• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

पावनखिंड भाग – ४५ बाजी प्रभू – इतिहास सन्मानाचा, अभिमानाचा, अतुल्य पराक्रमाचा

Team Agroworld by Team Agroworld
January 31, 2021
in इतर
1
इतिहास  गौरवशाली स्वराज्याचा – पावनखिंड भाग – १  बाजी प्रभू
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

पहाट होण्याला अवधी होता. नखशिखांत भिजलेले सहाशे धारकरी राजांची पालखी राखत धावत होते. रुतलेल्या काट्यांची, खुपलेल्या कपारींची जाणीव कुणाला नव्हती. दगडाधोंड्यांतून धावताना अनवाणी पाय जागोजागी रक्ताळत होते. लोहाराच्या भात्यासारखी प्रत्येकाची छाती फुगत होती. धापेचा निःश्वास बाहेर पडत होता. तोंडातून, नाकातून बाहेर पडलेला श्वास वाफेच्या रूपानं उसळत उतरणाऱ्या धुक्यात मिसळत होता. हेलकावे घेणाऱ्या पालखीचा गोंडा धरून राजे पालखीत बसले होते. पालखीवर झाकलेल्या अलवानामुळं राजांना काही दिसत नव्हतं. फक्त बाजींचा आवाज कानांवर येत होता,
‘चलाss’

चला!
कुठं जायचं?
एका माणसाच्या जिवासाठी धावायचं कुठवर?
बाजी! कशासाठी हे कष्ट घेता?
कोणाच्या स्वार्थापायी?
_आणि तेही एका माणसाच्या जिवापायी?


कोणाच्या सत्तेनं आम्ही या माणसांना गुंतवलं?
कोणत्या अधिकारानं?
जीवनात अखेरचं मोल असतं, ते स्वतःच्या जिवाचं
मग त्या जिवाच्या कवड्या यांनी आम्ही मांडलेल्या पटावर का उधळाव्यात?
कसल्या आणि कुणाच्या भरवशावर?
बाजी, फुलाजी, तुम्ही स्वामिकार्यासाठी का ह्या अवघड वाटचालीत सामील झालात?
कोणत्या त्यागापायी?
हे स्वराज्य व्हावं, ही तो श्रींची इच्छा आहे, असं आम्ही म्हणालो.
पण हा महाचंडिकेचा होम धडाडत असता त्याचं पौरोहित्य आमच्या हाती का सुपूर्द केलंत?
यातून खरं काही साधणार आहे का?
या पालखीचा वीट येतो!
नशिबानं या संकटातून पार पडलोच, तर….
बाजी, पालखीचा मान तुम्हांला देऊ!
त्या वेळी तुम्हांला कळेल, ही पालखी केवढं सुख देते, ते!
पालखी हेंदकाळत धावत होती.
अचानक पालखी थांबली. मागून नजरबाज धावत आला. तो बाजींना म्हणाला,
‘बाजी, पाठलाग होतो आहे.’
सर्वत्र दाट धुकं होतं. बाजी ओरडले,
‘थांबू नका पळा.’
राजांची पालखी धावत होती. वेग वाढला होता. पालखीत तोल सावरणं कठीण जात होतं.
पांढरंपाणी ओलांडून खेळण्याचा पायथा गाठला. गजाखिंडीत पालखी आली, नजरबाज उलट दिशेनं आला त्याने बाजींना काही सांगितलं आणि पालखी थांबली.
पालखीवरचं अलवान उचललं गेलं. बाजी म्हणाले,
‘राजे, उतरा!’
शिवाजी राजे पालखीबाहेर आले. धुक्यानं सारा मुलूख वेढला होता. दोहों बाजूंनी उंच गेलेल्या दरडींतून जाणाऱ्या त्या खिंडीत सारे उभे होते. पहाटेचा समय जवळ येत होता.
‘बाजी! काय झालं?’ राजांनी विचारलं.


‘राजे! दैवानं दावा साधला. खेळणा सुर्व्यांच्या मोर्च्यात सापडलेला आहे, हे आधी कळतं, तर मधल्या वाटेनं आपल्याला राजगडाच्या रोखानं सोडलं असतं. आता तेही जमणार नाही. मागं शत्रू आहे. पुढं वेढा आहे.’
‘बाजी! चिंता करू नका. सुर्व्यांनी मोर्चे लावलेत ना! ते जरूर आपण मोडून काढू.’
‘आपण? नाही, राजे, ते तुम्ही करायला हवं! पाठलाग करून येणारे गनीम कोणत्याही क्षणी आपल्याला गाठतील. ते आणि सुर्वे यांची हातमिळवणी होता कामा नये.’
‘मतलब!’
‘राजे, आता उसंत नाही. तीनशे धारकरी घेऊन तुम्ही गड गाठा. आम्ही ही खिंड लढवतो.’
‘नाही, बाजी! तुम्हांला सोडून आम्ही जाणार नाही. जे व्हायचं असेल, ते होऊ दे.’
राजांच्या बोलांनी बाजी कासावीस झाले. त्यांचा चेहरा कठोर बनला. ते म्हणाले,
‘राजे! आता बोलत बसायला फार वेळ नाही. एकदा वडिलकीचा मान दिलात, तो पाळा. गड गाठा!’
‘नाही, बाजी! ते होणार नाही.’
‘मला सांगता? या बाजीला? राजे, ही सारी फौज माझी, बांदलांची आहे. प्रसंग ओढवून घेतलात, तर तुमच्या मुसक्या आवळून या पालखीतून तुम्हांला जावं लागेल. विंझाईशपत सांगतो, यात तिळमात्र बदल घडणार नाही. राजे बऱ्या बोलानं गड गाठा!’

राजांना काही सुचत नव्हतं. बाजींचं वेडावलं रूप ते पाहत होते.
क्षणभर रोहिड्याच्या किल्ल्यावर पाहिलेलं बाजींचं रूप राजांच्या नजरेसमोर तरळलं. राजे म्हणाले,
‘बाजी, फुलाजी…पण तुम्ही….’
‘आमची चिंता करू नका, राजे! तुम्ही गड गाठा. गडावर जाताच तोफेचा आवाज करा. तोवर एकही गनीम या खिंडीतून आत येणार नाही.’
‘बाजी ss.’
‘बोलू नका, राजे! ही बोलण्याची वेळ नाही. लहान तोंडी मोठा घास घेतला असला, तर क्षमा करा.’
राजांचे डोळे भरून आले. त्यांनी बाजींना मिठी मारली. फुलाजींना कवटाळलं. बाजी म्हणाले,
‘राजे! परत नाही भेटलो, तर आठवण विसरू नका.’
दोघांच्याही अश्रूंचे बांध फुटले. डोळे पुसत बाजी म्हणाले,
‘राजे! आमची लाज राखा. सुखरूपपणे गडावर जा. जोवर तोफेचा आवाज ऐकत नाही, तोवर जिवाला चैन नाही.’ बाजींची नजर यशवंताकडं गेली. ते म्हणाले, ‘यशवंता, राजांना सांभाळ. त्यांच्यावरची नजर ढळू देऊ नको. राजे, तुम्ही जा.’ कठोर आवाजात बाजी ओरडले, ‘जा म्हणतो ना!’
राजांना काही सुचत नव्हतं. तीनशे धारकरी गोळा झाले होते. राजांनी पाऊल उचललं; पण बळ येईना. त्यांनी माघारी पाहिलं. बाजी, फुलाजी उभे होते. एखाद्या देवालयाच्या दोन्ही बाजूंना द्वारपाल असावेत, तसे.
‘या, राजे!’ बाजींनी हात उंचावला.
धुक्याचा एक लोट आला आणि बाजी, फुलाजी दिसेनासे झाले.
राजे खेळण्याकडं चालू लागले होते. गजाखिंड ते खेळणा अंतर दीड कोस तरी होतं.

🚩क्रमशः🚩
सौजन्य :- सर्व क्रमशः लेख ( श्री. सागर पाटील – सोशल मिडिया ) 

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: पावनखिंडबाजीबांदलराजगडशिवाजी राजे
Previous Post

पावनखिंड भाग – ४४ बाजी प्रभू – इतिहास सन्मानाचा, अभिमानाचा, अतुल्य पराक्रमाचा

Next Post

आंब्याची फळगळती व त्यावरील उपाययोजना

Next Post
असे करा आंबा मोहोराचे संरक्षण…!

आंब्याची फळगळती व त्यावरील उपाययोजना

Comments 1

  1. bharat ashok suryawanshi says:
    5 years ago

    khupach chaan aani dhanywad tumchyamule aamhala barich mahiti milte

ताज्या बातम्या

मुंबई-कोकणासह पुण्यात धो-धो पाऊस का? जाणून घ्या नेमके कारण…

मुंबई-कोकणासह पुण्यात धो-धो पाऊस का? जाणून घ्या नेमके कारण…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 6, 2026
0

आजपासून राज्यात 3 दिवस धुमशान

आजपासून राज्यात 3 दिवस धुमशान

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 4, 2026
0

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी: शेतीकामासाठी माती-मुरूम वापरण्यावरील ‘रॉयल्टी’ माफ; पोलिसांचा ससेमिराही टळणार!

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी: शेतीकामासाठी माती-मुरूम वापरण्यावरील ‘रॉयल्टी’ माफ; पोलिसांचा ससेमिराही टळणार!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2026
0

भूमीहीन महिलांनाही मिळणार ‘शेतकरी’ दर्जा

भूमीहीन महिलांनाही मिळणार ‘शेतकरी’ दर्जा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2026
0

देशभरात मान्सूनचा जोर; 15 राज्यात पावसाचा धुमाकूळ, महाराष्ट्रात रेड अलर्ट!

देशभरात मान्सूनचा जोर; 15 राज्यात पावसाचा धुमाकूळ, महाराष्ट्रात रेड अलर्ट!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 2, 2026
0

आता आठवडाभर राज्यात पावसाचा जोर

आता आठवडाभर राज्यात पावसाचा जोर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 1, 2026
0

कमी दाबाचा पट्टा सक्रिय; आजपासून महाराष्ट्रात पावसाचा जोर पुन्हा वाढणार

कमी दाबाचा पट्टा सक्रिय; आजपासून महाराष्ट्रात पावसाचा जोर पुन्हा वाढणार

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 29, 2026
0

राज्यात आजपासून तीन दिवस पावसाचे..; 23 जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’

राज्यात आजपासून तीन दिवस पावसाचे..; 23 जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 27, 2026
0

राज्यात पावसाचा जोर वाढणार..

राज्यात पावसाचा जोर वाढणार..

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 24, 2026
0

मान्सून 2/3 दिवसात पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता

मान्सून 2/3 दिवसात पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 20, 2026
0

तांत्रिक

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 6, 2026
0

स्पायरल सेपरेटर

मळणीनंतर सोयाबीन व तूर साफसफाईसाठी- स्पायरल सेपरेटर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 22, 2025
0

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

जगाच्या पाठीवर

मुंबई-कोकणासह पुण्यात धो-धो पाऊस का? जाणून घ्या नेमके कारण…

मुंबई-कोकणासह पुण्यात धो-धो पाऊस का? जाणून घ्या नेमके कारण…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 6, 2026
0

आजपासून राज्यात 3 दिवस धुमशान

आजपासून राज्यात 3 दिवस धुमशान

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 4, 2026
0

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी: शेतीकामासाठी माती-मुरूम वापरण्यावरील ‘रॉयल्टी’ माफ; पोलिसांचा ससेमिराही टळणार!

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी: शेतीकामासाठी माती-मुरूम वापरण्यावरील ‘रॉयल्टी’ माफ; पोलिसांचा ससेमिराही टळणार!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2026
0

भूमीहीन महिलांनाही मिळणार ‘शेतकरी’ दर्जा

भूमीहीन महिलांनाही मिळणार ‘शेतकरी’ दर्जा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2026
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.

EnglishEnglish