर्‍यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

 

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या राज्यातील 34 लाख 52 हजार शेतकर्‍यांच्या पूर्वसूचना शासनाला प्राप्त झाल्या आहेत. त्यातील केवळ 10 लाख शेतकर्‍यांच्या नुकसानीचे पंचनामे आतापर्यंत पुर्ण झाले आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान पीक विमा योजनेतंर्गत राज्यात काम करणार्‍या सहा कंपन्यांच्या प्रतिनिधींची कृषी मंत्री दादा भुसे यांनी मुंबईत नुकतीच बैठक घेेतली. या बैठकीला कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले ऑनलाईन सहभागी झाले होते. कृषी आयुक्त धीरजकुमार, सांख्यिकी विभागप्रमुख विनयकुमार आवटे तसेच राज्यात काम करणार्‍या सर्व कंपन्यांचे प्रतिनिधी बैठकीला उपस्थित होते. राज्यात ठिकठिकाणी जुलै ते सप्टेंबर दरम्यान अतिवृष्टी झाली होती. ज्यात अनेक शेतकर्‍यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले होते. यातील बहुतांश शेतकर्‍यांनी पीक विमा काढलेला होता. यंदाच्या खरीप हंगामात पंतप्रधान पीक विमा योजनेत राज्यातील 84 लाख शेतकरी सहभागी झाले. त्यापैकी 33 लाख 52 हजार शेतकर्‍यांनी नुकसान भरपाईसाठी विमा कंपन्यांकडे दावा दाखल केला असून त्यातील 10 लाख शेतकर्‍यांच्या नुकसानीचे अधिकृत पंचनामे पूर्ण झाले आहेत.

शेतकऱ्यांची दिवाळी होणार गोड…; राज्यानंतर केंद्राकडूनही नुकसान भरपाई… अशी होणार रक्कम खात्यामध्ये जमा…

सहानुभूतीने पहाण्याचे आवाहन
बैठकीत राज्यातील नुकसानग्रस्त शेतकर्‍यांच्या पंचनाम्यांचा आढावा घेतल्यानंतर मंत्री भुसे यांनी विमा कंपन्यांच्या कामकाजाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. राज्य सरकारने 973 कोटीचा हप्ता दिला असून केंद्राचे देखील 893 कोटी रूपये जमा झाले आहेत. शेतकर्‍यांचेही दोन टक्क्यांप्रमाणे काही कोटी रूपये जमा झाले आहेत, असे असताना विमा कंपन्यांकडून किरकोळ कारणे पुढे करीत जुजबी कागदपत्रांची कमतरता दाखवून शेतकर्‍यांचे दावे नाकारले जातात. वास्तविक, शेतकरी कंपनीला किंवा शासनाला फसवायचे म्हणून दावा दाखल करीत नाहीत तर त्यांचे नुकसान झालेले असल्याने मदतीची अपेक्षा करीत आहेत. त्यामुळे विमा कंपन्यांनी नुकसानग्रस्त शेतकर्‍यांकडे सहानुभूतीने पाहून त्यांचे दावे मंजूर करावेत, असे सांगितले. दिवाळीपूर्वी शेतकर्‍याच्या बँक खात्यात पैसे जमा झालेच पाहिजे. त्यासाठी हवे तर कर्मचारी वाढवावे लागतील तर वाढवा असेही मंत्री भुसे यांनी विमा कंपन्यांच्या प्रतिनिधींना ठणकावून सांगितले. आपत्ती क्षेत्र मोठे असेल तर सामूहिक पंचनामे करून दावा प्रकरणे तयार करावीत अशीही सूचना मंत्री भुसे यांनी या बैठकीत केली. दरम्यान, नुकसानग्रस्त शेतकर्‍यांप्रती मंत्री भुसे यांनी घेतलेल्या या पवित्र्यामुळे विमा कंपन्यांकडून शेतकर्‍यांना दिवाळीपूर्वीच मदत मिळण्याची आशा आहे.

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: अतिवृष्टीमुळे नुकसानकृषिमंत्री दादाजी भुसेकृषी आयुक्त धीरजकुमारकृषी विभागकेंद्र शासननुकसान भरपाईराज्य शासनविमा कंपनीशेतकरी पंचनामे
Previous Post

शेतकऱ्यांची दिवाळी होणार गोड…; राज्यानंतर केंद्राकडूनही नुकसान भरपाई… अशी होणार रक्कम खात्यामध्ये जमा…

Next Post

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आशियाई विकास बँकेचा मदतीचा हात..; कृषिविषयक उद्योगांसाठी 10 कोटी डॉलर्सचे कर्ज…; जपान निधीतूनही 20 लाख डॉलर्सची करणार मदत

Next Post
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आशियाई विकास बँकेचा मदतीचा हात..; कृषिविषयक उद्योगांसाठी 10 कोटी डॉलर्सचे कर्ज…; जपान निधीतूनही 20 लाख डॉलर्सची करणार मदत

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आशियाई विकास बँकेचा मदतीचा हात..; कृषिविषयक उद्योगांसाठी 10 कोटी डॉलर्सचे कर्ज...; जपान निधीतूनही 20 लाख डॉलर्सची करणार मदत

ताज्या बातम्या

मान्सून पुन्हा सक्रिय होणार

मान्सून पुन्हा सक्रिय होणार; राज्याच्या काही भागात आज पुन्हा मुसळधार !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 25, 2025
0

राज्यात थंड

राज्यात थंड, बोचरे वारे! आरोग्याला फायदा की नुकसान? जाणून घ्या …

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 25, 2025
0

दुग्धव्यवसाय कार्यशाळा

बुकिंगची आज शेवटची संधी…; पुढची दुग्धव्यवसाय कार्यशाळा पुढच्या वर्षी…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 23, 2025
0

पावसाचा आगामी दोन आठवड्यांचा अंदाज

पावसाचा आगामी दोन आठवड्यांचा अंदाज; 25 ऑगस्टला कमी दाबाचे नवे क्षेत्र, महाराष्ट्रात पाऊस सुरूच राहणार !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 22, 2025
0

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा 2)

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 21, 2025
0

मिल्की मिस्ट : दुधाचा एक थेंबही न विकता उभा केला 2,000 कोटींचा मिल्क ब्रँड !

मिल्की मिस्ट : दुधाचा एक थेंबही न विकता उभा केला 2,000 कोटींचा मिल्क ब्रँड !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 21, 2025
0

आज 20 ऑगस्ट 2025

आज 20 ऑगस्ट 2025 : जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, अकोला, बुलढाणा, छ. संभाजीनगर, जालनाची स्थिती

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 20, 2025
0

महाराष्ट्रासह देशभरातील पावसाची स्थिती

आज 20 ऑगस्ट 2025 : महाराष्ट्रासह देशभरातील पावसाची स्थिती

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 20, 2025
0

5 म्हशीपासून 120 म्हशीपर्यंतचा प्रवास...??

5 म्हशीपासून 120 म्हशीपर्यंतचा प्रवास…??

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 20, 2025
0

दुग्धव्यवसायासाठी अनुदान

दुग्धव्यवसायासाठी अनुदान… वैयक्तिक ₹ 10 लाख तर सामूहिक ₹ 3 कोटींपर्यंत..

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 19, 2025
0

तांत्रिक

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

जगाच्या पाठीवर

मान्सून पुन्हा सक्रिय होणार

मान्सून पुन्हा सक्रिय होणार; राज्याच्या काही भागात आज पुन्हा मुसळधार !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 25, 2025
0

राज्यात थंड

राज्यात थंड, बोचरे वारे! आरोग्याला फायदा की नुकसान? जाणून घ्या …

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 25, 2025
0

दुग्धव्यवसाय कार्यशाळा

बुकिंगची आज शेवटची संधी…; पुढची दुग्धव्यवसाय कार्यशाळा पुढच्या वर्षी…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 23, 2025
0

पावसाचा आगामी दोन आठवड्यांचा अंदाज

पावसाचा आगामी दोन आठवड्यांचा अंदाज; 25 ऑगस्टला कमी दाबाचे नवे क्षेत्र, महाराष्ट्रात पाऊस सुरूच राहणार !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 22, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Home
  • Services

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.