पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून आज (दि.२५ डिसेंबर) पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर ट्रान्सफर केली. या योजनेत तब्बल 9 कोटी लाभार्थी शेतकरी आहेत. या शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट 18 हजार कोटींची रक्कम ट्रान्सफर करण्यात आली आहे.
यावेळी कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर म्हणाले, “पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी ही अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना आहे. गरीब शेतकऱ्याला याचा खूप लाभ झाला. पंजाबसह काही शेतकऱ्यांच्या मनात नव्या कृषी कायद्यावरून संभ्रम निर्माण झाला आहे. हे आंदोलन संपवून त्यांनी सरकारसोबत चर्चेला यावं, असं आव्हान त्यांनी यावेळी कृषी मंत्र्यांनी केल. नव्या कायद्याचं महत्त्व आणि गरज शेतकऱ्यांना समजेल, अशी मला आशा आहे,” असंही तोमर म्हणाले.
पंतप्रधानाच्या भाषणातील प्रमुख मुद्दे –
- जिथं तुम्हाला योग्य भाव मिळेल तिथंच माल विकू शकता.
- कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगच्या नावाने संभ्रम निर्माण केला जात आहे.
- संपूर्ण जोखीम करार करणाऱ्या कंपनी किंवा व्यक्तीची असेल. शेतकऱ्यांना त्याचं काहीच नुकसान नाही.
- पश्चिम बंगालमध्ये शेतकऱ्यांच्या हितावर काहीच बोलत नाहीत, इथं दिल्लीत येऊन बोलतात.
- केरळमध्ये बाजार समितीच नाहीत, केरळमध्ये आंदोलन करून तिथं समित्या चालू करायला लावा
- खोट्या अफवा पसरवणं, भोळ्या शेतकऱ्यांची दिशाभूल करणं बंद करा.
- मी शेतकऱ्यांना नव्हे तर शेतकऱ्यांच्या नावाने राजकारण करणाऱ्या लोकांना बोलत आहे.
- निर्दोष शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळू नका,
- जमीन आणि संसाधन कमी असलेल्या शेतकऱ्यांना जास्त त्रास व्हायचा.
- आधी शेतकऱ्यांकडे बँक खातंही नव्हतं. त्यांना पीक विमा योजनेचा लाभ मिळत नव्हता.
- गरीब शेतकऱ्यांना आपलं पीक विकण्यातही कसरत करावी लागत होती.
- शेतकऱ्यांची जमीन हडपण्यात येईल, अशी अफवा मुद्दामहून पसरवली जात आहे.
- बदलत्या काळानुसार आपल्या दृष्टीकोनातही बदल करावा लागेल.
- सरकारने त्यासाठीचा विडा उचलला आहे. शेतकरीही त्यात सहभागी आहेत.
- आधी बाजार समितीत भाव मिळाला नाही तर शेतकऱ्यांचा नाईलाज व्हायचा. या कायद्यांमुळे तुम्ही जिथं पाहिजे तिथं माल विकू शकता.
- आधीच्या कायद्यांमध्ये करार मोडल्यानंतर शेतकऱ्यांना दंड करण्यात येत होता.
- पण नव्या कायद्यात ती तरतूद रद्द केली आहे.
- कंपन्यांना जास्त फायदा मिळत असेल तर शेतकऱ्यांना बोनसही देण्यात येईल.
सौजन्य :- समाजमाध्यम