e-NAM योजना भारत सरकारने 2016 साली काढली. शेतकऱ्यांसाठी भारत सरकारची ही एक महत्त्वपूर्ण कृषी योजना आहे. या योजनेचा माध्यमातून शेतकऱ्यांचे शेतमालाला वेगवेगळ्या बाजारपेठांमध्ये सहज आणि प्रभावीपणे विक्री करण्यासाठी एक केंद्रीय डिजिटल प्लॅटफॉर्म उपलब्ध करणे आहे.
उद्देश
हे एक राष्ट्रीय बाजारपेठ योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून, देशभरातील शेतकरी त्यांच्या उत्पादनांची विक्री एकच ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर करू शकतात. कुठल्याही मध्यस्थी व्यक्तीची मदत न घेता शेतकरी थेट बाजारपेठ सोबत जोडले जातात. या योजनेतून शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाला अधिक चांगल्या किमतीत विकता येईल, अशी व्यवस्था देखील केली आहे.
योजनेचे प्रमुख वैशिष्ट्ये
शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाचा लिलाव एकाच डिजिटल प्लॅटफॉर्मवर करता येऊ शकतो. विविध राज्यांतील बाजारपेठांमध्ये एकाच प्लॅटफॉर्मद्वारे उत्पादनाची विक्री केली जाऊ शकते. शेतकऱ्यांना त्यांचा व्यवहार सरळ व सोप्या पद्धतीने व्यापाऱ्यांसोबत करता येऊ शकतो, व त्याचा शेतकऱ्यांना अधिक लाभ होतो. या योजनेमध्ये ऑनलाइन पेमेंटची सुविधा देखील उपलब्ध आहे.
e-NAM आईडी
e-NAM (National Agriculture Market) मध्ये प्रवेश घेणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना याचे अँप आपल्या फोनमध्ये डाउनलोड करुन त्यात वापरकर्ता प्रोफाइल म्हणजेच e-NAM च्या अँपवर शेतकऱ्यांना आपले खाते तयार करणे आवश्यक असते.
योजनेचे फायदे
उत्पादनाच्या किमती आणि लिलाव प्रक्रियेतील संपूर्ण माहिती आधीच अँपवर दिलेली असते, ज्यामुळे भ्रष्टाचार आणि शंका कमी होतात व चोर चपाटी देखील होत नाही. शेतकरी आता त्याचे उत्पादने सहजपणे भारतातील विविध ठिकाणच्या बाजारपेठांमध्ये विकू शकतात. शेतकरी योग्य बाजारभाव आणि मागणीच्या आधारावर विक्री करू शकता.
e-NAM योजनेची कार्यप्रणाली
संपूर्ण देशातील 1000 + जास्त बाजारपेठ e-NAM मध्ये जोडले गेले आहेत. शेतकऱ्यांना त्यांचे उत्पादन ऑनलाइन लिलाव सिस्टीमवर पाठवता येते आणि व्यापारी उत्पादनाचे मूल्य आणि पोर्टफोलिओ पाहून त्यावर बोली लावू शकतात.
योजनेचा प्रभाव
अनेक वेळ शेतकऱ्यांना एकाच बाजारपेठेतील उत्पादकांपेक्षा जास्त फायदे मिळतात. कृषी क्षेत्रातील डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे, ज्यामुळे शेतकरी अधिक स्मार्ट होऊन त्यांचे उत्पादन व्यवस्थापित करू शकतात.
ई-नाम अॅप डाऊनलोड कसा करावा ?
गुगलच्या प्ले स्टोअर वर ई-नाम हे अॅप्लिकेशन उपलब्ध आहे.
ई-नाम ॲप डाऊनलोड करण्यासाठी तुमच्या मोबाईल मधील प्ले स्टोअर अॅप ओपन करावे लागेल.
त्यानंतर सर्च वर क्लिक करून e-NAM इंग्रजीत टाईप करायचे आहे.
त्यानंतर तुमच्यासमोर काही अॅपची लिस्ट दिसेल.
त्यातील लोगो पाहून शासनाचे अधिकृत अॅपच डाउनलोड करावे.
ई-नाम अॅपवर स्वतःची नाव नोंदणी कशी करावी ?
ई-नाम हे अॅप मोबाईलवर डाऊनलोड केल्यानंतर अॅप ओपन करायचे आहे.
आता तुमच्यासमोर भाषा निवडण्याचा पर्याय दिसेल.
त्यातून मराठी किंवा तुमच्या सोयीनुसार तुम्ही भाषा निवडू शकतात.
मराठी भाषा निवडल्यानंतर तुमच्यासमोर ‘अंतिम वापरकर्ता परवाना करार’ अशी सूचना दिसेल.
स्क्रीनच्या खालील बाजूस डाव्या कोपऱ्यात चौकटीत क्लिक करून उजव्या बाजूला ‘स्वीकार करा’ या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
त्यानंतर स्क्रीनवर शेतकरी, खरेदीदार, पिक, मंडी, भाव, नोंदणी असे पर्याय दिसतील. यापैकी नोंदणी या पर्यायावर क्लिक करून त्यामध्ये शेतकऱ्याला संपूर्ण माहिती भरायची आहे. (शेतकऱ्यांचे नाव, पत्ता, बँक खाते क्रमांक, आधार कार्ड क्रमांक, मोबाईल क्रमांक इत्यादी)
आवश्यक असलेली माहिती पूर्ण भरल्यानंतर सबमिट या बटणावर क्लिक करून तुमची नोंदणी प्रक्रिया पूर्ण होणार आहे. त्यानंतर तुम्ही ई-नाम या अॅपवरून विविध शेतीमालाच्या खरेदी-विक्री पासून ते विविध बाजारातील भाव व मालाची आवक यांची माहिती पाहू शकाल.
ई-नाम पोर्टल कसे वापरावे ?
आपण आपले नाव, पत्ता, संपर्क क्रमांक आणि आधार क्रमांक यासारखे तपशील देऊन ई-नाम पोर्टलवर शेतकरी, व्यापारी किंवा खरेदीदार म्हणून नोंदणी करू शकता.
एकदा नोंदणी केल्यानंतर आपण कोणत्या प्रकारच्या वस्तूचा व्यवहार करता, आपण किती प्रमाणात व्यापार करू इच्छिता आणि आपण विक्री किंवा खरेदी करण्यास तयार आहात अशी माहिती देऊन प्रोफाइल तयार करणे आवश्यक आहे.
ई-नाम पोर्टलवर आपल्या आवडीचे राज्य, जिल्हा आणि बाजारपेठ निवडून तुम्ही मार्केट शोधू शकता.
एकदा आपण बाजारपेठ निवडल्यानंतर आपण ज्या वस्तूची खरेदी किंवा विक्री करू इच्छित आहात त्या वस्तूसाठी बोली लावू शकता. आपण इतर व्यापारी आणि शेतकऱ्यांनी ठेवलेल्या निविदा पाहू शकता आणि त्यानुसार आपली बोली सुधारू शकता.
एकदा खरेदीदार किंवा विक्रेत्याने बोली स्वीकारली की, सौदा अंतिम होतो आणि ई-नाम पोर्टलद्वारे पेमेंट केले जाते.
खरेदीदार आणि विक्रेत्याने मान्य केलेल्या अटी व शर्तींनुसार वस्तूची डिलिव्हरी केली जाते.
हे लक्षात घेणे महत्वाचे आहे की ई-नाम पोर्टल सध्या भारतातील निवडक बाजारपेठांमध्ये उपलब्ध आहे आणि वस्तूंची उपलब्धता आणि किंमती बाजारानुसार भिन्न असू शकतात.

(अनेकदा शासकीय योजना सुधारित केल्या जातात, अनुदान नियम व टक्केवारीतही बदल होतात. त्यामुळे, ताज्या व अपडेटेड अधिक माहितीसाठी तसेच मार्गदर्शक सुचनासाठी नजीकच्या महाराष्ट्र शासन कृषि विभाग कार्यालयाशी संपर्क साधावा.)