• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

पावनखिंड भाग – 19 बाजी प्रभू – इतिहास सन्मानाचा, अभिमानाचा, अतुल्य पराक्रमाचा

Team Agroworld by Team Agroworld
January 4, 2021
in इतर
0
इतिहास  गौरवशाली स्वराज्याचा – पावनखिंड भाग – १  बाजी प्रभू
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

संध्याकाळी राजे आणि बाजी सदरेवर बसले असता न राहवून बाजी म्हणाले,
‘राजे एक विचारू?’
‘विचारा ना! आम्हांला माहीत आहे, तुम्ही काय विचारणार, ते.’
बाजी पुन्हा संभ्रमात पडले. बाजींचं ते विचारग्रस्त रूप पाहून राजे स्मितवदनानं म्हणाले,
‘आम्हांला खरोखरच दृष्टान्त झाला होता का, हेच विचारणार होता ना!’
‘जी!’ बाजींनी सांगितलं.


‘दृष्टान्त वगैरे काही झाला नव्हता. चाणक्य काळापासून राजनीतीत ही गोष्ट आहे. गडाचा खजिना जेव्हा सुरक्षित राखायचा असतो, तेव्हा हीच पद्धत अवलंबली जाते.’
‘कसली पद्धत?’ बाजींनी विचारलं.
‘गडावर अशाच सुरक्षित जागेवर बुरूजाची निवड केली जाते. त्यात मोजक्या माणसांकरवी रात्रीच्या वेळी धन पुरलं जातं. ती माणसं दोनपेक्षा जास्त नसतात. धन पुरून झाल्यानंतर ती माणसं परतत असता त्यांनी काय केलं, हे माहीत नसणाऱ्या मारेकऱ्यांमार्फत त्यांचा वध केला जातो. त्यांची प्रेतं बुरूजाच्या नजीक टाकली जातात. दुसरे दिवशी गडावरची माणसं ती प्रेतं पाहतात. दचकतात. भितात. त्यांचं दफन तिथंच केलं जातं. काही दिवसांनी रात्री-अपरात्री तिथं दिवट्या नाचवल्या जातात आणि त्या बुरूजाचं नाव सैतान बुरूज, वेताळ बुरूज असं पडतं. अंधश्रद्धा बाळगणारे कमी नसतात. त्या बुरूजाच्या कथा तयार होतात. त्या बुरूजाकडं जायला कोणी धजेनासं होतं. त्यामुळे असा बुरूज पाहिला की, आम्हांला त्यातलं धन दिसू लागतं. याचं प्रत्यंतर आम्हांला तोरण्यावर आलं होतं.’
राजांच्या बोलण्यानं बाजीप्रभू प्रसन्नपणे हसले. ते मोकळेपणानं म्हणाले,
‘राजे! बांदलांची दिवाणगिरी केली, पण ही दृष्टी कधी लाभली नाही.’
‘बाजी! अनुभवातून माणसं शिकत असतात. या धनाची आज खूप गरज होती.’
‘गरज?’
‘बाजी! आम्ही फत्तेखानाचा पराभव केला आहे. आदिलशाही आता स्वस्थ बसेल, असं वाटत नाही. आमच्यावर कुठलंही परचक्र येण्याआधी आमच्या बारा मावळचे सारे गड मजबूत करायला हवेत. रोहिड्याचं बांधकाम कुठवर आलं?’
‘त्याची चिंता नसावी.’ बाजींनी सांगितलं, ‘बांदलांनी आपल्या नजरेखाली गडकोट बंदोबस्त करून घेतला आहे.’
‘ठीक!’ राजे समाधानानं म्हणाले. त्याच वेळी त्यांचं लक्ष सदरेबाहेरच्या रस्त्याकडं गेलं.
राजांच्या मुखावर स्मित उमटलं. ते बाजींना म्हणाले,
‘धरणेकरी येताहेत! आम्हांला जावं लागेल.’
बाजींनी रस्त्याकडं पाहिलं. भर उन्हातून सखू सदरेकडं येत होती.
बाजी उद्गारले,


‘पोरगी मोठी धीट आहे.’
‘धीट नव्हे, प्रेमळ आहे. जिथं प्रेम असतं, तिथं रिवाज पाळला जात नाही.’
राजे म्हणाले, त्यात काही खोटं नव्हतं. उन्हातून आलेली सखू राजांना पाहताच म्हणाली,
‘मोहरांचा हंडा मिळाला, म्हणून त्यानं पोट भरतंय? म्या आज तुमच्यासाठी बाजरीची भाकरी, ताजं लोणी आनि तांबडी भाजी केलीया. भाकर थंड झाली, तर…’
‘अग, हो! किती सांगशील? आम्ही चुकलो.’ राजे कौतुकानं म्हणाले.
‘बाजी, ह्या पोरीची आज्ञा आम्हांला मोडता येणार नाही. आम्ही निघालो.’
सखूच्या मागोमाग निघालेल्या राजांना बाजी कौतुकानं पाहत होते.

राजांची राजगडला जायची तयारी चालली होती. गडाखाली राजांचं सामान नेलं गेलं.
विठोजी-गुणाजीला राजे म्हणाले,
‘आम्ही येतो. विठोजी, आता गड तुमच्या ताब्यात. शिबंदी गोळा करा. तुमच्या हाती गड सुरक्षित आहे, याची आम्हांला खात्री आहे.’
विठोजींना काही बोलवत नव्हतं.
राजांनी विचारलं,
‘आणि आमची सखू कुठं आहे?’
‘आतल्या दरवाज्यातून सखू तीरासारखी बाहेर आली आणि तिनं राजांच्या पायावर मस्तक ठेवलं. तिच्या अश्रूंनी राजांचे पाय भिजत होते.
राजे दाटल्या कंठानं सखूला उठवत म्हणाले,
‘ऊठ, सखू! हे काय वेड्यासारखं. पूस ते डोळे. आम्ही सांगतो, तू हाक मारशील, तेव्हा आम्ही तू असशील, तिथं हजर होऊ. यशवंतची काळजी करू नको. आम्ही त्याला जीवमोलानं सांभाळू. आमची सखू आणि तू यांत आम्हांला फरक वाटत नाही.’
राजांनी कमरेचा कसा काढला आणि सखूच्या हातात दिला.
‘मला नगंs’ सखू म्हणाली.
‘पोरांनी वडिलांचं ऐकावं!’ राजे म्हणाले.
‘केलंसा, तेवढं लई झालं; आनि कशाला…’ विठोजी म्हणाला.
‘विठोजी, आम्ही पदरचं थोडंच खर्चतो! देवीनं आम्हांला धन दिलं. ज्या घरात देवावर निष्ठा असते, आणि सुना-मुलींच्या अंगावर दागिने चढतात, त्या घरचं वैभव कधी कमी होत नसतं. ते वाढतच जातं. सखू, आम्ही येतो.’
राजांनी वाड्याबाहेर पाऊल टाकलं. चालत असता ते बाजींना म्हणाले.
‘बाजी, दोन दिवस राहिलो, पण या पोरीनं खूप लळा लावला.’
राजे गडाखाली आले. राजांचं अश्वदळ तयार होतं. राजांचं लक्ष यशवंतकडं गेलं.
‘यशवंत, सखूला सांभाळ.’ बाजींच्याकडं वळून त्यांनी सांगितलं, ‘बाजी, काही लागलं-सवरलं, तर आम्हांला कळवा. या मुलखावर तुमची नजर असू दे. घरची सर्व व्यवस्था करून तुम्ही, फुलाजी, शक्य तो लवकर आम्हांला भेटायला राजगडावर या.’
‘जशी आज्ञा!’ बाजी म्हणाले.
राजे घोड्यावर स्वार झाले. साऱ्यांनी मुजरे केले आणि राजांचं अश्वदळ राजगडाच्या रोखानं जाऊ लागलं.

‘खरंच राजांना धन सापडलं?’ गौतमाईनं विचारलं.
‘झालं!’ बाजी म्हणाले, ‘आम्ही इथवर पोहोचायच्या आत साऱ्या बातम्या आल्या, म्हणायच्या.’
‘बातमी कसली! ज्याच्या त्याच्या तोंडावर हेच हाय.’ सोनाबाईनं सांगितलं.
‘छान!’ बाजी उद्गारले.
‘राजांना देवी प्रसन्न आहे. तिनचं राजांना दृष्टान्त दिला, म्हणे!’ गौतमाई म्हणाल्या.
‘म्हणे, कसलं!’ फुलाजी आवेशानं सांगत होते, ‘आम्ही डोळ्यानं बघितलं, नव्हं! सारे घाबरत होते, पण राजांनी आज्ञा केली, ‘लावा खणती’ आणि काय -मोहरांनी भरलेले हंडे सापडले, हंडे!’
‘अग, बाई!’
‘शिवाजी राजा साधं पोर नाही. देवमाणूस आहे. त्याच्या मागं देवीचं बळ आहे. माणसांची पारख आहे. माणसानं एकदा त्याच्याबरोबर बोलावं आणि कायमचा गुलाम व्हावं, अशी त्याची करामत आहे.’
‘हे मात्र खरं!’ बाजी म्हणाले, ‘आजवर बांदलांची चाकरी केली, पण हे सुख मिळालं नाही. पण या खेपेला राजे कसल्या तरी चिंतेत असावेत, असं वाटतं होतं.’
‘बाजी, खरं?’ फुलाजींनी विचारलं.
‘हो! नाहीतर त्यांनी घरची व्यवस्था करून गडावर भेटीला बोलावलं नसतं.’ बाजी म्हणाले.
‘घोर नाही, तर राजा कसला?’ फुलाजी म्हणाले, ‘तुम्ही गडावर जाऊन या. नंतर आपण राजगडला जाऊ.’
त्या भावांचं बोलणं ऐकून सोनाबाई, गौतमाई चकित झाल्या. सोनाबाई उद्गारली,
‘आपण राजगडला जाणार?’


‘जायलाच हवं!’ बाजी म्हणाले, ‘राजांनी आज्ञा केली नाही, म्हणून काय झालं? ते चिंतेत आहेत, हे माहीत असता थांबून कसं चालेल?’
बाजींचा तो निर्णय ऐकून गौतमाई, सोनाबाई तिथून निघून गेल्या.
बाजी फुलाजींना म्हणाले,
‘मी उद्या सकाळी गडावर जातो. राजांनी शिबंदी वाढवायला सांगितली आहे. मी येईपर्यंत आपण जोखमीची, विश्वासाची माणसं गोळा करा.’
‘माणसांना काय तोटा!’ फुलाजी म्हणाले, ‘त्यांना हाक मारणारा मालक हवा होता. त्याचीच ते वाट बघत होते.’
बाजी काही बोलले नाहीत. ते समाधानानं आपल्या मोठ्या भावाकडं पाहत होते.

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: अश्वदळआबाजीकृष्णाजींगडघोरपडेजगदंबजगदाळेजय भवानीतानाजीपट्टाफुलाजींभैरुमोरेयशवंतराजेविठोजीशिवाजीसावंतहर हर महादेव
Previous Post

ओळख महामंडळांची – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ

Next Post

आज जगभरात पाळला जात आहे जागतिक ब्रेल दिन

Next Post
आज जगभरात पाळला जात आहे जागतिक ब्रेल दिन

आज जगभरात पाळला जात आहे जागतिक ब्रेल दिन

ताज्या बातम्या

खान्देशच्या मातीत बांबूच्या शेतीतून वर्षाला तब्बल 25 लाखांचा नफा !

खान्देशच्या मातीत बांबूच्या शेतीतून वर्षाला तब्बल 25 लाखांचा नफा !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 18, 2025
1

धराक्षा इकोसोल्युशन्स : पिकांच्या अवशेषांचे सोने करणारे स्टार्ट अप !

धराक्षा इकोसोल्युशन्स : पिकांच्या अवशेषांचे सोने करणारे स्टार्ट अप !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 16, 2025
0

गावठी कोंबडीचा स्टार्ट-अप

आईसोबत तरुणाने सुरु केला गावठी कोंबडीचा स्टार्ट-अप; आज 45 कोटींचा व्यवसाय !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 15, 2025
0

खान्देशातील धरणे फुल्ल

खान्देशातील धरणे फुल्ल; रब्बी “नो टेन्शन”; मका, भाजीपालासह रब्बी क्षेत्र वाढीचा अंदाज

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 14, 2025
0

अमेरिकेत विक्रमी मका उत्पादन

अमेरिकेत विक्रमी मका उत्पादन; निर्यातीसाठी दबाव

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 14, 2025
0

राज्यातून मान्सून माघारीला सुरुवात

राज्यातून मान्सून माघारीला सुरुवात; येत्या 24 तासात संपूर्ण महाराष्ट्रातून होणार एक्झिट – आयएमडी

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 13, 2025
0

हवामान दुष्चक्र

हवामान दुष्चक्र: युरोपात उष्णतेच्या लाटेने घेतले 62 हजार बळी!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 11, 2025
0

हुश्श… रिटर्न मान्सून दोन दिवसात राज्यातून परतणार; अशी असेल वाटचाल – आयएमडी

हुश्श… रिटर्न मान्सून दोन दिवसात राज्यातून परतणार; अशी असेल वाटचाल – आयएमडी

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 10, 2025
0

हवामान विभागा

आजचा दिवस पावसाचा! “या” जिल्ह्यांसाठी हवामान विभागाचा अलर्ट जारी

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 9, 2025
0

Agriculture Minister Dattatray Bharane

Agriculture Minister Dattatray Bharane Receives Invitation for AgroWorld Agricultural Expo

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 8, 2025
0

तांत्रिक

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

जगाच्या पाठीवर

खान्देशच्या मातीत बांबूच्या शेतीतून वर्षाला तब्बल 25 लाखांचा नफा !

खान्देशच्या मातीत बांबूच्या शेतीतून वर्षाला तब्बल 25 लाखांचा नफा !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 18, 2025
1

धराक्षा इकोसोल्युशन्स : पिकांच्या अवशेषांचे सोने करणारे स्टार्ट अप !

धराक्षा इकोसोल्युशन्स : पिकांच्या अवशेषांचे सोने करणारे स्टार्ट अप !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 16, 2025
0

गावठी कोंबडीचा स्टार्ट-अप

आईसोबत तरुणाने सुरु केला गावठी कोंबडीचा स्टार्ट-अप; आज 45 कोटींचा व्यवसाय !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 15, 2025
0

खान्देशातील धरणे फुल्ल

खान्देशातील धरणे फुल्ल; रब्बी “नो टेन्शन”; मका, भाजीपालासह रब्बी क्षेत्र वाढीचा अंदाज

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 14, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.

EnglishEnglish