• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

ठिबक सिंचनाने वाढविला ऊसाचा गोडवा

Team Agroworld by Team Agroworld
September 11, 2020
in यशोगाथा
0
ठिबक सिंचनाने वाढविला ऊसाचा गोडवा
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

सव्वा दोन एकरांत जवळपास 10 लाख रुपयाचे उत्पन्न

ठिबक सिंचनचा ऊसासाठी वापर करताना ऊसाच्या दोन ओळीत कलिंगड व हिरवी मिरची लागवड करून तिहेरी पिकातून सव्वा दोन एकरांत जवळपास 10 लाख रुपयाचे उत्पन्न घेण्याची किमया नगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील अमोल सीताराम मोरे  या तरुणाने करून दाखवली.                         

      नगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील वांबोरी गावात अमोल सीताराम मोरे यांचे एकत्र कुटुंब आहे. वडील सीताराम मोरे हे पोस्टमन आहेत. त्यांना एकुण 12 एकर जमीन आहे. त्यापैकी फक्त 5 एकर जमीन सुपीक आहे. उर्वरित माळरानची हलकी जमीन. त्यांना दोन मुले मोठा मुलगा संगणक अभियंता म्हणून अमेरिकेत नोकरी करतो. धाकटा मुलगा अमोल 12 वी शिकत असतांना वडिलांची बदली झाली. त्यामुळे शेतीची संपुर्ण जबाबदारी अमोलवर पडली. शेतीमध्ये पारंपरिक पिके घेतली जातात. त्यामध्ये मूग, तूर, गहु, ज्वारी, हरभरा व नगदी उत्पन्न म्हणून ऊस पिक घेतले जात असे. अमोलनेही त्यात खंड पडू दिला नाही. उसाचे उत्पादन एकरी सरासरी 50 ते 55 टन येत होते. मोठा भाऊ होता तोपर्यंत शेती कामाचा ताण कमी होता. पण तो परदेशात गेला आणी अमोल वर कामाचा ताण वाढला.        


सेंद्रिय व रासायनिक शेतीची सांगड, पाण्यामुळे उस हे शास्वत पिक
       गावाजवळ उजनी धरणाचे बॅक वॉटर आहे, तेथून 8 हजार फुट जलवहिनी टाकुन पाणी आणले. शेतात दोन विंधन विहिरी 200 व 250 फुट घेतलेल्या आहेत. त्यामुळे शाश्वत पिक म्हणजे ऊस. जवळच दोन साखर कारखाने. मा. अजितदादा पवार यांचा अंबालिंका शुगर, व दुसरा दौंड शुगर. त्यामुळे 5 एकर मध्ये 5 ते 6 लाख रुपयाचे हमखास उत्पन्न असे. पण अमोलला अजुन उत्पन्न हवे होते. त्यातही रासायनिक खते वापरावर होणारा भरमसाठ खर्च कमी करायचा होता. त्यातच त्यांना सुभाष पाळेकर यांचे झीरो बजेट शेती वरील व्याख्यान एकावयास मिळाले. त्यातुन एक वर्ष तशी शेती केली. (2017/18) पण उत्पन्न कमी झाले. त्यामुळे सेंद्रिय व रासायनिक अशी योग्य सांगड घालुन शेती केली. उसात 8 फूट अंतरावर जोड ओळीत ऊस आहे. त्यामुळे मधल्या मोकळ्या जमिनीवर कलिंगड व मिरची लागवड करण्याचा निर्णय झाला. खरीप चांगले आले. नोव्हेंबर मधे ऊस ही कारखान्याने नेला होता.

पाण्यासाठी शेततळे व ठिबक सिंचनाचा वापर

          शेतात 3 गीर, 3 जर्सी व 2 खिल्लार जातीच्या गाई आहेत. मात्र बैल जोडी नाही. शेती यंत्राने केली जाते. बोअरवेलचे पाणी तपासले ते क्षारयुक्त आहे, त्याचा परिणाम पिकावर तर होत होताच, पण जमीन ही क्षारयुक्त झाली, त्यामुळे उत्पादनात घट येऊ लागली. म्हणुन 35×35 मीटर शेत तलाव तयार करून त्यात नदीमधुन आणलेली जलवाहिनी जोडली. पाणीसाठा करून ठेवला.   त्यांचा वापर त्यांनी पिकाला ठिबक सिंचनाच्या माध्यमातून केला त्यामुळे शेतात तण नियंत्रणात राहिले आणि पिकांना संतुलित पाणी दिले गेल्याने वाढही चांगली झाली.     

     

अंतरपिक लागवड

      डिसेंबर मध्ये उसाच्या मधली सरी नांगरणी करून घेऊन रोटाव्हेटरने जमीन तयार केली. सरी काढण्यापूर्वी 5 ट्रॉली शेणखत, 30 गोणी कोंबडी खत, 10 गोणी लिंबोली पेंड. डी ए पी 2 गोणी, पोटॅश 1 गोणी, बेनसल्फ 50 किलो व येरामील 50 किलो जमिनीत मिसळले. त्यानंतर साडेचार फुट रुंद व दिड फूट उंचीचे बेड तयार केले. त्यावर 16 एम. एम. चे ठिबक दोन बाजुने टाकून घेतल्या. त्यावर 50 मायक्रोनचे मल्चिंग कापड टाकून दोन्ही बाजूने सव्वा फुटावर होल  पाडले. कलिंगडचे तयार रोप दौंड तालुक्यातील नर्सरी मधुन एका नामांकित कंपनीचे मॅक्स जातीचे 3 रुपये प्रति नग प्रमाणे 9000 रोपे आणली. तर हिरवी मिरचीचे अजून एका स्थानिक कंपनीचे 2000 रोप 1.30 प्रति नग प्रमाणे आणले.                                       रोपे लागवडी पूर्वी ड्रीपने पाणी सोडून सायंकाळी बेड ओले करून घेतले. दि. 3 जाने. 2020 रोजी 8300 रोपांची लागवड केली. त्यात झालेली तुट भरून काढण्यासाठी उर्वरित रोपांपैकी 300 रोपे लागली. त्यानंतर दि. 11 जाने. रोजी दुसर्‍या बाजूस मिरचीचे रोप लागवड केली. त्याचीही तुट भरून काढली.     


खते व  औषधांचे नियोजन                                                    

      येथून पुढे सुरू झाले खते व  औषधांचे नियोजन. कारण 65 दिवसात कलिंगड विक्रीसाठी तयार होणार होते. तर मिरची दिड महिन्यात विक्रीला येणार होती. त्यात प्रत्येक आठवड्यात वातावरणात बदल होत होते. बर अमोल यांची उसात एका वेळे इतर दोन पिके घेण्याची ही पाहिलीच वेळ होती. पण त्यांनी वेगवेगळे कृषी अधिकारी व उत्पादक शेतकरी यांचे मार्गदर्शन घेऊन खते व औषध यांचे  वेळा पत्रक तयार केले होते.                                   रोपे लागवडीनंतर प्रत्येक दोन दिवसाने बाविस्टीन + ह्युॅमीक अॅसिड चे ड्रीन्चींग केले. संपुर्ण शेतात निळे, पिवळे सापळे लावले. मिर्ची लागवडी पूर्वी बायो 303 ची प्रति लिटर पाण्यात 1 मी. लि. प्रमाणे फवारणी केली. त्यातच इतर  औषध मिसळले. दि. 10 जाने. ला पुन्हा एक्टरा 150 व ह्युॅमीक चे ड्रीन्चींग केले. 18 जाने. रोजी स्थानिक बाजारातील किटक नाशक फवारणी केली. तत्पूर्वी 13 रोजी बुरशी नाशक व कीटकनाशक फवारणी केली होती. याशिवाय प्रत्येक 3 दिवसाला ठिबक मधुन जिवामृत देणे 40 दिवसा पर्यंत सुरू ठेवले होते. हे जिवामृत शेतातच तयार केले होते.

      त्या शिवाय त्याच्या दोन फवारणी ही केल्या होत्या. यासह वसंत दादा शुगर ने तयार केलेले बुरशी नाशक च्या 4 दिवसाच्या अंतराने 12 फवारणी केल्या. के. व्ही. के. बारामती येथून आणलेले के एस बी. 200 लिटर पाण्यात टाकुन त्यात 4 किलो गुळ व 10 किलो सरकी पेंड मिसळून प्रत्येक 4 दिवसाने 15 ते 20 मिनिटे ठिबक मधून 4 वेळेस सोडले. व नंतर 5 मिनिटे पाणी सोडले.  ठिबक संचांमुळे खते आणि पाणी यांचे योग्य संतुलन साधने शक्य झाले असे ते म्हणतात.
कोरोना विषाणू आणि बाजारभाव

          पांढरी माशीच्या नियंत्रणासाठी जैविक बुरशी नाशक व ट्रायकोडर्माची फवारणी दोन वेळा केली. वातावरणातील बदलामुळे गोगलगाईचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला होता, त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पेंड गोळी टाकली. याशिवाय प्रकाश सापळे, गंध सापळे लावल्यामुळे पांढरी माशी नियंत्रनात राहिली. कलिंगड चा प्लॉट 65 दिवसात तोडणीस आला. 4 ते 6 किलोचे फळ तयार झाले. पण कोरोना विषाणूमुळे भाव तर पडलेच, पण व्यापारी खरेदी करीना झाले. शेवटी दि. 15 मार्च रोजी 6 रुपये प्रती किलो प्रमाणे खरेदीदार भेटला. 17 तारखेला हा माल गुजरातला विक्रीसाठी गेला. एकुण वजन 45 टन भरले. याच कालावधीत मिरची तोडीस आली होती. पहिला तोडा 500 किलो तर दुसरी तोड 800 किलो निघाली. प्रति किलो 30 रुपये दराने मिरची विकली जात आहे. 

          या तीन महिन्याच्या काळात ऊस पिकाला कोणतीही खत दिले नाही. किंवा वेगळे पाणी दिले नाही. तरीही वाढ खुप जोमाने झाली. शेवटी ऊसाची छाटनी करावी लागली. आता त्याला 10 ते 12 फुटवे  आहेत. त्यामुळे सव्वा दोन एकर मध्ये ऊस 130 ते 140 टन होईल असा अंदाज आहे. उसाचा पहिला खोडवा होता. तिन्ही पिकांना मिळून 15 मार्च पर्यंत दिड लाख रुपये खर्च आला आहे. मिर्ची व ऊस यावर अजुन 20 ते 30 हजार रुपये खर्च येईल असा अंदाज आहे. तरिही एकुण खर्च पावणेदोन लाख रुपये होईल असा अंदाज आहे.           

उत्पन्न
        एकूण उत्पन्न किती यावर अमोल मोरे हसुन म्हणाले तुम्हीच ठरवा. कारण बाजारात सध्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. तरीही मला मिर्चीचे दोन तोडीत 35 हजार रु. मिळाले तर कलिंगडाच्या विक्रीतून पावणे तीन लाख रुपये मिळाले आहेत.  ऊस पिकातून किमान 2500 रुपये भाव धरला तरी साडेतीन लाख होतात. मिर्ची जुनअखेर पर्यंत विक्री होणार आहे. म्हणजे सर्व मिळुन 10 लाख रुपये उत्पन्न मिळणारच असा विश्‍वास त्यांना वाटतो. शेतीच्या कामात त्यांना वडील सीताराम मोरे याचे मार्गदर्शन मिळाले. तर आई सौ. अहिल्याबाई व पत्नी सौ. सारिका यांची शेती कामात प्रत्यक्ष साथ मिळाली, त्यामुळे तालुका स्तरावर महिला दिनी सौ. सारिका यांचा सौ. सुनंदा ताई रोहित पवार यांचे हस्ते सन्मान करण्यात आला.       

             शेतकर्‍यांना मार्गदर्शन करताना अमोल मोरे. म्हणतात,. शेतकर्‍यांनी रासायनिक खतांचा वापर कमी करून त्याचा सेंद्रिय खता बरोबर समतोल राखला पाहिजे. जमिनीतील जिवाणू वाढले पाहिजेत. त्याचबरोबर कोणत्याही हंगामात पाण्याचा कमी वापर करीत मिश्र पिक घेतली तर कधीच नुकसान होत नाही. 
अमोल मोरे,

वांबोरी  ता. कर्जत जि. नगर
मोबा.नं. 09890763455

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: ऊसशेततळे व ठिबक
Previous Post

‘विकेल ते पिकेल’ अभियानांतर्गत शेतमालाला हमखास भाव मिळणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Next Post

मान्सून अलर्ट – राज्यात मुसळधार पावसाचा इशारा

Next Post
मान्सून अलर्ट – राज्यात मुसळधार पावसाचा इशारा

मान्सून अलर्ट - राज्यात मुसळधार पावसाचा इशारा

ताज्या बातम्या

भारत प्रथमच 10 लाख ट्रॅक्टर विक्रीच्या उंबरठ्यावर..!

भारत प्रथमच 10 लाख ट्रॅक्टर विक्रीच्या उंबरठ्यावर..!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 12, 2026
0

चालू गळीत हंगाम

चालू गळीत हंगामात 12% वाढीव साखर उत्पादन; युद्धामुळे निर्यात प्रभावित झाल्याने दरांमध्ये घसरणीची शक्यता!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 11, 2026
0

हरभरा दरांवर दबाव

आयात वाढल्याने हरभरा दरांवर दबाव; कापूस आणि सोयाबीनमध्ये तेजीची शक्यता

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 7, 2026
0

कापूस

कापूस, मका, सोयाबीन मार्केट, दरांचा आढावा व अंदाज

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 7, 2026
0

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 6, 2026
0

अपराजिता फुल

अपराजिता फुल लागवडीतून भरघोस उत्पादन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 5, 2026
0

इराण युद्ध

इराण युद्धामुळे केळी निर्यातीला मोठा फटका!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 4, 2026
0

द्राक्षाचे भाव

दुबईत द्राक्षाचे भाव रात्रीतून तिप्पट; नाशिक-सांगलीच्या शेतकऱ्यांना मात्र 1,500 कोटींचा फटका!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 4, 2026
0

इराण

इराण युद्धाचा कांदा निर्यातीला मोठा फटका!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 4, 2026
0

कृषी क्षेत्रावर परिणाम

आखात युद्धाचा कृषी क्षेत्रावर परिणाम होण्याची शक्यता

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 2, 2026
0

तांत्रिक

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 6, 2026
0

स्पायरल सेपरेटर

मळणीनंतर सोयाबीन व तूर साफसफाईसाठी- स्पायरल सेपरेटर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 22, 2025
0

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

जगाच्या पाठीवर

भारत प्रथमच 10 लाख ट्रॅक्टर विक्रीच्या उंबरठ्यावर..!

भारत प्रथमच 10 लाख ट्रॅक्टर विक्रीच्या उंबरठ्यावर..!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 12, 2026
0

चालू गळीत हंगाम

चालू गळीत हंगामात 12% वाढीव साखर उत्पादन; युद्धामुळे निर्यात प्रभावित झाल्याने दरांमध्ये घसरणीची शक्यता!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 11, 2026
0

हरभरा दरांवर दबाव

आयात वाढल्याने हरभरा दरांवर दबाव; कापूस आणि सोयाबीनमध्ये तेजीची शक्यता

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 7, 2026
0

कापूस

कापूस, मका, सोयाबीन मार्केट, दरांचा आढावा व अंदाज

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 7, 2026
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.

EnglishEnglish