• Home
    • आमच्याविषयी
AgroWorld
Advertisement
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

राज्यातील सर्व धरणांत झाला इतके % पाणीसाठा..; जायकवाडी, गिरणा, हतनूर, कोयना, खडकवासला, भंडारदरा, उजनीसह राज्यातील धरणांच्या पातळीत मोठी वाढ

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 20, 2022
in तांत्रिक
2
राज्यातील सर्व धरणांत झाला इतके % पाणीसाठा..; जायकवाडी, गिरणा, हतनूर, कोयना, खडकवासला, भंडारदरा, उजनीसह राज्यातील धरणांच्या पातळीत मोठी वाढ
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

मुंबई : जुलै महिन्याच्या पूर्वार्धात राज्यभरात सर्वदूर झालेल्या दमदार, संततधार पावसामुळे धरणांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. राज्यातली सर्व प्रमुख धरणांसह, छोट्या-मध्यम प्रकल्पातही मुबलक पाणीसाठा झाला आहे. राज्यातील 3,267 धरणांमधील एकूण पाणीसाठा जुलैमध्ये सुमारे 35 टक्के वाढला आहे. गेल्यावर्षीच्या आतापर्यंतच्या केवळ 30 टक्क्यांच्या तुलनेत सध्या राज्यातील धरणात तब्बल 65 टक्के पाणी साठले आहे.

जायकवाडी, गिरणा, कोयना या मोठ्या धरणातील पाणीपातळीतही चांगली वाढ झाली आहे. उजनी धरण प्लसमध्ये येऊन पातळी 50 टक्केपर्यंत वाढत आहे. गिरणा धरण 95 तर जायकवाडी 75 टक्के पातळीपर्यंत पोहोचत आहे. दोन्ही धरणातून लवकरच मोठा विसर्ग सुरू होईल. ही दोन्ही धरणे सलग चौथ्या वर्षी पूर्ण क्षमतेने भरणार आहेत. 105.25 टीएमसी पाणी साठवणक्षमता असलेल्या कोयना धरणातील पाणीसाठा आता तब्बल 60 टीएमसी पातळीपर्यंत पोहोचला आहे.

 सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा 👇🏻

जनावरांमध्ये “लम्पी स्कीन व्हायरस”ची साथ; पशुधनाच्या मृत्यूमुळे शेतकरी अस्वस्थ

 

आशिया खंडातील सर्वात मोठ्या मातीच्या धरणातून लवकरच विसर्ग

मराठवाड्यातील 11 मोठ्या धरणांतील जलसाठा 70 टक्क्यांवर पोचला आहे. त्यात महाराष्ट्रातील महत्वाच्या धरणांपैकी जायकवाडी हे एक महत्वाचे धरण आहे. आशिया खंडातील सर्वात मोठे मातीचे धरण अशी त्याची ओळख आहे. मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड, परभणी, नांदेडसह नाशिक जिल्ह्यातील नागरिकांना जायकवाडी धरणाचा लाभ मिळतो. नाशिक जिल्ह्यातून विसर्ग केल्या जाणाऱ्या पाण्याची आवक जायकवाडी धरणात सुरूच असल्याने गेल्या आठवडाभरात पाणीसाठा दुप्पट झाला असून धरणातून लवकरच पाणी सोडले जाण्याची शक्यता आहे. जायकवाडी धरण मंगळवारी, 19 जुलै रोजी सकाळीच 76 टक्के भरले आहे. धरण 79 टक्के भरल्यावर पाणी सोडले जाईल, असे नाथसागर जलाशयाच्या अभियंत्यांनी म्हटले आहे. जायकवाडी पाटबंधारे विभागाने पाणी सोडण्याबाबत जिल्हाधिकारी यांना तातडीचे पत्र लिहले आहे. दरम्यान, नांदेड जिल्ह्यातील ऊर्ध्व पेनगंगा प्रकल्प ईसापूर धरणाचा पाणीसाठाही 75 टक्के झाला असून नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

 

हतनूर धरणाचे 41 दरवाजे खुले

जळगाव जिल्ह्यातील तापी नदीवरील हतनूर धरण पाणलोट क्षेत्रात पडत असलेल्या पावसामुळे धरणाचे सर्वच्या सर्व 41 दारवाजे पूर्ण उंचीने उघडलेले असून नदीपात्रामध्ये सद्यस्थितीत 52,796 क्युसेक्स इतका विसर्ग सुरू असून नदी काठच्या नागरिकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

 

 सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा 👇🏻

राज्यात पावसाचा मुक्काम आणखी चार दिवस लांबणार; सरासरीहून 47 टक्के अतिरिक्त पावसाची नोंद; सांगलीत मात्र 31 टक्के तूट!

 

भंडारदरा धरण 85 टक्के भरले

नगर जिल्ह्यातली भंडारदरा धरण सुमारे 85 टक्के भरले आहे. पाऊस सुरूच राहिल्यास पाणी पातळीचे नियमण करण्यासाठी सांडव्याद्वारे प्रवरा नदीमध्ये पाणी सोडण्यात येणार आहे. नगर जिल्हा प्रशासनाने नदी काठच्या लोकांना दक्षतेचा इशारा दिला आहे.

 

खडकवासला धरण साखळीत 65 टक्के साठा

पुणे : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील चारही धरणांमधील पाणीसाठा 18.89 अब्ज घनफूट (टीएमसी) म्हणजेच 64.79 टक्क्यांवर पोहोचला आहे. धरणक्षेत्रात पाऊस ओसरल्यामुळे खडकवासला धरणातून विसर्ग थांबविण्यात आला आहे. टेमघर धरणात 51.88 टक्के, वरसगाव 60.55, पानशेत 67.68 टक्के तर खडकवासला धरण हे 100 टक्के भरले आहे. पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणातील पाणीसाठा 67.80 टक्के इतका झाला आहे.

 

मुंबईतील सात धरणांत 10 महिन्यांचा पाणीसाठा

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणात सध्या 84.41 टक्के इतका पाणीसाठा जमा झाला आहे. मुंबईला दररोज होणारा पाणीपुरवठा पाहता हा पाणीसाठा पुढील 317 दिवस म्हणजेच दहा महिने पुरेल इतका झाला आहे. म्हणजेच 30 मे 2023 पर्यंत मुंबई शहराची पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे. पुरेल इतका आहे. सध्या मोडक सागर, तानसा व तुळशी हे तिन्ही धरण भरून वाहू लागले आहेत. आता तर मध्य वैतरणा धरणात एकूण क्षमतेच्या 90.61 टक्के इतका पाणीसाठा जमा झाला आहे. सात धरणातील एकूण पाणीक्षमतेच्या तुलनेत एकट्या भातसा धरणात 50 टक्के पाणीसाठा जमा होतो. आजमितीस या भातसा धरणात 81.20 टक्के इतका पाणीसाठा जमा झाला आहे. त्यापाठोपाठ अप्पर वैतरणा धरणात 72.34 टक्के पाणीसाठा जमा आहे.

 

 

कोल्हापूर जिल्ह्यात 53 बंधारे पाण्याखाली

कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरणात 174.44 दलघमी पाणीसाठा असून धरणातून 1400 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. जिल्ह्यातील 53 बंधारे पाण्याखाली आहेत. त्यात पंचगंगा नदीवरील शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ; भोगावती नदीवरील हळदी, सरकारी कोगे व राशिवडे हे प्रमुख बंधारे आहेत. कोल्हापुरातील राजाराम बंधारा पाणी पातळी 33 फूट 5 इंच इतकी खाली आली आहे. पंचगंगा नदी इशारा पातळी 39 फूट तर धोका पातळी 43 फूट आहे.

चंद्रपुरात धरणातून विसर्ग सुरूच

चंद्रपूर जिल्ह्यात इराई धरण, निम्न वर्धा प्रकल्प, गोसीखुर्द या तीनही प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरु आहे, पाण्याची पातळी अचानक वाढू शकते, नागरिकांनी आश्रयस्थानीच राहावे. रात्रीच्या वेळी सतर्कता बाळगावी. नदीपात्राजवळ जाऊ नये. जिल्हा प्रशासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

संबधीत बातम्या वाचण्यसाठी येथे क्लिक करा

राज्यात शुक्रवारपर्यंत मुसळधार कायम, “रेड ॲलर्ट” जारी; देशातील 25 राज्यात धुवां”धार”

राज्यभरातील धरणांमधील पाणीसाठ्यात गेल्या दोन आठवड्यात दहा टक्क्यांनी वाढ

राज्यभरात पावसाचे धुमशान; उत्तर-मध्य महाराष्ट्र, विदर्भासाठीही “ऑरेंज ॲलर्ट” जारी

राज्यात मुसळधार, अनेक ठिकाणी पूरस्थिती; पालक सचिवांना त्या त्या जिल्ह्यांत पोहचून प्रत्यक्ष देखरेख, नियंत्रण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

 

Share this:

  • Facebook
  • X
Tags: आशिया खंडखडकवासला धरणचंद्रपूरपंचगंगा नदीपाऊसपाणलोट क्षेत्रपाणीसाठाभंडारदरा धरणमराठवाडाहतनूर
Previous Post

जनावरांमध्ये “लम्पी स्कीन व्हायरस”ची साथ; पशुधनाच्या मृत्यूमुळे शेतकरी अस्वस्थ

Next Post

वयोवृद्ध शेतकऱ्यांसाठी ऑफर! शेती सोडा त्यासाठी सरकार देतेय एक कोटी रुपये! का, कुठे दिली जातेय ही £100,000 Best ऑफर ते जाणून घ्या..

Next Post
वयोवृद्ध शेतकऱ्यांसाठी ऑफर! शेती सोडा त्यासाठी सरकार देतेय एक कोटी रुपये! का, कुठे दिली जातेय ही £100,000 Best ऑफर ते जाणून घ्या..

वयोवृद्ध शेतकऱ्यांसाठी ऑफर! शेती सोडा त्यासाठी सरकार देतेय एक कोटी रुपये! का, कुठे दिली जातेय ही £100,000 Best ऑफर ते जाणून घ्या..

Comments 2

  1. Pingback: वयोवृद्ध शेतकऱ्यांना शेतीचे काम सोडण्यासाठी सरकार देतेय एक कोटी रुपये! का, कुठे दिली जातेय ही ऑफ
  2. Pingback: "तो" पुन्हा येणार....! - Agro World

ताज्या बातम्या

मान्सून कोकणात धडकणार या तारखेला… !

मान्सून कोकणात धडकणार या तारखेला… !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 16, 2025
0

केळी लागवडीचे यशस्वी रहस्य

🌱 “केळी लागवडीचे यशस्वी रहस्य – रेवा फ्लोरा टिशू कल्चर !” 🍌

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 14, 2025
0

मान्सून अंदमानात

मान्सून अंदमानात… पुढील प्रवास कसा असणार ?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 14, 2025
0

IMD

IMD – जळगाव, नाशिकसह या जिल्ह्यांना यलो अलर्ट !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 13, 2025
0

बंगालच्या उपसागरात मान्सूनची चाहूल

काय..! मेच्या मध्यातच बंगालच्या उपसागरात मान्सूनची चाहूल ; काय म्हणाले माणिकराव खुळे

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 8, 2025
0

पीएम किसान

20 व्या हप्त्यापूर्वी पीएम किसान योजनेत मोठा बदल

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 6, 2025
0

देवगड हापूस हंगाम संपला..

देवगड हापूस हंगाम संपला..! ॲग्रोवर्ल्ड मार्फत आता पुढच्या वर्षी गुढीपाडव्यालाच देवगड हापूसचा मुहूर्त 🥭

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 6, 2025
0

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठे ठेवा – शिवकुमार एस

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठे ठेवा – शिवकुमार एस

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 5, 2025
0

इंडो-फ्रेंच बिझनेस अवॉर्ड्स 2025

इंडो-फ्रेंच बिझनेस अवॉर्ड्स 2025 मध्ये ‘कॅन बायोसिस’ ला ज्युरी विशेष पुरस्कार

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 30, 2025
0

अक्षय तृतीयेनिमित्त देवगड हापूस – बुकिंग फुल होण्याच्या मार्गावर… ॲग्रोवर्ल्डचा शेतकरी ते ग्राहक 6 वर्षांचा उपक्रम.. 🌱

अक्षय तृतीयेनिमित्त देवगड हापूस – बुकिंग फुल होण्याच्या मार्गावर… ॲग्रोवर्ल्डचा शेतकरी ते ग्राहक 6 वर्षांचा उपक्रम.. 🌱

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 25, 2025
0

तांत्रिक

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

हळद साठवणूक

हळद साठवणूक प्रक्रिया

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 26, 2025
0

हळद काढणी करताय ? ; मग त्याआधी हे वाचाच !

हळद काढणी करताय ? ; मग त्याआधी हे वाचाच !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 25, 2025
0

जगाच्या पाठीवर

मान्सून कोकणात धडकणार या तारखेला… !

मान्सून कोकणात धडकणार या तारखेला… !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 16, 2025
0

केळी लागवडीचे यशस्वी रहस्य

🌱 “केळी लागवडीचे यशस्वी रहस्य – रेवा फ्लोरा टिशू कल्चर !” 🍌

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 14, 2025
0

मान्सून अंदमानात

मान्सून अंदमानात… पुढील प्रवास कसा असणार ?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 14, 2025
0

IMD

IMD – जळगाव, नाशिकसह या जिल्ह्यांना यलो अलर्ट !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 13, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Home

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.