• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

इडा पीडा जावो आणि बळीचे राज्य येवो !!

इतिहासाचे अभ्यासक डॉ. आ. ह. साळुंखे यांनी बळीवंश पुस्तकात सांगितलेली बळीची कथा आजच्या दीपावली पाडवा, बळीप्रतिपदानिमित्त...

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 14, 2023
in हॅपनिंग
0
इडा पीडा जावो आणि बळीचे राज्य येवो !!
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

बळीराजा हा शेतकऱ्यांचा राजा होता. आजही शेतकऱ्याला बळीराजा असे म्हंटले जाते. ग्रामीण भागात दर दिवाळी-दसऱ्याला आमच्या माता-बहिणी “इडा पीडा जावो आणि बळीचे राज्य येवो” असे म्हणून घरातील पुरुषांना ओवाळतात. चार हजार वर्षापूर्वी बळीराजाचे राज्य संपूर्ण आशिया खंडात होते. वामन-बळीराजा युद्ध भाद्रपद महिन्यात झाले म्हणून भाद्रपद महिन्याच्या पित्तरपाटामध्ये श्राद्ध घालून श्रद्धांजली वाहिली जाते. शेणाचा भालदेव बसवतात. 15 दिवस सुतक पळून बळीराजाच्या शूर सैनिकांना श्रद्धांजली वाहतात. भालदेव म्हणजे बळीराजा. खंडोबा, म्हसोबा, मल्हार, मार्तंड हे बळीराजाच्या मंत्रिमंडळातील हुशार व कार्यक्षम मंत्री होत.

 

 

बळीराजाचे राज्य होते नऊखंडी

बळीराजाचे राज्य नऊखंडी होते. आजच्या अफगाणिस्तानापासून ते मलेशियाच्या बाली बेटापर्यंत बळीराजाचे साम्राज्य पसरलेले होते. प्रत्येक खंडाच्या प्रमुखाला खंडोबा म्हंटले जात असे. आज जसे भारतात अनेक राज्य आहेत व प्रत्येक राज्याच्या प्रमुखाला मुख्यमंत्री म्हंटले जाते, त्याचप्रमाणे खंडाचा प्रमुख खंडोबा होय. प्रत्येक खंडात छोटे-छोटे सुभे असायचे. अनेक सुभ्यांचे मिळून एक महासुभा असायचा. या महासुभ्याचा प्रमुख तो महासुभेदार म्हणजेच म्हसोबा होय. त्याचप्रमाणे सुभ्याचा प्रमुख जोतिबा, मल्हार व मार्तंड हे सुरक्षा अधिकारी होत. आज केवळ बळीराजाचीच पूजा होते असे नाही तर त्याच्या या मंत्री व अधिकाऱ्यांचीही पूजा होते. यावरून बळीचे राज्य प्रजेला किती सुखी व संपन्न ठेवत

 

 

 

भारताच्या सांस्कृतिक इतिहासातील उत्तुंग व्यक्तिमत्व

बळी राजा म्हणजे सात काळजाच्या आत जपून ठेवावा, असा निरागस ‘माणूस’… आपल्या प्रजेतील प्रत्येक व्यक्तीला तिच्या कष्टाचे व हक्काचे फळ सम्यक रीतीने विभागून देणारा संविभागी नेता… भारतीयांचे वास्तव आणि विधायक पूर्वसंचित असलेला कृती, प्रकृती आणि संस्कृती यांचा तजेलदार मोहर…. बळी – हिरण्यकश्यपचा पणतू, प्रल्हादाचा नातू, विरोचानाचा पुत्र, कपिलाचा पुतण्या आणि बाणाचा पिता. भारताच्या सांस्कृतिक इतिहासातील एक अत्यंत उत्तुंग व्यक्तिमत्व… सुमारे साडे तीन ते पाच हजार वर्षापूर्वी होवून गेलेला भारतीय बहुजन समाजाचा एक महानायक, एक महासम्राट, एक महातत्ववेत्ता… या बळीचा वंश तो बळीवंश. या बळीवंशातील माणसे-आपली माणसे, आपल्या रक्तामासाची माणसे आणि मुख्य म्हणजे आपल्या विचारांची माणसे… ज्यांनी स्वातंत्र्यासाठी आपले प्राण गमावणे पत्करले, पण तत्वांशी द्रोह केला नाही, आपल्या श्वासोच्छवासावर दडपणे लादून घेणे मान्य केले नाही, अशी माणसे.

 

“बहुजन हिताय, बहुजन सुखाय”साठी समर्पित राज्य

बळीराजा हे एक कतृत्ववान आदर्श राजे होते, ज्यांनी आपले राज्य बहुजन हिताय, बहुजन सुखायसाठी समर्पित केले होते. आपल्या राज्यातील प्रजेचे हित लक्षात घेता त्यांनी प्रजेचा विकास आणि संरक्षणांकडे अधिक लक्ष दिले. त्यांनी कोणताही वर्ण, जात, धर्म पंथ पाहिला नाही. न्याय करताना कधीही भेदभाव केला नाही. म्हणूनच ते उदारमतवादी, मोठ्या मनाचे. शूर पराक्रमी, अनेक गुणसंपन्न, बलवान, मितभाषी, शत्रूना रणांगणात पाठ न दाखविणारे, समान विभागणी करणारे, योग्य काळाची वाट पाहणारे, सत्य शील, सर्वाविषयी सावध असे महान राजे होते. बळीराजा हे शेतकऱ्यांवर कुठे अन्याय अत्याचार घडत असतील तर लगेच ते शत्रुस कठोर शासन करीत होते. या त्यांच्या आदर्श कार्य कतृत्वामुळेच भयभीत झालेल्यानी कपटाने त्यांची हत्या केली, असा दावा काही जण करतात. बळी राजा हे गोर गरीबांना न्याय, हक्क देणारे होते, म्हणूनच आजही आपल्या समाजामध्ये एक प्रचलित म्हण आहे ‘बळी तो कान पिळी’.

 

नाशिकमध्ये आहे देशातील एकमेव बळी मंदिर

बळी हे उत्तम शेतकरी, त्यांनीच भरली धान्याची कोठारे

बळीराजा… सात काळजात जपून ठेवावा असा ’जिवलग’. सुमारे तीन-चार हजार वर्षांपूर्वी बळीराजाच्या पूर्वजांनी केलेल्या उत्तम शेतीमुळे पिकलेल्या धान्याने सिंधूसंस्कृतीमधील धान्याची कोठारे भरली होती. बळीराजानेही आपल्या पूर्वजांचे अनुसरण करीत, पण त्यांच्यापेक्षा अधिक कौशल्याने, पेरणी सुरू केली. पेरणी धान्याची होती. पेरणी संस्कृतीचीही होती. पेरणी जीवनमूल्यांची होती, पेरणी जगण्याच्या कलेची होती. पेरणी रक्तमांसाची होती आणि माणसासाठी नव्या नव्या स्वप्नांचीही होती. तेव्हापासून बळीराजा प्रत्येक पिढीच्या श्वासोच्छवासात वसत आहे, रक्तवाहिन्यांतून वाहत आहे, बहुजनांच्या उराउरांतून धडधडत आहे. घराघरातून बहरत आहे, रक्तवाहिन्यांतून वाहत आहे, उत्कट जिज्ञासेने सृष्टीच्या आणि जीवनाच्या नव्या-नव्या रहस्यांचा शोध घेत आहे. बहुजन समाजाच्या दृष्टीने बळीवंश आणि त्याच्या प्रवाहातील असंख्य व्यक्ती जमिनीत अदृश्य असलेल्या मुळांसारख्या आहेत.

कंटेंट सौजन्य : निलेश रजनी भास्कर कळसकर (प्रबोधन टीम)

 

 

Aanand Agro Care

 

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल. 👇

  • कापूस भाव : गेल्या वर्षी दहा हजारी पार, यंदा काय आहे स्थिती? कापूस ठेवावा की आताच विकून मोकळे व्हावे?
  • राज्यातील शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कापले जाणार नाही!

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: दिपावली पाडवाबळीचे राज्यबळीराजा
Previous Post

कापूस भाव : गेल्या वर्षी दहा हजारी पार, यंदा काय आहे स्थिती? कापूस ठेवावा की आताच विकून मोकळे व्हावे?

Next Post

पीएम किसानचा 15 वा हप्ता खात्यात आला की नाही ?… असे करा चेक

Next Post
पीएम किसान

पीएम किसानचा 15 वा हप्ता खात्यात आला की नाही ?... असे करा चेक

ताज्या बातम्या

महावितरणचे विभाजन; कृषी ग्राहकांसाठी ‘एमएसईबी सोलर ॲग्रो पॉवर’ ही नवी वीज कंपनी

महावितरणचे विभाजन; कृषी ग्राहकांसाठी ‘एमएसईबी सोलर ॲग्रो पॉवर’ ही नवी वीज कंपनी

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 5, 2026
0

गुड न्यूज! मान्सून केरळमध्ये दाखल

गुड न्यूज! मान्सून केरळमध्ये दाखल

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 4, 2026
0

मॉन्सून गुड न्यूज..! देशभरात कमी, पण महाराष्ट्रात यंदा ‘इतके’ टक्के पाऊस..!

मॉन्सून गुड न्यूज..! देशभरात कमी, पण महाराष्ट्रात यंदा ‘इतके’ टक्के पाऊस..!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 2, 2026
0

मान्सूनच्या दमदार वाटचालीस अनुकूल स्थिती

मान्सूनच्या दमदार वाटचालीस अनुकूल स्थिती

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 2, 2026
0

ऊस नियंत्रण आदेश २०२६ मागे

ऊस नियंत्रण आदेश २०२६ मागे

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 2, 2026
0

किस राज्य में कितनी तारीख को पहुंचेगा मानसून देखिए

किस राज्य में कितनी तारीख को पहुंचेगा मानसून देखिए

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 1, 2026
0

Centre Waives Cotton Import Duty

केंद्राकडून कापूस आयात शुल्क माफ

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 3, 2026
0

‘एल-निनो’ मुळे यंदाचा जून महिना ठरणार ‘ताप’ दायक!

‘एल-निनो’ मुळे यंदाचा जून महिना ठरणार ‘ताप’ दायक!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 30, 2026
0

‘आयएमडी’चा सुधारित हवामान अंदाजही कमी पावसाचाच!

‘आयएमडी’चा सुधारित हवामान अंदाजही कमी पावसाचाच!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 29, 2026
0

राज्यात मान्सूनचे आगमन कधी? महाराष्ट्रात पाऊस कधी सुरू होणार?

राज्यात मान्सूनचे आगमन कधी? महाराष्ट्रात पाऊस कधी सुरू होणार?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 29, 2026
0

तांत्रिक

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 6, 2026
0

स्पायरल सेपरेटर

मळणीनंतर सोयाबीन व तूर साफसफाईसाठी- स्पायरल सेपरेटर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 22, 2025
0

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

जगाच्या पाठीवर

महावितरणचे विभाजन; कृषी ग्राहकांसाठी ‘एमएसईबी सोलर ॲग्रो पॉवर’ ही नवी वीज कंपनी

महावितरणचे विभाजन; कृषी ग्राहकांसाठी ‘एमएसईबी सोलर ॲग्रो पॉवर’ ही नवी वीज कंपनी

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 5, 2026
0

गुड न्यूज! मान्सून केरळमध्ये दाखल

गुड न्यूज! मान्सून केरळमध्ये दाखल

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 4, 2026
0

मॉन्सून गुड न्यूज..! देशभरात कमी, पण महाराष्ट्रात यंदा ‘इतके’ टक्के पाऊस..!

मॉन्सून गुड न्यूज..! देशभरात कमी, पण महाराष्ट्रात यंदा ‘इतके’ टक्के पाऊस..!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 2, 2026
0

मान्सूनच्या दमदार वाटचालीस अनुकूल स्थिती

मान्सूनच्या दमदार वाटचालीस अनुकूल स्थिती

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 2, 2026
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.

EnglishEnglish