Home तंत्रज्ञान / हायटेक Matsya Palan Vyavsay : शेतीला जोडधंदा ! बायोफ्लॉक तंत्राच्या सहाय्याने करा मत्सपालन

Matsya Palan Vyavsay : शेतीला जोडधंदा ! बायोफ्लॉक तंत्राच्या सहाय्याने करा मत्सपालन

Matsya Palan Vyavsay

मुंबई : Matsya Palan Vyavsay… देशात सर्वच क्षेत्रात मोठ्या झपाट्याने बदल होत आहेत. यात शेती क्षेत्र देखील मागे नाही. शेती क्षेत्रात नवनवीन तंत्रज्ञान तसेच जोडधंद्याच्या सहाय्याने चांगले उत्पादन घेतले जात आहे. असेच एक तंत्रज्ञान सध्या शेतीला जोडधंदा म्हणून चांगलेच प्रचलित झाले आहे. बायोफ्लॉक तंत्र असे या तंत्रज्ञानाचे नाव असून याच्या सहाय्याने कोणतेही खोदकाम न करता किंवा तलाव तयार न करता मत्सपालन करता येत आहे. चला तर मग जाणून घेवू या नेमके तंत्रज्ञान आहे तरी काय…

मत्सपालन म्हटले की डोळ्यासमोर येते ते नद्या आणि तलाव. मात्र बायोफ्लोक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने तलाव न खोदता टाकीत मत्स्यशेती करता येणे शक्य आहे. बायोफ्लोक हे एका जीवाणूचे नाव असून या तंत्रात 10 ते 15 हजार लिटर पाण्याच्या टाक्यांमध्ये मत्सपालन करून उत्पादन घेतले जाते. या टाक्यांमध्ये पाणी भरणे, घाण पाणी काढणे, पाण्याला ऑक्सिजन देणे अशी सर्व व्यवस्था असल्याने शेतकर्‍यांना देखील या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने मत्सपालन करणे सोयीचे ठरत आहे. बायोफ्लॉक तंत्रज्ञानामुळे कमी पाण्यात आणि कमी खर्चात जास्त मासे तयार करता येतात.

अ‍ॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन @ नाशिक – 6 ते 9 जानेवारी 2023 
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇
https://youtu.be/8SNwMAz8j-8

असे कार्य करते बायोफ्लॉक तंत्रज्ञान

बायोफ्लॉक तंत्रज्ञानात बॅक्टेरियाचा वापर करून टाकी प्रणालीमध्ये मत्स्यपालन केले जाते. हे जीवाणू माशांच्या विष्ठेचे आणि वाया जाणार्‍या अन्नाचे प्रोटीन पेशींमध्ये रूपांतर करतात आणि ही प्रथिने पेशी माशांचे अन्न म्हणून काम करतात. मासे जे खातात त्यापैकी 75 टक्के उत्सर्जन करतात. ही विष्ठा पाण्याच्या आत राहते. त्याच स्टूलच्या शुद्धीकरणासाठी बायोफ्लॉकचा वापर केला जातो. बायोफ्लॉक हा जीवाणू या स्टूलचे प्रोटीनमध्ये रूपांतर करतात, जे मासे खातात. अशाप्रकारे एक तृतीयांश फीड वाचतो. बायोफ्लॉक जीवनसत्त्वे आणि खनिजे, विशेषत: फॉस्फरसचा देखील चांगला स्रोत आहे.

Jain Irrigation

3 क्विंटल माशांचे उत्पादन

बायोफ्लॉक तंत्रज्ञानात 10 हजार लिटर क्षमतेची टाकी बनवण्यासाठी साधारणत: 35 हजार तर एका टाकीत मत्स्यपालन करण्यासाठी 30 हजार रुपयांपर्यंत खर्च येतो. एक टाकी किमान 5 वर्षे टिकते त्यात वर्षातून दोनदा मत्स्यपालन करता येते. आणि त्यातून सुमारे 3 क्विंटल मासे तयार होतात. बायोफ्लॉक तंत्रज्ञानाद्वारे तिलापिया, मांगूर, केवो, कमनकर यासारख्या अनेक प्रजातींच्या माशांचे उत्पादन घेता येवू शकते. या तंत्रामुळे शेतकरी 1 लाख रुपये खर्च करून वर्षाला 1 ते 2 लाख रुपये कमवू शकतो.

Panchaganga Seeds

असे आहेत फायदे?

बायोफ्लॉक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मत्स्यपालन करण्यासाठी फक्त जागेची आवश्यकता असल्याने तलाव खोदण्याची गरज नाही. त्यामुळे जमीन कोणतीही व कशीही असली तरी चालेल. या तंत्राच्या सहाय्याने ग्रामीण भागातच नव्हे तर शहरांमध्येही मत्स्यपालन करता येणे शक्य आहे. या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पाण्याची मोठी बचत होते तसेच या टाक्यांची साफसफाई सहज करता येते. एका टाकीतील माशांमध्ये कोणताही रोग आढळल्यास तो दुसर्‍या टाकीत पसरण्याचा धोका नसतो. त्यामुळे हे तंत्रज्ञान शेतकर्‍यांसाठी मोठे फायदेशीर आहे.

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇