• Home
    • आमच्याविषयी
AgroWorld
Advertisement
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

उन्हाळी मिरची लागवड व्यवस्थापन

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
February 14, 2025
in तांत्रिक
0
उन्हाळी मिरची लागवड व्यवस्थापन
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

नेहा बाविस्कर
मिरची हे भारतातील एक अत्यंत महत्त्वाचे आणि मूल्यवान पीक आहे. विविध प्रकारच्या लोणचे, भाज्या, मसाले, सॉस आणि चटणी यामध्ये मिरचीचा महत्त्वाचा रोल असतो. महाराष्ट्र हे मिरची उत्पादनातील प्रमुख राज्यांपैकी एक आहे, आणि येथे विविध प्रकारांच्या मिरच्यांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर केले जाते. महाराष्ट्रातील मिरचीखालील एकूण क्षेत्रापैकी 68 टक्के क्षेत्र आहे. मिरचीचे पीक सर्वाधिक धुळे, जळगाव, नंदुरबार, नागपूर, अमरावती, पुणे, चंद्रपूर, उस्मानाबाद आणि औरंगाबाद इत्यादी ठिकाणी घेतले जाते. भारतातील प्रमुख मिरची उत्पादक राज्यांमध्ये आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटका, ओडिसा, तमिळनाडू, बिहार, उत्तर प्रदेश आणि राजस्थान यांचा समावेश होतो.

जमीन
मिरची विविध प्रकारच्या जमिनीत उगवू शकते, जसे की वाळूमिश्रित मातीपासून जड मातीपर्यंत. मात्र, मिरचीसाठी सर्वोत्तम माती ती आहे जी चांगल्या प्रकारे निचरा होणारी, हलकी, सुपीक आणि ओलावा टिकवून ठेवण्याची क्षमता असलेली असावी. हलक्या जमिनीत जड मातीपेक्षा चांगल्या दर्जाची फळे मिळतात. मिरची पिकासाठी 6 ते 7 pH स्तर असलेली जमीन आदर्श मानली जाते. पावसावर आधारित लागवडीसाठी काळी माती उपयुक्त ठरते कारण ती ओलावा टिकवून ठेवण्याची क्षमता ठेवते. तसेच, सिंचनासाठी डेल्टाईक माती आणि वाळूमिश्रित मातीसारख्या चांगल्या निचरा होणाऱ्या जमिनी अधिक योग्य मानल्या जातात.

कालावधी व हवामान
उन्हाळी मिरचीची लागवड मुख्यतः जानेवारी ते फेब्रुवारी या कालावधीत केली जाते, कारण या काळात हवामान उबदार असते आणि मिरची पिकासाठी अत्यंत योग्य असतो. मिरचीच्या चांगल्या वाढीसाठी आणि अधिक उत्पादनासाठी 25°C ते 35°C या दरम्यानचे तापमान अनुकूल मानले जाते. उन्हाळ्याच्या हंगामात चांगल्या निचऱ्याची क्षमता असलेल्या जमिनीत मिरचीचे उत्पादन उत्तम होते. या कालावधीत लागवडीच्या सुरुवातीला थोड्या प्रमाणात आर्द्रता आवश्यक असते, परंतु जास्त ओलसरपणा किंवा सतत पाणी साचल्यास झाडांच्या मुळांना हानी पोहोचू शकते.

उत्तम जाती
पुसा ज्वाला, पंत सी – १, संकेश्वरी ३२, मुसाळवाडी याशिवाय अग्निरेखा, फुले सई, फुले ज्योती, आणि जी-4 या जाती अत्यंत उपयुक्त मानल्या जातात. हेक्टरी १ ते दीड किलो बियाणे वापरावे.

खते वापरण्याचे मार्गदर्शन
१. पूर्वमशागत खते:
शेणखत : 10-12 टन प्रति हेक्टर वापरावे.
सेंद्रिय खते : कंपोस्ट/गांडुळखत 2-3 टन प्रति हेक्टर वापरावे.

२. रासायनिक खते:
लागवडीनंतर:
नायट्रोजन : 50 किलो/हेक्टर
फॉस्फरस : 25 किलो/हेक्टर
पोटॅशियम : 25 किलो/हेक्टर
वाढीच्या टप्प्यावर : 15-20 दिवसांच्या अंतराने नायट्रोजन खत द्यावे.

३. फवारणीसाठी:
युरिया (1-2%) किंवा झिंक सल्फेट (0.5%) फवारणी करावी.

पाणी व्यवस्थापन :
उन्हाळ्यात पिकांना दररोज 5-7 मिमी पाण्याचा पुरवठा आवश्यक असतो. उन्हाळ्यात पाण्याची गरज जास्त असते. त्यावर ठिबक सिंचन हा एक उत्तम उपाय आहे. तसेच जमिनीत ओलावा टिकवण्यासाठी प्लास्टिक किंवा सेंद्रिय मल्चिंगचा वापर करावा. पाणी साठवण्यासाठी रेनवॉटर हार्वेस्टिंगचा अवलंब करावा.

 

रोग व कीड नियंत्रण
मिरची मर रोग :
हा रोग कोलीटोट्रीकम कॅपसीसी या बुरशीमुळे होतो. या रोगाचा प्रादुर्भाव झालेल्‍या हिरव्‍या किंवा लाल मिरचीवर वतुळाकार खोलगट डाग दिसतात. दमट हवेत रोगाचे जंतू वेगाने वाढतात आणि फळावर काळपट चटटे दिसतात. अशी फळे कुजतात आणि गळून पडतात. बुरशीमुळे झाडाच्‍या फांद्या शेंडयाकडून खाली वाळत जातात. प्रथम कोवळे शेंडे मरतात. रोगांचा प्रादुर्भाव जास्‍त प्रमाणात झाल्‍यास झाडे सुकून वाळतात तसेच पानांवर आणि फांद्यांवर काळे ठिपके दिसतात.
उपाय : या रोगाची लक्षणे दिसताच शेंडे खुडून त्‍यांचा नाश करावा. तसेच डायथेन झेड-78 किवा धानुका कंपनीचे धनुका एम 45, डायथेन एम 45 यापैकी कोणतेही एक बुरशीनाशक औषध 25 ते 30 ग्रॅम 10 लिटर पाण्‍यात मिसळून रोग दिसताच दर 10 दिवसांच्‍या अंतराने 3 ते 4 वेळा फवारावे.

भुरी रोग :
भूरी रोगामुळे मिरचीच्‍या पानाच्‍या वरच्‍या आणि खालच्‍या बाजूवर पांढरी भूकटी दिसते. या रोगाचा प्रादुर्भाव जास्‍त प्रमाणात झाल्‍यास झाडाची पाने गळतात.
उपाय : भुरी या रोगाचा प्रादुर्भाव दिसताच 30 ग्रॅम पाण्‍यात मिसळणारे गंधक 10 लिटर पाण्‍यात मिसळून मिरचीच्‍या पिकावर 15 दिवसांच्‍या अंतराने दोन फवारण्‍या कराव्‍यात.

फूलकिडे :
हेक्‍टरी किटक आकाराने अतिशय लहान म्‍हणजे 1 मिली पेक्षा कमी लांबीचे असतात. त्‍यांचा रंग फिकट पिवळा असतो. किटक पानावर ओरखडे पाडून पानाचे रस शोषण करतात. त्‍यामुळे पानाच्‍या कडा वरच्‍या बाजूला चुरडलेल्‍या दिसतात. हेक्‍टरी किटक खोडातील रसही शोषून घेतात. त्‍यामुळे खोड कमजोर बनते व पानांची गळ होते.
उपाय : रोपलावणीपासून 3 आठवडयांनी पिकावर 15 दिवसांच्‍या अंतराने 8 मिलीमिटर टाटा कंपनीचे माणिक, ॲसेटामाप्रिड 20% एस.पी. 10 लिटर पाण्‍यात मिसळून फवारावे.

मावा :
हेक्‍टरी किटक मिरचीची कोवळी पाने आणि शेडयांतील रस शोषण करतात. त्‍यामुळे नविन पालवी येणे बंद होते.
उपाय : लागवडीनंतर 10 दिवसांनी 15 मिली सिंजेंटा कंपनीचे एकालक्स, क्विनोलफॉस 25 ई. सी. टक्‍के प्रवाही 10 लिटर पाण्‍यात मिसळून फवारणी करावी.

काढणी व उत्पादन
हिरव्या मिरचीची तोडणी साधारणपणे लागवडीनंतर अडीच महिन्यांनी सुरु होते.
पूर्ण वाढलेल्या व सालीवर चमक असलेल्या हिरव्या फळांची तोडणी देठासह १० दिवसांच्या अंतराने करावी.
साधारपणपणे हिरव्या मिरच्यांची तोडणी सुरु झाल्यानंतर ३ महिने तोंडे सुरू राहातात.
अशा प्रकारे ८ ते १० तोडे सहज होतात. वाळलेल्या मिरच्यांसाठी त्या पूर्ण पिकून लाल झाल्यावरच त्यांची तोडणी करावी.
जातीपरत्वे (बागायती) हिरव्या मिरच्यांचे हेक्टरी ८० ते १०० क्विंटल उत्पादन मिळते.
वाळलेल्या लाल मिरच्यांचे उत्पादन ९ ते १० क्विंटल निघते. व कोरडवाहू मिरचीचे उत्पादन ६ ते ७ क्विंटल

Planto Krushitantra

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇

  • 13 कोटी शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ; पीएम किसान योजनेचा 19 वा हप्ता लवकरच !
  • Agricultural cover : शेतीसाठी आच्छादन का गरजेचे ?

Share this:

  • Facebook
  • X
Tags: मिरचीरोग व कीड नियंत्रणलागवड व्यवस्थापन
Previous Post

13 कोटी शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ; पीएम किसान योजनेचा 19 वा हप्ता लवकरच !

Next Post

अस्सल इंद्रायणी.. दुसऱ्या गाडीचीही बुकिंग सुरु… (फक्त 80 कट्टे; बुकिंग सुरू)

Next Post
अस्सल इंद्रायणी

अस्सल इंद्रायणी.. दुसऱ्या गाडीचीही बुकिंग सुरु... (फक्त 80 कट्टे; बुकिंग सुरू)

ताज्या बातम्या

e-NAM योजना

e-NAM योजना ; शेतकऱ्यांच्या उत्पादन विक्रीसाठी डिजिटल प्लॅटफॉर्म

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 3, 2025
0

शेती संस्कृती, पर्यावरण आणि अर्थव्यवस्थेचा आधार – उपमुख्यमंत्री अजित पवार

शेती संस्कृती, पर्यावरण आणि अर्थव्यवस्थेचा आधार – उपमुख्यमंत्री अजित पवार

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 2, 2025
0

मधमाशी पालनातून वर्षाला 9 लाखांची कमाई !

मधमाशी पालनातून वर्षाला 9 लाखांची कमाई !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 2, 2025
0

देशातील पहिले आंतरराष्ट्रीय कृषी हॅकेथॉन

पुण्यात देशातील पहिले आंतरराष्ट्रीय कृषी हॅकेथॉन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 31, 2025
0

या फळाच्या लागवडीतून एकरी लाखोंचा नफा !

या फळाच्या लागवडीतून एकरी लाखोंचा नफा !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 30, 2025
0

या जिल्ह्यांना आज मुसळधार पावसाचा इशारा

या जिल्ह्यांना आज मुसळधार पावसाचा इशारा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 28, 2025
0

मान्सून मुंबईत दाखल ! पुढील तीन दिवसात हवामान कसे असेल..??

मान्सून मुंबईत दाखल ! पुढील तीन दिवसात हवामान कसे असेल..??

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 26, 2025
0

फळ, भाजीपाल्यातून 10 लाखांचा नफा !

फळ, भाजीपाल्यातून 10 लाखांचा नफा !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 23, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ

मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 19, 2025
0

तांत्रिक

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

हळद साठवणूक

हळद साठवणूक प्रक्रिया

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 26, 2025
0

जगाच्या पाठीवर

e-NAM योजना

e-NAM योजना ; शेतकऱ्यांच्या उत्पादन विक्रीसाठी डिजिटल प्लॅटफॉर्म

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 3, 2025
0

शेती संस्कृती, पर्यावरण आणि अर्थव्यवस्थेचा आधार – उपमुख्यमंत्री अजित पवार

शेती संस्कृती, पर्यावरण आणि अर्थव्यवस्थेचा आधार – उपमुख्यमंत्री अजित पवार

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 2, 2025
0

मधमाशी पालनातून वर्षाला 9 लाखांची कमाई !

मधमाशी पालनातून वर्षाला 9 लाखांची कमाई !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 2, 2025
0

देशातील पहिले आंतरराष्ट्रीय कृषी हॅकेथॉन

पुण्यात देशातील पहिले आंतरराष्ट्रीय कृषी हॅकेथॉन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 31, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Home

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.