• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

आत्मा अंतर्गत राज्यस्तरीय सल्ला समिती स्थापन करण्याची केंद्राची सूचना…., शेतकरीच करणार आता कृषीचा विस्तार… राज्य समितीवर शेतकर्‍यांचीच निवड

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 24, 2021
in हॅपनिंग
0
आत्मा अंतर्गत राज्यस्तरीय सल्ला समिती स्थापन करण्याची केंद्राची सूचना…., शेतकरीच करणार आता कृषीचा विस्तार… राज्य समितीवर शेतकर्‍यांचीच निवड

पुणे : कृषी विभागाच्या बरोबरीने करणार्‍या आत्मा विभागांतर्गत राज्यस्तरीय सल्ला समिती स्थापन करण्याच्या सूचना केंद्र शासनाने दिल्या आहेत. त्याची अंमलबजावणी स्थानिक पातळीवर होत असून राज्य सरकारने निवडलेल्या या समितीवर राज्यातील ठिकठिकाणच्या 20 शेतकर्‍यांची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे कृषी विस्ताराच्या संदर्भात यापुढे शेतकर्‍यांचीच भूमिका मोलाची ठरणार आहे.

शेतकर्‍यांच्या हितासाठीच निर्णय
कृषी योजनांची अंमलबजावणी होऊन त्याचा थेट लाभ शेतकर्‍यांनाच मिळावा या दृष्टीने कृषीचा विस्तार वाढावा म्हणून या समित्या स्थापन करण्याची सूचना केंद्र सरकारने केली आहे. त्याची अंमलबजावणी सुरु झाली असून राज्य सरकारतर्फे थेट या समितीवर शेतकर्‍यांनाच सामावून घेतले जात आहे. या संदर्भात कृषी आयुक्त धीरज कुमार यांनी केंद्र सरकारने ठरवून दिल्यानुसार समित्या गठित करण्याच्या सूचना आत्मा विभागातील संचालकांना दिल्या होत्या. त्यानुसार समित्यांची निवडही करण्यात आली होती. मात्र, थेट शेतकर्‍यांशी संवाद असणार्‍या शेतकर्‍यांचा समावेश करण्याच्या सूचना राज्य कृषिमंत्री तसेच कृषी कार्यालयकडून देण्यात आल्या होत्या. त्यामुळे अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीमधून दोन सदस्य तर इतर 18 सदस्य हे खुल्या वर्गातून निवडण्यात आले आहेत.

शेतकरी आणि आत्मा विभागातील दुवा
आत्मा विभागांतर्गत राबविल्या जाणार्‍या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी या समितीवर 20 शेतकर्‍यांची निवड करण्यात आली आहे. आत्मातर्फे विविध योजना राबविल्या जात असल्या तरी त्याची स्थानिक पातळीवर अंमलबजावणी होताना दिसत नाही. त्यामुळे यामधील नेमक्या अडचणी काय आहेत, हे जाणून घेण्यासाठी समिती थेट शेतकर्‍यांशी संवाद साधणार आहेत. शेतकर्‍यांच्या मागणीनुसार राज्य सरकारकडे निधीची मागणी करुन त्याची पूर्तता करण्यासाठी समितीच पाठपुरावा करणार आहे. त्यामुळे शेतकरी आणि आत्मा विभाग यांच्यात दुवा म्हणून या समितीमधील सदस्यांना काम करावे लागणार आहे.

जनजागृतीवर भर
शेतीमध्ये वाढत्या बदलामुळे रासायनिक खतांचा वापर वाढला आहे. परिणामी, काळाच्या ओघात सेंद्रिय शेतीकडे शेतकर्‍यांचा कल कमी होत आहे. त्यामुळे शेतकरी उत्पादक गटांना याबाबत मार्गदर्शन करुन सेंद्रिय शेतीचे क्षेत्र वाढविणे, याकरिता प्रशिक्षण देऊन शेतकर्‍यांच्या सहलींचे आयोजन करणे, वेगवेगळ्या प्रगत शेतकर्‍यांचे मार्गदर्शन घडवून शेती विकासाबाबतची प्रात्याक्षिके शेतकर्‍यांना करुन दाखवणे, शेतकरी केवळ नगदी पिकांवर भर देत असल्याने ज्या पिकांचे क्षेत्र कमी होत आहे, त्या पिकांचे महत्व सांगून क्षेत्र वाढविणे हा या समितीचा उद्देश असल्याचे अभिमान अवचर यांनी सांगितले. एकूणच या समितीमुळे शेतकर्‍यांनाच आता शेतीसंदर्भातील निर्णय प्रक्रियेत सहभागी होता येणार असल्याने कृषी विस्तारात शेतकर्‍यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

Tags: Agriculture DepartmentFarmerGovt SchemeOrganic Farmingआत्माकृषिमंत्रीकृषी आयुक्त धीरज कुमारकृषी योजनाकृषीचा विस्तारजनजागृतीवर भरराज्यस्तरीय सल्ला समितीशेतकरीसेंद्रिय शेती
Previous Post

शेतकरी होणार हायटेक… मोबाईलच्या खरेदीसाठी मिळणार शासनाकडून आर्थिक सहकार्य

Next Post

जिरेनियम लागवडीचा यशस्वी प्रयोग… सायगावच्या तरूण शेतकर्‍याने एकाच वर्षात घेतले उत्पन्न

Next Post
जिरेनियम लागवडीचा यशस्वी प्रयोग…  सायगावच्या तरूण शेतकर्‍याने एकाच वर्षात घेतले उत्पन्न

जिरेनियम लागवडीचा यशस्वी प्रयोग... सायगावच्या तरूण शेतकर्‍याने एकाच वर्षात घेतले उत्पन्न

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.