• Home
    • आमच्याविषयी
AgroWorld
Advertisement
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

दुर्दैवी, देशात दररोज 145 शेतकरी, शेतमजूर, रोजंदारी मजूर करताहेत आत्महत्या; महाराष्ट्रात सर्वाधिक आत्महत्या

मोदी सरकारच्या नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोने (NCRB) तयार केलेल्या अहवालातून समोर आले भीषण वास्तव

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 6, 2023
in हॅपनिंग
0
दुर्दैवी, देशात दररोज 145 शेतकरी, शेतमजूर, रोजंदारी मजूर करताहेत आत्महत्या; महाराष्ट्रात सर्वाधिक आत्महत्या
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

देशात दररोज 145 शेतकरी, शेतमजूर, रोजंदारीवरील मजूर आत्महत्या करत आहेत. नरेंद्र मोदी सरकारच्या नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोने (NCRB) तयार केलेल्या अहवालातूनच हे भीषण, दुर्दैवी वास्तव समोर आले आहे. शेतकरी आत्महत्यांचे सर्वाधिक प्रमाण महाराष्ट्रात आहे.

दुष्काळ, नापिकी, पूर संकट तसेच शेतमालाला योग्य हमीभाव न मिळणे अशा अनेक कारणांनी शेतकरी हताश, निराश झाले आहेत. आहे. राज्यात गेल्या सहा महिन्यात 1,500 हून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. बहुतांश शेतकरी गळफास लावून किंवा विष प्राशन करून मृत्यूला कवटाळत आहेत.

महाराष्ट्रात सर्वाधिक आत्महत्या

2022 मध्ये एकूण 1 लाख 70 हजार आत्महत्या झाल्या. 2021 मध्ये 1 लाख 64 हजार आत्महत्या नोंदविल्या गेल्या होत्या. त्या तुलनेत गेल्या वर्षी आत्महत्यांचे प्रमाण 4 टक्क्यांनी जास्त आहे. सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रात (37.6 टक्के), कर्नाटक (21.2 टक्के), आंध्र प्रदेश (8.1 टक्के) या राज्यात झाल्या. याखालोखाल, तामिळनाडूमध्ये 6.4 टक्के आणि मध्य प्रदेशमध्ये 5.7 टक्के आत्महत्या झाल्या.

असंघटित क्षेत्रातील आत्महत्यांपैकी 33% शेती क्षेत्रात

NCRB अहवालानुसार, गेल्या वर्षी 2022 मध्ये भारतात दररोज 114 रोजंदारी कामगार तसेच 31 शेतकरी आणि शेतमजूरांनी आत्महत्या केल्या आहेत. असंघटित क्षेत्रातील पुरुषांच्या एकूण 41,433 आत्महत्यांपैकी 33 टक्के आत्महत्या रोजंदारी मजूर, शेतकरी आणि शेतमजूर यांचा आहे. त्यापैकी 30,143 (26.4 टक्के) रोजंदारीवर होते. शेती क्षेत्रात गुंतलेल्यांनी 11,290 आत्महत्या (6.6 टक्के) केल्या आहेत, त्यापैकी 5,207 शेतकरी आणि 6,083 शेतमजूर आहेत.

Aanand Agro Care

असंघटित क्षेत्रातील पुरुष वैफल्यग्रस्त

गेल्यावर्षीच्या देशातील एकूण आत्महत्यांपैकी 30,143 म्हणजे 33% रोजंदारी मजूर, 5,207 शेतकरी आणि ६6,083 शेतमजूर आहेत. आत्महत्यांच्या एकूण ओझ्यामध्ये शेती क्षेत्राचा वाटा 6.6% आणि रोजंदारी मजुरांचा 26.4% आहे. एकूण 41,433 आत्महत्या असंघटित क्षेत्रातील पुरुषांनी केल्या आहेत. NCRB अहवालानुसार, “कौटुंबिक समस्या” आणि “आजार” ही आत्महत्येची प्राथमिक कारणे आहेत.

महिला शेतकरीही करताहेत आत्महत्या

या वर्षभरात महिला वर्गात 208 शेतकरी, 611 शेतमजूर आणि 3,752 रोजंदारी कामगारांच्या आत्महत्या झाल्या. आत्महत्येने मरण पावलेल्यात 40,894 (23.9 टक्के) मॅट्रिक किंवा माध्यमिक स्तरापर्यंत शिकलेले आहेत, तर 30,810 (18 टक्के) प्राथमिकहून जास्त शिकलेले आहेत. एकूण संख्येपैकी कॉलेज शिक्षित 15.9 लोकांचा समावेश होता, तर 14.5 टक्के प्राथमिक शिक्षित आणि 11.5 टक्के निरक्षर होते. आत्महत्येमुळे झालेल्या एकूण मृत्यूंपैकी पदवीधर आणि पदव्युत्तर पदवीधारकांचे प्रमाण 5.2 टक्के आहे.

Wasan Toyota

आत्महत्या रोखल्याचे सरकारी दावे तथ्यहीन

अहवालात नमूद करण्यात आले आहे की, 58.2 टक्के लोकांनी गळफास लावून घेतला, 25.4 टक्के लोकांनी विष प्राशन केले तर 5 टक्के लोकांचा बुडून मृत्यू झाला. प्रख्यात कृषी तज्ज्ञ देविंदर शर्मा यांनी शेती क्षेत्रातील चिंताजनक स्थितीबद्दल चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, “सरकार आणि संबंधित अधिकार्‍यांकडून फक्त दावे केले जातात. मात्र, कृषी संकट गंभीरपणे कायम आहे. धोरणकर्त्यांनी शेतीच्या उत्पन्नाची तळागाळातून स्थिती ओळखण्याची गरज आहे. शेती क्षेत्राचे पुनरुज्जीवन करण्यासाठी राजकीय वचनबद्धतेची आवश्यकता आहे.”

 

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल. 👇

  • दक्षिण भारतातील समुद्रात केली जाणारी लाल शेवाळाची सागरी शेती
  • शाश्वत विकास परिषदेत शेतकरी गटाचा सन्मान

Share this:

  • Facebook
  • X
Tags: आत्महत्यानॅशनल क्राईम रेकॉर्डशेतकरीशेतमजूर
Previous Post

दक्षिण भारतातील समुद्रात केली जाणारी लाल शेवाळाची सागरी शेती

Next Post

सेंद्रिय खत (Organic Manure): शाश्वत शेतीसाठी वरदान

Next Post
सेंद्रिय खत (Organic Manure): शाश्वत शेतीसाठी वरदान

सेंद्रिय खत (Organic Manure): शाश्वत शेतीसाठी वरदान

ताज्या बातम्या

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ

मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 19, 2025
0

मान्सून कोकणात धडकणार या तारखेला… !

मान्सून कोकणात धडकणार या तारखेला… !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 16, 2025
0

केळी लागवडीचे यशस्वी रहस्य

🌱 “केळी लागवडीचे यशस्वी रहस्य – रेवा फ्लोरा टिशू कल्चर !” 🍌

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 14, 2025
0

मान्सून अंदमानात

मान्सून अंदमानात… पुढील प्रवास कसा असणार ?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 14, 2025
0

IMD

IMD – जळगाव, नाशिकसह या जिल्ह्यांना यलो अलर्ट !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 13, 2025
0

बंगालच्या उपसागरात मान्सूनची चाहूल

काय..! मेच्या मध्यातच बंगालच्या उपसागरात मान्सूनची चाहूल ; काय म्हणाले माणिकराव खुळे

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 8, 2025
0

पीएम किसान

20 व्या हप्त्यापूर्वी पीएम किसान योजनेत मोठा बदल

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 6, 2025
0

देवगड हापूस हंगाम संपला..

देवगड हापूस हंगाम संपला..! ॲग्रोवर्ल्ड मार्फत आता पुढच्या वर्षी गुढीपाडव्यालाच देवगड हापूसचा मुहूर्त 🥭

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 6, 2025
0

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठे ठेवा – शिवकुमार एस

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठे ठेवा – शिवकुमार एस

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 5, 2025
0

तांत्रिक

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

हळद साठवणूक

हळद साठवणूक प्रक्रिया

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 26, 2025
0

जगाच्या पाठीवर

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ

मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 19, 2025
0

मान्सून कोकणात धडकणार या तारखेला… !

मान्सून कोकणात धडकणार या तारखेला… !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 16, 2025
0

केळी लागवडीचे यशस्वी रहस्य

🌱 “केळी लागवडीचे यशस्वी रहस्य – रेवा फ्लोरा टिशू कल्चर !” 🍌

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 14, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Home

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.