• Home
    • आमच्याविषयी
  • Services
AgroWorld
Advertisement
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

पावनखिंड भाग – 26 बाजी प्रभू – इतिहास सन्मानाचा, अभिमानाचा, अतुल्य पराक्रमाचा

Team Agroworld by Team Agroworld
January 11, 2021
in इतर
0
इतिहास  गौरवशाली स्वराज्याचा – पावनखिंड भाग – १  बाजी प्रभू
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

शिवाजीच्या पारिपत्यासाठी आदिलशाहीनं खर्चाचा हात राखून ठेवला नव्हता. शेकडो लहान-मोठ्या तोफा, वीस हजारांची फौज, शंभर हत्ती, शेकडो उंट, दारूगोळा, बाड-बिछायत आणि अगणित संपत्ती अफजलखानाच्या हवाली केली होती.
अफजलखानाच्या पुढं शिवाजीचा पराभव अटळ होता. विजापूरची बडी बेगम शिवाजीचा पराभव ऐकण्यास उत्सुक होती. एके दिवशी अफजलखान शिवाजीस पिंजऱ्यात घालून दरबारात दाखल होईल, हे स्वप्न बडी बेगम पाहत होती. एकदा शिवाजी हाती आला की, दरबारात वर्चस्व गाजवणाऱ्या फर्जंद शहाजीराजांची मिजास उतरेल आणि शिवाजीच्या प्राणाची तो भीक मागेल, यात बेगमला संशय नव्हता.

-आणि एके दिवशी आदिलशाहीच्या दरबारावर वीज कोसळावी, तशी बातमी आली.
आलीशान अफजलखान माहमदशाही पैगंबरवासी झाला.
शिवाजीनं खानास ठार मारलं.
फौजेचा धुव्वा उडाला.
सारी दौलत लुटली गेली.
त्या बातमीनं बड्या बेगमचे डोळे विस्फारले गेले. तिचं भान हरपलं.
अफजलखानाला मारलं!
शिवाजीनं?
कोठेतरी गफलत होत आहे.
मोठी गफलत होत आहे.
झूट! ये कभी नहीं हो सकता! कुठं अफजल आणि कुठं तो शिवाजी!
मशालीपुढं काजवा कधी टिकतो?
काजव्यानं झेप घेतली, म्हणून मशाल कधी विझेल?
मग अफजलचं असं कसं झालं?
बडी बेगम भानावर आली. तिचे डोळे विस्फारले होते. आपल्या बुरख्याची जाणीव तिला राहिली नव्हती. तिला परत सारं आठवलं आणि कानांवर हात ठेवत ती किंचाळली,
‘नहीं ss नहीं ss कभी नहीं ss ऐसा हो ही न सकता ss’ बडी बेगमनं आज्ञा दिली, ‘निकल जाव मेरे सामनेसे s झूटे कहीं केss’
बडी बेगम हुंदके देत दरबारातून उठली.
सारा दरबार चिकाच्या पडद्याआडून उठणारा तो चीत्कार ऐकत होता.
झोकांड्या देत बडी बेगम आपल्या अंतर्गृहात गेली आणि तिनं पलंगावर धाडकन् अंग टाकलं. बड्या बेगमचं दुःख तिच्या नावाप्रमाणेच मोठं होतं.
साऱ्या विजापूर शहरावर शोककळा पसरली. नगारखान्याची नौबत बंद झाली. दरबार बंद झाला. बड्या बेगमेनं अन्नपाणी वर्ज्य केल. आणि शाही तख्तावर चादर पांघरली गेली. साऱ्या शहरभर सुतकी वातावरण पसरलं. घरोघरी बिब्या आणि बेगमा यांचा धाय मोकलून आक्रोश उसळला.
बातमीपाठोपाठ त्या बातमीचं सत्य स्वरूप दाखविण्यासाठीच की काय, अफजलखानाचा मुलगा फाजलखान अंगावरच्या वस्त्रानिशी विजापूरच्या दरबारात हजर झाला.
त्या बातमीनं चिंताग्रस्त झालेली बेगम विचार करीत असतानाच तिसऱ्या दिवशी नवी बातमी येऊन थबकली. शिवाजीचा सरनौबत नेताजी पालकर यानं लक्षमेश्वरापर्यंतची लुटालूट केली होती.


पाठोपाठ बातमी आली, शिवाजी अठरा दिवसांत एकवीस गड घेऊन पन्हाळ्यापर्यंत पोहोचला होता. विजापूरवर तो धाड घालणार, यात शंका उरली नव्हती.
त्या बातमीनं बड्या बेगमचा धीर सुटला. तिनं तातडीनं रुस्तुम-ए-जमान आणि फाजलखान यांना दहा हजार फौज देऊन शिवाजीवर सोडलं. त्यांच्या संगती मलिक इतबार, फत्तेखान, घोरपडे, सर्जेराव घाटगे वगैरे सरदार होते.
त्यांना निरोप देताना हताश झालेली बडी बेगम म्हणाली,
‘कुछ भी हो! पण तो काफर शिवाजी विजापूरपर्यंत येत नाही, येवढी काळजी घ्या.’
विजापूरहून रुस्तुम-ए-जमान आणि फाजलखान फौज-फाटा घेऊन बाहेर पडले. पण बड्या बेगमेला त्यांचा विश्वास राहिला नव्हता.

शिवाजीराजांनी कोल्हापूर जिंकलं होतं. सायंकाळच्या वेळी अंबाबाईचं दर्शन घेऊन ते आपल्या छावणीत परतले होते. राजांच्या पालीसमोर शेकोट्या पेटल्या होत्या. बाजी, फुलाजी, आबाजीप्रभू यांच्यासह नेताजी, तानाजी, बहिर्जी ही मंडळी राजांच्या भोवती गोळा झाली होती. अठरा दिवसांच्या मोहिमेचा ताण कुणाच्याही मुखावर नव्हता. आलेल्या विजयानं सारे आनंदित होते.
राजांची नजर बाजींच्याकडं वळली,
‘बाजी! आता पन्हाळगड तुमचा! तो आपल्या हाती आला, तर आदिलशाहीची एक कड आपल्या हाती संपूर्ण येईल. उद्या आपण पन्हाळगडावर चालून जाऊ.’
अठरा दिवसांत राजांना पडलेला ताण बाजींच्या ध्यानी येत होता. ते म्हणाले,
‘राजे, आज्ञा झाली, तर….’
राजे हसले. ते म्हणाले,
‘ठीक आहे. तुम्ही पन्हाळ्याला वेढा घाला. शक्य तो सामोपचारानं गड हाती येतो, का पाहा. ते जमलं नाही, तर आततायी प्रकार न करता आम्हांला वर्दी द्या. आपण गड काबीज करू. तुमचा निरोप येईपर्यंत आम्ही कोल्हापूरची आणि छावणीची व्यवस्था लावून घेऊ.’
‘जशी आज्ञा!’ बाजी आनंदानं म्हणाले.
‘तुम्हांला हवा, तो फौजफाटा घेऊन तुम्ही जा.’
राजांचा निरोप घेऊन बाजी गेले.
बहिर्जींच्या मुखावरची चिंतेची रेघ बघून राजांनी विचारलं,
‘काय, बहिर्जी! मनात काय आहे?’
‘काय न्हाय, जी!’ बहिर्जी म्हणाला, ‘पन पन्हाळा येवढा साधा गड न्हाई. लई मजबूत हाय.’
‘बहिर्जी! गड मजबूत असून चालत नाही. माणसाचं मन मजबूत असायला हवं. खानाच्या मृत्यूची बातमी पुढं पळत होती आणि आम्ही त्यामागून धावत होतो. कमी बळ आणि खचलेली मनं यांमुळं आम्हांला विजय साधता आला. बाजी नुसते वीर नाहीत. ते बांदलांचे प्रधान होते. जिथं शौर्य आणि बुद्धिमत्ता वास करते, तिथं विजयच प्राप्त होतो.’
बहिर्जी काही बोलला नाही. राजे आपल्या तंबूत विश्रांतीसाठी गेले.
हवेतला गारवा वाढत होता. राजांच्या तंबूसमोरची शेकोटी प्रज्वलित केली जात होती. वाढत्या रात्रीबरोबर छावणीची वर्दळ मंदावत होती. राजांची छावणी विसावली होती.

सौजन्य :- सर्व क्रमशः लेख ( श्री. सागर पाटील – सोशल मिडिया ) 

Share this:

  • Facebook
  • X
Tags: अफजलअंबाबाईआदिलशाहीछावणीपन्हाळाबहिर्जीबाजीविजापूरशिवाजी
Previous Post

हरभऱ्यातील घाटेअळीचे एकात्मिक व्यवस्थापन

Next Post

पावनखिंड भाग – 27 बाजी प्रभू – इतिहास सन्मानाचा, अभिमानाचा, अतुल्य पराक्रमाचा

Next Post
इतिहास  गौरवशाली स्वराज्याचा – पावनखिंड भाग – १  बाजी प्रभू

पावनखिंड भाग – 27 बाजी प्रभू – इतिहास सन्मानाचा, अभिमानाचा, अतुल्य पराक्रमाचा

ताज्या बातम्या

कॉर्पोरेट जग सोडून मधमाश्यांमध्ये हरवलेला इंजिनीअर !

कॉर्पोरेट जग सोडून मधमाश्यांमध्ये हरवलेला इंजिनीअर !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 27, 2025
0

अशी मिळवा ट्रॅक्टर सबसिडी…

अशी मिळवा ट्रॅक्टर सबसिडी…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 25, 2025
0

तुर्कस्तानच्या बाजरीतून एकरी 26 क्विंटल उत्पादन

काय..? तुर्कस्तानच्या बाजरीतून एकरी 26 क्विंटल उत्पादन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 24, 2025
0

या भागात मुसळधार पावसाचा इशारा

या भागात मुसळधार पावसाचा इशारा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 23, 2025
0

व्हिएतनाम

व्हिएतनामींचा योगगुरू बनलाय साताऱ्यातील शेतकरीपुत्र?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 21, 2025
0

AI

500 कोटींच्या AI शेती धोरणाचा फायदा !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 19, 2025
0

गावागावात हवामान केंद्रांची उभारणी करणार

गावागावात हवामान केंद्रांची उभारणी करणार

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 18, 2025
0

महाॲग्री- एआय

महाॲग्री- एआय धोरण मंजूर ; 500 कोटींची तरतूद

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 18, 2025
0

कृषी उडान

“कृषी उडान”च्या लाभासाठी असा करा अर्ज

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 17, 2025
0

कृषी उडान

जळगाव, नाशिकसह 6 विमानतळांवरून “कृषी उडान” स्वस्तात पाठवा कृषीमाल

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 17, 2025
0

तांत्रिक

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

हळद साठवणूक

हळद साठवणूक प्रक्रिया

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 26, 2025
0

जगाच्या पाठीवर

कॉर्पोरेट जग सोडून मधमाश्यांमध्ये हरवलेला इंजिनीअर !

कॉर्पोरेट जग सोडून मधमाश्यांमध्ये हरवलेला इंजिनीअर !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 27, 2025
0

अशी मिळवा ट्रॅक्टर सबसिडी…

अशी मिळवा ट्रॅक्टर सबसिडी…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 25, 2025
0

तुर्कस्तानच्या बाजरीतून एकरी 26 क्विंटल उत्पादन

काय..? तुर्कस्तानच्या बाजरीतून एकरी 26 क्विंटल उत्पादन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 24, 2025
0

या भागात मुसळधार पावसाचा इशारा

या भागात मुसळधार पावसाचा इशारा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 23, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Home
  • Services

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.