• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

पावनखिंड भाग – ३३ बाजी प्रभू – इतिहास सन्मानाचा, अभिमानाचा, अतुल्य पराक्रमाचा

Team Agroworld by Team Agroworld
January 18, 2021
in इतर
0
इतिहास  गौरवशाली स्वराज्याचा – पावनखिंड भाग – १  बाजी प्रभू
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

पन्हाळगडाच्या पूर्व कड्यावर उभा असलेल्या सदर महालाच्या दुसऱ्या मजल्यावरच्या गच्चीवर राजे उभे होते. गच्चीच्या कमानीतून दिसणारा मुलूख ते न्याहाळत होते. हवेतला गारवा त्यांना जाणवत नव्हता. उजव्या हाताला हिरव्या गर्द रानानं वेढलेला पावनगड दिसत होता. गडाच्या पायथ्याशी विखुरलेली गावं दिसत होती. आणि त्यामागं दूरवर पसरलेला मुलूख थेट क्षितिजापर्यंत पोहोचला होता.
धरित्रीचं ते विशाल, प्रसन्न रूप राजे डोळ्यांत साठवत असता पावलांचा आवाज झाला. राजांनी मागं वळून पाहिलं. गंगाधरपंत आले होते.
‘या, पंत!’
‘राजे! आपल्या आज्ञेप्रमाणे सर्व खाली आले आहेत.’
‘ठीक! गंगाधरपंत, आपण खाली जा. आणि बाजी, त्र्यंबक भास्कर, सूर्याजी यांना वर घेऊन या. येताना कुणाला वरती सोडू नका. अशी सक्त ताकीद द्या.’


मान तुकवून गंगाधरपंत गेले. राजांनी एक दीर्घ निःश्वास सोडला. आणि परत ते पूर्वेचा मुलूख न्याहाळू लागले.
राजांच्या आज्ञेनुसार गंगाधरपंत बाजी, त्र्यंबक भास्कर, सूर्याजी यांना सज्जात घेऊन आले. राजांनी बाजींना विचारलं,
‘बाजी! फुलाजी कुठं दिसत नाहीत?’
‘पाडव्याला घरच्या दैवताची पूजा-अर्चा असते; तेव्हा ते गावी गेले आहेत. दोन दिवसांत गडावर दाखल होतील.’
राजे बैठकीवर बसले. क्षणात आजूबाजूच्या माणसांचं अस्तित्व विसरून ते स्वतःच्याच विचारात हरवले.
राजांचं ते रूप सर्वांनाच नवं होतं. सारे राजांच्याकडं आणि एकमेकांकडं पाहत होते.
बाजींनी धीर करून विचारलं,
‘राजे! मिरजेचा किल्ला ताब्यात आला?’
‘अं!’ म्हणत राजांनी मान उंचावली, ‘काय म्हणालात?’
‘मिरजेचा किल्ला घेतला?’
‘नाही. वेढा उठवून यावं लागलं.’
‘एवढा किल्ला अवघड आहे?’
‘मुळीच नाही. किल्ला मुळीच अवघड नाही. पण वेळ अवघड आहे.’
‘आम्ही समजलो नाही!’ त्र्यंबक भास्कर म्हणाले.
‘काल सणाचा दिवस, म्हणून आम्ही काही बोललो नाही. आम्ही रुस्तुमेजमाचा पराभव केला. तेव्हाच आम्हांला शंका आली होती! माणसाचं यश जसं वाढत जातं, तसे त्याचे शत्रूही वाढत जातात. तो अधिक एकाकी पडू लागतो. विजापूरहून आमच्या पारिपत्यासाठी कर्नुलचा सरदार सिद्दी जौहर अदिलशाहीच्या सर्वशक्तीनिशी आमच्यावर चालून येतो आहे; ही बातमी आम्हांला मिरजेला मिळाली. तेव्हा वेढा उठवून आम्हांला यावं लागलं.’
‘गडाची चिंता नसावी, राजे!’ किल्लेदार त्र्यंबक भास्कर म्हणाले.
राजे खिन्नपणे हसले,
‘त्र्यंबकजी! संकट कधी एकटं येत नसतं. आज या क्षणी दिल्लीची फौज आमच्यावर चालून येते आहे. खुद्द औरंगजेब बादशहाचा मामा शाईस्तेखान अफाट फौज घेऊन येत आहे. औरंगाबाद ओलांडून तो अहमदनगरला येऊन पोहोचला आहे.’
ती बातमी ऐकून कुणाला, काय बोलावं, सुचत नव्हतं.
‘आपली फौज?’ बाजींनी विचारलं.
‘बरीचशी कर्नाटकच्या मोहिमेवर गुंतली आहे. आमचे सेनापतीही तिकडंच आहेत.’
‘आपली छावणी कोल्हापूरला आहे?’
‘नाही. आम्ही छावणी उठवूनच इकडं आलो. आपलं अश्वदळ आम्ही राजगडाकडं पाठविलं आहे. पायदळाला गडावर यायला सांगितलं आहे.’
राजांच्या उत्तरानं बाजी आणखीन संभ्रमात पडले होते.
एवढे प्रबळ शत्रू अंगावर चालून येत असता राजे आपलं घोडदळ पाठवून देतात!
राजे विस्तवाशी डाव तर खेळत नाहीत ना?
राजांच्या हातून आंधळ्या कोशिंबीरीचा डाव कधी खेळला जात नसतो.
यात राजांनी निश्चित काहीतरी बेत आखला आहे.
राजांनी गंगाधरपंतांच्याकडं नजर वळवली. त्यांनी विचारलं,
‘पंत! तुमचा काय सल्ला आहे?’
पंत अकारण खाकरले,
‘नाही, म्हणजे… प्रसंग बाका दिसतो. तेव्हा शत्रू येण्याआधी आपल्या मुलखातील प्रतापगड, राजगड किंवा पुरंधरचा आश्रय घ्यावा.’
‘वाटलंच!’ राजे म्हणाले, ‘पंत, आम्ही तसं केलं, तर काय होईल, माहीत आहे? आमच्या पाठोपाठ सिद्दी जौहर बारा मावळांत घुसेल. नुकतीच कुठं जीव धरून राहिलेली आमची माणसं या फौजेच्याखाली भरडली जातील. आणि दुर्दैवानं शाईस्तेखान आणि जौहर यांची हातमिळवणी झाली, तर त्या अनर्थाला सीमा राहणार नाहीत. हा स्वराज्याचा खटाटोप आम्ही आमच्यासाठी केलेला नाही. प्रजारक्षण हे आमचं आद्य कर्तव्य आहे.’
बाजी हसले.
त्या हसण्याचं साऱ्यांना आश्चर्य वाटलं.


राजांनी विचारलं,
‘काय, बाजी!’
‘राजे! आपला पन्हाळगड चारी बाजूंनी मजबूत आहे. शत्रू केवढाही मोठा असो, त्याला गडावर शिरकाव करता येणार नाही.’
‘व्वा, बाजी! आमच्या मनातला होरा ओळखलात. आता तोच निर्णय घेतला आहे. तो शाईस्तेखान उत्तरेतून उतरतो आहे. त्याची चाल हत्तीची असली, तरी तो हत्ती आहे, हे विसरता येत नाही. चार नळे पायांशी फेकले, तरी तो बुजून माघारी वळेल. पण जाता-जाता पाच-पन्नास माणसांना पायदळी तुडवेल. आदिलशाही घोड्याच्या पावलांनी नाचत येईल, पण पराजय होतो, असं दिसलं, तर तेच घोडे त्यांना आपल्या निवासाकडं सुखरूपपणे नेता येतील.’
‘आणि आमी? सूर्याजीनं विचारलं.’
राजे हसले,
‘आम्ही! आता उरली एकच जात! दिसायला बेडौल. चाल वाकडी.’
‘उंट!’ सूर्याजी म्हणाला.
‘हां, उंट! पण कुणाच्या हे ध्यानी येत नाही, की हवं तेवढं ओझं तोलून, उपाशी-तापाशी धावणारा तेवढा एकच प्राणी आहे. बुद्धीबळातली उंटाची तिरकी चाल प्रत्यक्षात तेवढी खरी नाही. उंट वेडावाकडा चालताना दिसतो. पण त्याची चाल सरळ रेषेतच जाते.’ राजांनी निश्चयपूर्वक सांगितलं, ‘बाजी! आपल्याला आता उसंत नाही. आजच्या आज स्वार रवाना करा. जेधे, नेताजी असतील तिथं त्यांना गाठून आपल्या फौजेसह पन्हाळ्याकडं यायला सांगा. गंगाधरपंत! तसे खलिते बाजींच्या स्वाधीन करा.’
राजांची दृष्टी त्र्यंबक भास्करांच्याकडं वळली,
‘त्र्यंबकजी! गडाचे अंबरखाने, गंजीखाना भरून घ्या. गडाची तळी उन्हाळ्यात कोरडी पडत नाहीत ना?’
‘त्याची चिंता नसावी! एवढा भाग्यवान किल्ला शोधून सापडायचा नाही. पाण्याचा कितीही उपसा झाला, तरी पाणी कधी कमी होत नाही. आजवर झालेलं नाही.’ त्र्यंबक भास्कर म्हणाले.
‘नुसता गड राखून चालत नाही.’ राजे सांगत होते, ‘आजूबाजूच्या मुलखावर नजर असायला हवी. उद्या आमचे बहिर्जी, आबाजी गडावर येतील. साऱ्या मुलखात आपले नजरबाज पेरले जातील. बाजी, तुम्ही तुमची बांदल कुमक गडावर गोळा करा. सूर्याजी, तुम्ही दारू-कोठारावर नजर ठेवा. उद्यापासून गडाचे दरवाजे बंद करा. कोण गडावर येतो; कोण जातो, यावर नजर ठेवा.
साऱ्यांनी मुजरे केले. ते गेले.
बाजी माघारी राहिले होते.
‘काय, बाजी?’ राजांनी विचारलं.
‘काही नाही!’ बाजी म्हणाले.
‘चिंता करू नका. ती भवानी आपल्याला जरूर वाट दाखवील. काळजी वाटते फक्त मासाहेबांची! त्या बिचाऱ्या काळजीत असतील. त्यांना ही बातमी समजली असेल! तुम्ही जा.’
बाजी मुजरा करून निघून गेले.
एकटे राजे सज्जाकोठीत उरले होते.

🚩क्रमशः🚩
सौजन्य :- सर्व क्रमशः लेख ( श्री. सागर पाटील – सोशल मिडिया ) 

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: अफजलखानखराटेगोदाजीजगतापजाधवनेताजी पालकरपवारफाजलखानबाजी प्रभूभीमाजीमहाडिकमहाराजमानाजींयशवंतरुस्तुमवाघविजापूरशिवाजीसय्यदखानसिदोजीसिद्दीसुभानरावहिरोजी इंगळेहिलाल
Previous Post

कोण जिंकले आशिया खंडातील सर्वात मोठ्या ग्रामपंचायत निवडणुकीत…!

Next Post

निर्मिती कामादरम्यान जवळपास १० लाख लोकांचा मृत्यू पाहिलेली भिंत…!

Next Post
निर्मिती कामादरम्यान जवळपास १० लाख लोकांचा मृत्यू पाहिलेली भिंत…!

निर्मिती कामादरम्यान जवळपास १० लाख लोकांचा मृत्यू पाहिलेली भिंत...!

ताज्या बातम्या

शाळकरी बहिणींचा शेळीच्या दुधापासून कोटीचं स्टार्टअप

शाळकरी बहिणींचा शेळीच्या दुधापासून कोटीचं स्टार्टअप !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 21, 2026
0

स्कॉटलंड

दुधाला भाव नाही, घामाचे दाम नाही: स्कॉटलंडमध्ये 20 वर्षांतील सर्वात तीव्र डेअरी संकट!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 20, 2026
0

जळगाव जिल्ह्यात केळी पिकाने बदलले शेतकऱ्यांच्या दोन पिढ्यांचे जीवनमान !

जळगाव जिल्ह्यात केळी पिकाने बदलले शेतकऱ्यांच्या दोन पिढ्यांचे जीवनमान !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 21, 2026
0

उत्तर भारतात पुन्हा कडाक्याची थंडी

उत्तर भारतात पुन्हा कडाक्याची थंडी; महाराष्ट्रात हळूहळू तापमान वाढणार – IMD

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 19, 2026
0

महाराष्ट्रात थंडीचे पुनरागम

महाराष्ट्रात थंडीचे पुनरागम: जाणून घ्या सद्यस्थिती, कारणे आणि पुढील 72 तासांचा हवामान अलर्ट

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 16, 2026
0

भाजीपाल्याची लागवड

जानेवारी-फेब्रुवारीत करा “या” पिकांची, फळ-भाजीपाल्याची लागवड अन् मिळवा रग्गड उत्पन्न!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 14, 2026
0

मोबाईलच सांगणार तुमच्या नुकसानीचा आकडा

पशुपालकांनो, आता मोबाईलच सांगणार तुमच्या नुकसानीचा आकडा! लुवास विद्यापीठाचा ‘हा’ ॲप ठरणार गेम चेंजर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 13, 2026
0

जैन हिल्स कृषी महोत्सव

जैन हिल्स कृषी महोत्सव 2025-26: जिथे तंत्रज्ञान आणि परंपरा एकत्र येऊन शेतकऱ्यांचे भविष्य घडवतात

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 11, 2026
0

महाराष्ट्र थंडीने गारठला: पाच वर्षांतील सर्वात तीव्र हिवाळा; हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा

महाराष्ट्र थंडीने गारठला: पाच वर्षांतील सर्वात तीव्र हिवाळा; हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 10, 2026
0

जानेवारी महिन्यात करावयाची महत्त्वाची शेती कामे

जानेवारी महिन्यात करावयाची महत्त्वाची शेती कामे

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 10, 2026
0

तांत्रिक

स्पायरल सेपरेटर

मळणीनंतर सोयाबीन व तूर साफसफाईसाठी- स्पायरल सेपरेटर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 22, 2025
0

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

जगाच्या पाठीवर

शाळकरी बहिणींचा शेळीच्या दुधापासून कोटीचं स्टार्टअप

शाळकरी बहिणींचा शेळीच्या दुधापासून कोटीचं स्टार्टअप !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 21, 2026
0

स्कॉटलंड

दुधाला भाव नाही, घामाचे दाम नाही: स्कॉटलंडमध्ये 20 वर्षांतील सर्वात तीव्र डेअरी संकट!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 20, 2026
0

जळगाव जिल्ह्यात केळी पिकाने बदलले शेतकऱ्यांच्या दोन पिढ्यांचे जीवनमान !

जळगाव जिल्ह्यात केळी पिकाने बदलले शेतकऱ्यांच्या दोन पिढ्यांचे जीवनमान !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 21, 2026
0

उत्तर भारतात पुन्हा कडाक्याची थंडी

उत्तर भारतात पुन्हा कडाक्याची थंडी; महाराष्ट्रात हळूहळू तापमान वाढणार – IMD

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 19, 2026
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.

EnglishEnglish