• Home
    • आमच्याविषयी
  • Services
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

अतिवृष्टीच्या निकषात न बसणाऱ्या बाधित शेतकऱ्यांना ७५५ कोटी रुपयांची मदत..; ‘या’ जिल्ह्यांना मिळणार लाभ

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत निर्णय

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
September 30, 2022
in हॅपनिंग
3
बाधित शेतकऱ्यांना ७५५ कोटी रुपयांची मदत
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

मुंबई – अतिवृष्टीसाठी विहित करण्यात आलेल्या निकषांमध्ये बसत नसतानाही जून ते ऑगस्ट २०२२ या कालावधीत अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना राज्य शासनाने मोठा दिलासा दिला आहे. विशेष बाब म्हणून सुमारे ७५५ कोटी रुपयांची मदत देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत घेण्यात आला. याचा राज्यातील अंदाजे ५ लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे.

नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधित आपद्ग्रस्तांना मदत देण्याबाबत निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक मंत्रालयात झाली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह ग्रामविकासमंत्री गिरीष महाजन आणि अपर मुख्य सचिव (वित्त) मनोज सौनिक, मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असीमकुमार गुप्ता, कृषि विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले आदी वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

एकात्मिक फलोत्पादन अभियान : वैयक्तिक शेततळे अस्तरीकरण योजनेसाठी 50% अनुदान ; असा घ्या लाभ
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇
https://youtu.be/vniBFTSBoj4

नैसर्गिक आपत्ती निवारणासाठी आतापर्यंत अंदाजे ४५०० कोटी रुपयांच्या निधीचे शासनाने वाटप केले आहे. एसडीआरएफच्या निकषाप्रमाणे जर मदतीचे वाटप केले असते तर ती अवघी १५०० कोटी रुपये राहिली असती, असे सांगून निकषापलिकडे जाऊन अधिक मदत करण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्याचा भरीव लाभ मिळणार असल्याचेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले.

अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना ७५५ कोटी रुपयांची मदत

काही गावांमध्ये अतिवृष्टीमुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अतिवृष्टीसाठी विहित करण्यात आलेल्या निकषामध्ये बसत नसतानाही या झालेल्या नुकसानीपोटी मदतीचे प्रस्ताव विभागीय आयुक्त औरंगाबाद, अमरावती आणि सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांनी शासनाकडे सादर केले होते. औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बीड, लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यातील ४ लाख ३८ हजार ४८९ हेक्टर क्षेत्र, यवतमाळ जिल्ह्यातील ३६ हजार ७११.३१ हेक्टर तर सोलापूर जिल्ह्यातील ७४ हजार ४४६ हेक्टर असे एकूण ५ लाख ४९ हजार ६४६.३१ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना सुमारे ७५५ कोटी रुपयांच्या निधीची मदत देण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळ उपसमितीने मान्य केला आहे. या निर्णयाचा सुमारे ५ लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना लाभ होणार आहे.

Neem India

अंदाजे ३६ लाख शेतकऱ्यांना दिलासा
आतापर्यंत सुमारे ३९०० कोटी रुपयांच्या मदतीचे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाटप केले आहे, काही ठिकाणी हे मदतीचे वाटप सुरु असून सुमारे ३० लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांना याचा लाभ झाला आहे, हे ३० लाख आणि आज मदतीचा निर्णय घेण्यात आलेल्या ७५५ कोटीच्या निधीमुळे अंदाजे ३६ लाख शेतकऱ्यांना शासनाच्या या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळणार आहे, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.



आतापर्यंत सुमारे ३९५४ कोटी रुपयांचा मदत निधी वितरित
राज्यात जून ते ऑगस्ट या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीपिकांचे आणि मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना मदत देण्याचे प्रस्ताव सर्व विभागीय आयुक्तांकडून शासनास प्राप्त झाले होते. त्यानुसार ८ सप्टेंबर २०२२ रोजी सुमारे ३४४५.२५ कोटी आणि ५६.४५ कोटी इतका निधी नुकसानभरपाई पोटी शेतकऱ्यांना वितरित करण्यास मान्यता दिली आहे. त्याशिवाय गोगलगायींमुळे झालेल्या नुकसानीपोटी औरंगाबाद विभागास ९८.५८ कोटी तर नाशिक, अमरावती, पुणे यांच्या सुधारित प्रस्तावानुसार ३५४.०७ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास यापूर्वीच मान्यता देण्यात आली आहे.

Legend Irrigation

मंत्रिमंडळ उपसमितीच्या निर्णयाचा ‘या’ जिल्ह्यांना होणार लाभ
● औरंगाबाद – १२६७९ हेक्टर क्षेत्र
● जालना- ६७८ हेक्टर क्षेत्र
● परभणी- २५४५.२५ हेक्टर क्षेत्र
● हिंगोली- ९६६७७ हेक्टर क्षेत्र
● बीड- ४८.८० हेक्टर क्षेत्र
● लातूर- २१३२५१ हेक्टर क्षेत्र
● उस्मानाबाद- ११२६०९.९५ हेक्टर क्षेत्र
● यवतमाळ- ३६७११.३१ हेक्टर क्षेत्र
● सोलापूर- ७४४४६ हेक्टर क्षेत्र

एकूण क्षेत्र- ५ लाख ४९ हजार ६४६.३१ हेक्टर क्षेत्र
एकूण निधी – सुमारे ७५५ कोटी रुपये

 


तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇

  • Good News : राज्यातील शेतकऱ्यांसाठी 2 लाख सौर कृषिपंप ; उपमुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय
  • बाबो ! शेतकऱ्याने आपटला कुदळ अन् सापडला 5 व्या शतकातील खजिना ; तज्ज्ञांनीही केला दावा

 




 

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: अतिवृष्टीउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसनैसर्गिक आपत्तीमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Previous Post

Good News : राज्यातील शेतकऱ्यांसाठी 2 लाख सौर कृषिपंप ; उपमुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय

Next Post

सहकारी बँकांच्या ‘एनपीए’चे प्रमाण कमी करण्यासाठी प्रयत्न करा – सहकार मंत्री अतुल सावे

Next Post
एनपीए

सहकारी बँकांच्या ‘एनपीए’चे प्रमाण कमी करण्यासाठी प्रयत्न करा – सहकार मंत्री अतुल सावे

Comments 3

  1. Yogesh dilwale says:
    3 years ago

    Aurangabad la nuksan bharpai
    Milalich nahi

  2. Pingback: नाशिक महापालिकेचे खत प्रकल्पातील ट्रेनिंग सेंटर आणि वेस्ट टू एनर्जी प्रकल्प चालविण्यास ‘महाप्
  3. Pingback: कृषीपूरक उद्योगांच्या माध्यमातून रोजगार‍ निर्मितीला चालना देणार - दादाजी भुसे - Agro World

ताज्या बातम्या

साखर आयुक्त

साखर आयुक्त सिद्धराम सालिमठ यांची सहा महिन्यातच बदली!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
September 17, 2025
0

पावसाचा इशारा

राजस्थानमधून मान्सूनच्या माघारीला सुरुवात; राज्यात ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पावसाचा मुक्काम..! पहा राज्यासह जिल्हानिहाय अंदाज

by टीम ॲग्रोवर्ल्ड
September 15, 2025
0

GST सुधारणांमुळे कृषी क्षेत्राच्या शेअर्समध्ये तेजी ; पहा कोणत्या कृषी कंपन्यांचे किती शेअर्स वधारले

GST सुधारणांमुळे कृषी क्षेत्राच्या शेअर्समध्ये तेजी ; पहा कोणत्या कृषी कंपन्यांचे किती शेअर्स वधारले

by टीम ॲग्रोवर्ल्ड
September 13, 2025
0

राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढणार

राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढणार ; पहा 18 सप्टेंबरपर्यंतची विभाग व जिल्हानिहाय स्थिती

by टीम ॲग्रोवर्ल्ड
September 12, 2025
0

राज्यातील धरणांत 87 टक्के साठा

राज्यातील धरणांत 87 % साठा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
September 10, 2025
0

कृषी आधारित अर्थव्यवस्थेला चालना

जीएसटी घटल्याने कृषी आधारित अर्थव्यवस्थेला चालना…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
September 5, 2025
0

नव्या अमेरिकी टेरिफचा कोणत्या देशांना काय फायदा..

नव्या अमेरिकी टेरिफचा कोणत्या देशांना काय फायदा..

by टीम ॲग्रोवर्ल्ड
September 5, 2025
0

आता फक्त 5% जीएसटी

शेती यंत्रसामग्री, ट्रॅक्टर, खतांवर आता फक्त 5% जीएसटी

by टीम ॲग्रोवर्ल्ड
September 4, 2025
0

भारतीय बासमतीवर 50% टेरिफ

पाकिस्तानच्या बासमतीची अमेरिकी बाजारात होणार चांदी!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
September 4, 2025
0

कपास किसान ॲप

कापूस विकण्यासाठी आता घरबसल्या करा देशभरातील बाजार समित्यांत बुकिंग!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
September 4, 2025
0

तांत्रिक

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

जगाच्या पाठीवर

साखर आयुक्त

साखर आयुक्त सिद्धराम सालिमठ यांची सहा महिन्यातच बदली!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
September 17, 2025
0

पावसाचा इशारा

राजस्थानमधून मान्सूनच्या माघारीला सुरुवात; राज्यात ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पावसाचा मुक्काम..! पहा राज्यासह जिल्हानिहाय अंदाज

by टीम ॲग्रोवर्ल्ड
September 15, 2025
0

GST सुधारणांमुळे कृषी क्षेत्राच्या शेअर्समध्ये तेजी ; पहा कोणत्या कृषी कंपन्यांचे किती शेअर्स वधारले

GST सुधारणांमुळे कृषी क्षेत्राच्या शेअर्समध्ये तेजी ; पहा कोणत्या कृषी कंपन्यांचे किती शेअर्स वधारले

by टीम ॲग्रोवर्ल्ड
September 13, 2025
0

राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढणार

राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढणार ; पहा 18 सप्टेंबरपर्यंतची विभाग व जिल्हानिहाय स्थिती

by टीम ॲग्रोवर्ल्ड
September 12, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Home
  • Services

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.