मुंबई: हवामान तज्ज्ञांनी दिलेल्या अंदाजानुसार बंगालच्या उपसागराकडून येणाऱ्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे विदर्भात आज दि. 7 आणि ऑगस्ट रोजी पावसासह तापमानात घट होणार आहे. बुधवारी पूर्व-विदर्भातील काही भागात मध्यम ते जोरदार पाऊस होईल. उर्वरित विदर्भात हलका पाऊस राहील. परंतु गुरुवारी विदर्भातील बऱ्याच भागात मध्यम ते जोरदार पाऊस पडेल, अगोदरच सुरु असलेल्या पावसामुळे पाण्याच्या पातळीत अजून वाढ होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
पाऊस वाढण्याची कारणे?
नैऋत्य मोसमी वाऱ्याच्या अरबी समुद्र व बंगालचा उपसागर अश्या दोनही शाखा सक्रीय आहेत.त्यामुळे पुढील दोन दिवस अशीच स्थिती राहण्याची शक्यता आहे.दक्षिण महाराष्ट्रापासून केरळपर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे.त्याच्या परिणामामुळे पुण्यात शुक्रवार दि ९ पर्यंत मुसळधार पावसाची श्यक्यता राहील असे हवामान खात्याने सांगितले आहे. पुणे
दहा दिवसाचा पाऊस एका दिवसात !
हवामान खात्याच्या अंदाजानुसार जिल्ह्यातील घाटमाथ्यावर २०० मिलीमीटर पाऊस पडण्याची
शक्यता असल्याने पुणे शहरात पूरपरिस्थिती अजून वाढण्याची स्थिती आहे.
औरंगाबाद, जालना, परभणी आणि हिंगोली सह शेजारील जिल्ह्यातील काही भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज आहे. मध्य-महाराष्ट्रातील जळगाव, धुळे, नंदुरबार आणि नाशिक जिल्ह्यांत 8 आणि 9 ऑगस्टला मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. या दरम्यान उर्वरित मध्य-महाराष्ट्रात देखील पावसाचा अंदाज आहे. मुंबई,ठाणे,पालघर जिल्ह्यात 8 आणि 9 ऑगस्टला पावसात वाढ होण्याचा अंदाज देखील हवामान तज्ज्ञांनी वर्तविला आहे. 10 ऑगस्टपासून महाराष्ट्रातील हवामानाची स्थिती सामान्य होईल. या दरम्यान पूर परिस्थिती उद्भवण्याची शक्यता असून विदर्भ आणि मध्य-महाराष्ट्रातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेला सतर्क राहण्याचे आवाहन आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून करण्यात आले आहे.
या जिल्ह्यात महापुराचा धोका वाढला…
- रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात मुसळधार पाऊस पडतोय. महाड शहरात 8 ते 9 फूट पुराचं पाणी शिरलं आहे. बिरवाडी आसनपोई गावातील 200 पेक्षा अधिक लोकांना NDRF टीमने सुरक्षित स्थळी हलवलं आहे. ढगफुटी सारखी परिस्थिती झाली आहे.
- रायगडमध्ये महाड शहर, आसनपोई , बिरवाडी भागातील 250 नागरिकांची पुराच्या पाण्यातून सुटका करण्यात आली असून महाड, पोलादपूर, माणगाव, तळा तालुक्यातील शाळांना आज सुट्टी देण्यात आली आहे.
- सांगली जिल्ह्यात महापुराची स्थिती गंभीर बनली आहे. सांगलीतील 100 पेक्षा जास्त गावांना पुराचा धोका निर्माण झाला आहे. या ठिकाणच्या 41 हजार नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे. तर कृष्णा नदीनेही 52 फुटांची पातळी गाठली आहे. त्यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे.
- कोल्हापूरमध्ये राजाराम बंधाऱ्याची पाणी पातळी 54 फुट 10 इंच इतकी आहे. (धोकादायक पातळी 43 फूट) त्यामुळे एकुण 111 बंधारे पाण्याखालील गेले आहेत. तर पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग सांगली नाक्याजवळ बंद करण्यात आला आहे.
उत्तर महाराष्ट्र
गिरणा धरण ५५ टक्के भरले.
जळगांव जिल्ह्यातील चाळीसगांव , पाचोरा ,भडगांव तालुक्यासह जामनेर येथे सर्वाधिक पाऊसाची नोंद झाली आहे.
चार दिवसापूर्वी ७ % मृतसाठा असलेल्या गिरणा धरणात पाणी साठा ५५% पर्यंत वाढला आहे.
गिरणा वरील जलाशयातून पाण्याचा विसर्ग सुरु असल्यामुळे हा साठा ६०% पर्यंत जाण्याची शक्यता आहे.
भुसावळ चे हातरुण व जामनेर तालुक्यातील अजंठा येथे पाणीपुरवठा करणारे तोंडापूर धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे.