• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

लष्करी अळीनंतर राज्यावर टोळधाडीचे संकट…!

Team Agroworld by Team Agroworld
January 8, 2020
in तांत्रिक
0
लष्करी अळीनंतर राज्यावर टोळधाडीचे संकट…!
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

गुजरात मार्गे महाराष्ट्रात प्रवेश केल्याने कृषी विभाग व शेतकरी सतर्क

यावर्षी राज्यात दमदार मान्सून बरसल्यानंतर रब्बी हंगामाकडून शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या आहेत. अवकाळी पावसाने खरीप हंगाम जवळपास उध्वस्त झालेला आहे. अवकाळी पाऊस आणि लष्करी अळीच्या कहरातून शेतकरी सावरत असतांनाच नवीन अस्मानी संकट राज्याच्या सीमेवर येऊन ठेपले आहे. गुजरात राजस्थान मार्गे राज्यात टोळधाड येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.


       टोळधाड काही वेळातच शेतातील संपूर्ण पिक फस्त करते. त्यामुळे रब्बीच्या हंगामावर मोठे संकट आले आहे. कृषी विभागाकडून या टोळधाडीपासून पिकांचा बचाव करण्यासाठी जनजागृती कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे.

असे करा नियंत्रण
* अंडी घातलेल्या जागा शोधून त्याभोवती चर खोदणे
* पुढे येणाऱ्या टोळाना अटकाव करण्यासाठी दोन फुट रुंद व अडीच फुट खोलीचा चर खोदावा
* टोळ प्रादुर्भावग्रस्त शेतात सायंकाळी टायर किंवा तत्सम पदार्थ जाळून धूर करावा
* थव्यात पिलांची संख्या अधिक असल्यास प्रति हेक्टरी अडीच किलो याप्रमाणे निमतेलाची  करावी
* मिथिल पॅिरिथऑनची दोन टक्के भुकटीची २५ ते ३० किलो प्रति हेक्टरी याप्रमाणे शेतात धुराळणी करावी.

.


काय आहे टोळ

संधिपाद संघातील कीटक वर्गाच्या ऑरर्थाप्टेरा (ऋजू पंखी) गणातील अ‍ॅक्रिडिटी कुलातील नऊ जातींच्या कीटकांना टोळ म्हणतात. टोळाचे इंग्रजी भाषेतील ‘लोकस्ट’ हे नाव लॅटिन भाषेतून आलेले असून त्याचा अर्थ ‘जळालेली जमीन’ असा होतो. टोळधाड येऊन गेल्यावर जमीन जळून गेल्यासारखी दिसते. टोळ जगभर सर्वत्र आढळत असून आफ्रिका खंडात त्यांचा उपद्रव जास्त आहे. स्थल आणि रंगानुसार त्यांना वाळवंटी, प्रवासी, मुंबई, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, मोरक्की, डोंगरी, तांबडे व तपकिरी टोळ अशी नावे देण्यात आली आहेत. भारतात शिश्टोसर्का ग्रिगेरिया ही जाती मोठ्या प्रमाणावर आढळते. तिच्यामुळे वनस्पतींचे अतोनात नुकसान होते.

.

टोळ

टोळ टोळाचे शरीर अरुंद, लांब, दंडगोलाकार आणि व्दिपार्श्वसममित असून लांबी ८ सेंमी. पर्यंत वाढू शकते. रंग पिवळा, तपकिरी, हिरवट वा राखाडी असून त्यावर वेगवेगळ्या रंगांचे ठिपके व रेषा असतात. शरीराचे डोके, वक्ष व उदर असे तीन भाग असतात. डोळे मोठे असून मुखांगे गवत व पाने चावण्यायोग्य असतात. शृंगिका आखूड असतात. वक्ष भागात पायांच्या तीन जोड्या असतात. पहिली जोडी सर्वांत लहान आणि तिसरी जोडी सर्वांत मोठी व दणकट असते. नर लहान असून उदराचा शेवटचा भाग गोल व वरच्या बाजूस वळलेला असतो. मादी मोठी असून तिच्या उदराच्या शेवटच्या भागामधून टोकदार अंडनिक्षेपक निघते. त्याला चार टोकदार अवयव असतात. अंडी घालताना अंडनिक्षेपक मातीत खुपसण्यासाठी त्यांचा उपयोग होतो. ओलसर मातीत मादी ७.५–१५ सेंमी. भोक पाडून ३–६ महिन्यांच्या काळात ३००–५०० अंडी घालते. अंडी एकमेकाला चिकट स्रावाने जोडलेली असून शेंगेप्रमाणे दिसतात. अंड्यांतून १२–१४ दिवसांनी पंखविरहीत पिले बाहेर पडतात. पिले पाचवेळा कात टाकून चार आठवड्यांनी प्रौढावस्थेत जातात. जीवनचक्र अर्धरूपांतरण पद्धतीचे असून त्यात अंडी, उड्या मारणारी पिले व पंख असलेले टोळ असे टप्पे असतात.

टोळांमध्ये द्विरूपता दिसून येते; परिस्थितीनुसार त्यांची दोन रूपे आढळतात. एकाकी अवस्था आणि सांघिक अथवा थव्याची अवस्था. एकाकी रूपात टोळ सुस्त व निरुपद्रवी असतात. या रूपातील टोळांची पिले रंगाने हिरवी असून त्यांवर काळ्या रंगाच्या खुणा असतात. प्रौढ टोळ लहान, करड्या रंगाचे व लहान पंखांचे असतात. याउलट, सांघिक रूपातील टोळ अस्थिर व प्रक्षुब्ध असतात. या रूपातील पिले गुलाबी काळ्या रंगाची असून शरीरावर मधोमध पुसट काळी रेघ असते. प्रौढ टोळ आकारमानाने मोठे, पिवळे अगर तांबूस छटा व आणि करड्या खुणा असलेले असतात. यांचे पंख आणि पाय मोठे व मजबूत असतात. त्यांच्या एकाकी रूपाला नाकतोडा (ग्रास हॉपर) तर सांघिक रूपाला टोळ (लोकस्ट) म्हणतात. जेव्हा एकाकी टोळ मोठ्या संख्येने एकत्र येतात तेव्हा त्यांच्या रूपात बदल होतो आणि त्यांना सांघिक रूप प्राप्त होते. टोळ एकत्र आल्यावर त्यांचे मागचे पाय परस्परांना घासल्याने शरीरात ‘सेरोटोनीन’ या रसायनाचे प्रमाण वाढते. त्यामुळे टोळांचा रंग बदलतो. ते जास्त खातात व लवकर प्रजननक्षम होतात. परिणामी प्रजननाचा वेग वाढून त्यांची संख्या वाढते.

टोळांच्या सांघिक संचाराला ‘टोळधाड’ असे नाव आहे. टोळांची उड्या मारणारी पिले वाटेत मिळेल त्या झाडाझुडपांची आणि पिकांची पाने खातात. टोळधाडीचा विस्तार ५००–८०० चौ. किमी. पर्यंत असू शकतो. भारतात गेल्या शंभर वर्षांत प्रत्येक वेळी ५–७ वर्षे टिकणाऱ्या १० टोळधाडींची नोंद करण्यात आली आहे.

टोळांवर नियंत्रण राखण्यासाठी कीटकनाशके फवारतात, तसेच टोळ हाताने पकडून मारतात. जमीन नांगरल्याने टोळांची अंडी नष्ट होतात. टोळ असलेल्या ठिकाणी कवकांची सुकलेली बीजुके टाकतात. ही बीजुके टोळाच्या शरीरात जाऊन अंकुरतात. त्यामुळे टोळ मरतात. टोळधाड पिकांवर उतरू नये म्हणून काही वेळा पत्र्याचे रिकामे डबे वाजवितात. तसेच पांढरी फडकी हवेत हलवितात.

मासे पकडण्यासाठी टोळ आमिष म्हणून गळाला लावतात. कोंबड्यांना ते प्रथिन-खाद्य म्हणून देतात. अनेक देशांत टोळ खाल्ले जातात. जीवशास्त्रीय संशोधनासाठी त्यांचा वापर केला जातो. गंध-संवेदना, दृश्य-संवेदना, स्पर्श-संवेदना, हालचाल-संवेदना आणि चेतासंस्था यांवरील प्रयोगांमध्ये ते वापरले जातात.     

.

साभार –
प. वि. सोहनी
समन्वयक, संपादन समिती, कुमार विश्वकोश जीवसृष्टी आणि पर्यावरण; एम्‌. एस्‌सी., पीएच्‌. डी..

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: टोळधाडमिथिल पॅिरिथऑन
Previous Post

डॉ.पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन (सेंद्रीय शेती)

Next Post

शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करणे

Next Post
शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करणे

शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करणे

ताज्या बातम्या

खान्देशच्या मातीत बांबूच्या शेतीतून वर्षाला तब्बल 25 लाखांचा नफा !

खान्देशच्या मातीत बांबूच्या शेतीतून वर्षाला तब्बल 25 लाखांचा नफा !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 18, 2025
1

धराक्षा इकोसोल्युशन्स : पिकांच्या अवशेषांचे सोने करणारे स्टार्ट अप !

धराक्षा इकोसोल्युशन्स : पिकांच्या अवशेषांचे सोने करणारे स्टार्ट अप !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 16, 2025
0

गावठी कोंबडीचा स्टार्ट-अप

आईसोबत तरुणाने सुरु केला गावठी कोंबडीचा स्टार्ट-अप; आज 45 कोटींचा व्यवसाय !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 15, 2025
0

खान्देशातील धरणे फुल्ल

खान्देशातील धरणे फुल्ल; रब्बी “नो टेन्शन”; मका, भाजीपालासह रब्बी क्षेत्र वाढीचा अंदाज

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 14, 2025
0

अमेरिकेत विक्रमी मका उत्पादन

अमेरिकेत विक्रमी मका उत्पादन; निर्यातीसाठी दबाव

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 14, 2025
0

राज्यातून मान्सून माघारीला सुरुवात

राज्यातून मान्सून माघारीला सुरुवात; येत्या 24 तासात संपूर्ण महाराष्ट्रातून होणार एक्झिट – आयएमडी

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 13, 2025
0

हवामान दुष्चक्र

हवामान दुष्चक्र: युरोपात उष्णतेच्या लाटेने घेतले 62 हजार बळी!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 11, 2025
0

हुश्श… रिटर्न मान्सून दोन दिवसात राज्यातून परतणार; अशी असेल वाटचाल – आयएमडी

हुश्श… रिटर्न मान्सून दोन दिवसात राज्यातून परतणार; अशी असेल वाटचाल – आयएमडी

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 10, 2025
0

हवामान विभागा

आजचा दिवस पावसाचा! “या” जिल्ह्यांसाठी हवामान विभागाचा अलर्ट जारी

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 9, 2025
0

Agriculture Minister Dattatray Bharane

Agriculture Minister Dattatray Bharane Receives Invitation for AgroWorld Agricultural Expo

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 8, 2025
0

तांत्रिक

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

जगाच्या पाठीवर

खान्देशच्या मातीत बांबूच्या शेतीतून वर्षाला तब्बल 25 लाखांचा नफा !

खान्देशच्या मातीत बांबूच्या शेतीतून वर्षाला तब्बल 25 लाखांचा नफा !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 18, 2025
1

धराक्षा इकोसोल्युशन्स : पिकांच्या अवशेषांचे सोने करणारे स्टार्ट अप !

धराक्षा इकोसोल्युशन्स : पिकांच्या अवशेषांचे सोने करणारे स्टार्ट अप !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 16, 2025
0

गावठी कोंबडीचा स्टार्ट-अप

आईसोबत तरुणाने सुरु केला गावठी कोंबडीचा स्टार्ट-अप; आज 45 कोटींचा व्यवसाय !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 15, 2025
0

खान्देशातील धरणे फुल्ल

खान्देशातील धरणे फुल्ल; रब्बी “नो टेन्शन”; मका, भाजीपालासह रब्बी क्षेत्र वाढीचा अंदाज

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 14, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.

EnglishEnglish