• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

रेंगाळलेला मान्सून तूट भरून काढण्याची आशा…

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 20, 2022
in तांत्रिक
0
रेंगाळलेला मान्सून तूट भरून काढण्याची आशा…
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

नवी दिल्ली : देशाच्या बऱ्याचशा भागात अजूनही मान्सून पोहोचलेला नाही. या खोळंबलेल्या मान्सूनमुळे काही भागात तर पावसाची तूट 80 टक्क्यांपर्यंत आहे. अर्थात, असे असले तरी रेंगाळलेला मान्सून तूट भरून काढण्याची आशा भारतीय हवामान विभागासह (IMD) स्कायमेटनेही वर्तविली आहे.

मान्सून कसर भरून काढण्याची हवामान खात्याला आशा
हवामान खात्याने यंदा सलग चौथ्या वर्षी सामान्य मान्सूनचा अंदाज वर्तवला होता. मात्र, जूनच्या पूर्वार्धात त्याच्या संथ प्रगतीमुळे भातासारख्या पिकांच्या पेरणीला विलंब होत आहे. अर्थात, मान्सून जूनच्या उत्तरार्धात वेग वाढवेल आणि कमतरता भरून काढेल, अशी हवामान खात्याला आशा आहे. या अंदाजानुसार, गेल्या 2-4 दिवसात पावसाने सर्वत्र चांगला जोर धरला आहे. देशभरातील पावसाची तूट 11 जून रोजी 43 टक्क्यांवरून 17 जून रोजी 18 टक्क्यांवर आली आहे, असे हवामान खात्याचे (आयएमडी) महासंचालक मृत्यूंजय महापात्रा यांनी सांगितले. काही भाग वगळता आता पूर्व, मध्य आणि ईशान्य भारतात समाधानकारक पाऊस असून वायव्य भारतात 23 जूननंतर पर्जन्यवृष्टी वाढेल, असा अंदाजही “आयएमडी”ने वर्तवला आहे. मान्सूनचा पाऊस कधीही सर्वत्र एकसमान बरसत नाही. काही भागात कमी तर काही भागात अधिक पाऊस पडेल; पण देशभरातील अपेक्षित सरासरी गाठली जाईल, अशी “आयएमडी”ला आशा आहे.

 

चक्रीवादळाने मान्सून ताळ्यावर येण्याचा “स्कायमेट”चा अंदाज
“स्कायमेट”चे अध्यक्ष जीपी शर्मा यांनीही मान्सूनने तिसऱ्या आठवड्यात प्रवेश करूनही त्यात काही अडथळे असल्याचे मान्य केले. आतापर्यंत पाऊस समाधानकारक बरसलेला नसला तरी हे चित्र लवकरच बदलण्याची शक्यता त्यांनी वर्तवली. पश्चिम बंगाल, उत्तर ओडिशा आणि लगतच्या बांगलादेशच्या काही भागांवर चक्रीवादळ निर्माण होऊन गंगेच्या खोऱ्यात वाऱ्याचे स्वरूप बदलेल, असा अंदाज आहे. वायव्य भारतात मान्सूनच्या प्रगतीसाठी हे चक्रीवादळ महत्त्वपूर्ण ठरेल.

महाराष्ट्र, मध्यप्रदेशात चिंतेचे वातावरण
महाराष्ट्र, मध्य प्रदेश, तसेच शेजारील तेलंगणा, छत्तीसगड आणि झारखंडसह देशाचे मध्य भाग हे मान्सूनच्या पावसावर अवलंबून असलेले क्षेत्र आहे. मान्सूनचा पाऊस लांबल्यास किंवा समाधानकारक न बरसल्यास मध्य भारतात अन्न-धान्य उत्पादनावर परिणाम होऊ शकतो. म्हणून या भागातला शेतकरी सर्वात असुरक्षित असतो. कोकण किनारपट्टीपासून विदर्भापर्यंत पसरलेल्या महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्यात प्रदेशागणिक विविध हवामान परिस्थिती आहेत. मान्सूनला उशीर झाल्यास महाराष्ट्रातील खरीप उत्पादनाला मोठा धोका निर्माण होतो. म्हणूनच लांबलेल्या व अपुऱ्या मान्सूनमुळे या क्षेत्रात सध्या चिंतेचे वातावरण आहे. त्यामुळेच मध्य भारत समाधानकारक मान्सूनच्या पावसाची आतुरतेने वाट पाहत आहे.

 

पंजाब, हरियाणाला फारसा फरक नाही
पंजाब आणि हरियाणातील शेतकरी मान्सूनवर अवलंबून नाहीत. त्यांच्याकडे त्यांची संसाधने आणि नलिका विहिरी, कालवे इ. सिंचनाचे विस्तृत जाळे आहे. पंजाबमध्ये 98 टक्के पीक क्षेत्र खात्रीशीर सिंचनाखाली आहे. परंतु देशातील सर्वच प्रदेशांत असे चित्र नाही. देशाच्या काही भागात तर पावसाची तूट तब्बल 80 टक्क्यांपर्यंत वाढलेली आहे.

तूट भरून निघण्याचा अंदाज
मध्य भारतातील जूनच्या पूर्वार्धाचा निराशाजनक टप्पा आता संपलाय. या भागात जूनच्या उत्तरार्धात पावसाची चांगली कामगिरी अपेक्षित असल्याचा “स्कायमेट”चा अंदाज आहे. भारतीय कृषी संशोधन संस्थेचे (एआरएआय) मुख्य शास्त्रज्ञ विनोद सहगल यांनीही जूनच्या अखेरीस पावसाची तूट भरून काढली जाईल, असा विश्वास व्यक्त केला. आता यापुढे मान्सूनच्या प्रगतीचा दृष्टिकोन चांगला असून परिस्थिती इतकी चिंताजनक नाही, असेही त्यांनी सांगितली. आता जुलैमध्ये चांगला पाऊस झाला पाहिजे कारण जुलैच्या पहिल्या आठवड्यातील पावसाची मोठी तूट खरीप पिकासाठी विनाशकारी ठरू शकते, असेही सहगल यांनी स्पष्ट केले. चांगला पाऊस दीर्घकाळ आवश्यक आहे कारण उन्हाळ्यातील सलग उष्णतेच्या लाटेने जमिनीतील ओलावा शोषला आहे, असेही त्यांनी सांगितले.

काही अहवाल, अभ्यासात चिंताजनक भविष्याचे अंदाज
मान्सूनच्या प्रगतीत सुधारणा होण्याचा विश्वास व्यक्त होत असला तरी काही अभ्यास वा अहवाल मात्र मान्सूनचा उत्तरार्ध हा अस्थिर असेल, असे सूचित करतात. त्यानुसार, पुढील दोन महिन्यांत पावसाची तूट कायम राहील. पावसाची तूट जुलैच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यात कायम राहिल्यास, त्याचे गंभीर परिणाम देशाच्या अर्थचक्रावर होतील.

India’s 70 per cent rainfall registered through mansoon showers and it irrigates almost 60 per cent of its net sown area. Approximately country’s half of the population depends on agriculture directly or indirectly.
Poor monsoon could create danger for India’s agriculture-based economy, say experts.

 

 

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: आयएमडी मान्सून भाकीतकृषी अर्थव्यवस्थाखरीप हंगामचक्रीवादळंमहागाईचा भडकामान्सून पावसाची तूटहवामान खाते अंदाज
Previous Post

पावसाळ्यात पशुपालकांनी जनावरांची घ्यावयाची काळजी

Next Post

पावसाळ्यात पशुपालकांनी जनावरांची घ्यावयाची काळजी:भाग-२

Next Post
पावसाळ्यात पशुपालकांनी जनावरांची घ्यावयाची काळजी:भाग-२

पावसाळ्यात पशुपालकांनी जनावरांची घ्यावयाची काळजी:भाग-२

ताज्या बातम्या

शाळकरी बहिणींचा शेळीच्या दुधापासून कोटीचं स्टार्टअप

शाळकरी बहिणींचा शेळीच्या दुधापासून कोटीचं स्टार्टअप !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 21, 2026
0

स्कॉटलंड

दुधाला भाव नाही, घामाचे दाम नाही: स्कॉटलंडमध्ये 20 वर्षांतील सर्वात तीव्र डेअरी संकट!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 20, 2026
0

जळगाव जिल्ह्यात केळी पिकाने बदलले शेतकऱ्यांच्या दोन पिढ्यांचे जीवनमान !

जळगाव जिल्ह्यात केळी पिकाने बदलले शेतकऱ्यांच्या दोन पिढ्यांचे जीवनमान !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 21, 2026
0

उत्तर भारतात पुन्हा कडाक्याची थंडी

उत्तर भारतात पुन्हा कडाक्याची थंडी; महाराष्ट्रात हळूहळू तापमान वाढणार – IMD

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 19, 2026
0

महाराष्ट्रात थंडीचे पुनरागम

महाराष्ट्रात थंडीचे पुनरागम: जाणून घ्या सद्यस्थिती, कारणे आणि पुढील 72 तासांचा हवामान अलर्ट

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 16, 2026
0

भाजीपाल्याची लागवड

जानेवारी-फेब्रुवारीत करा “या” पिकांची, फळ-भाजीपाल्याची लागवड अन् मिळवा रग्गड उत्पन्न!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 14, 2026
0

मोबाईलच सांगणार तुमच्या नुकसानीचा आकडा

पशुपालकांनो, आता मोबाईलच सांगणार तुमच्या नुकसानीचा आकडा! लुवास विद्यापीठाचा ‘हा’ ॲप ठरणार गेम चेंजर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 13, 2026
0

जैन हिल्स कृषी महोत्सव

जैन हिल्स कृषी महोत्सव 2025-26: जिथे तंत्रज्ञान आणि परंपरा एकत्र येऊन शेतकऱ्यांचे भविष्य घडवतात

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 11, 2026
0

महाराष्ट्र थंडीने गारठला: पाच वर्षांतील सर्वात तीव्र हिवाळा; हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा

महाराष्ट्र थंडीने गारठला: पाच वर्षांतील सर्वात तीव्र हिवाळा; हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 10, 2026
0

जानेवारी महिन्यात करावयाची महत्त्वाची शेती कामे

जानेवारी महिन्यात करावयाची महत्त्वाची शेती कामे

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 10, 2026
0

तांत्रिक

स्पायरल सेपरेटर

मळणीनंतर सोयाबीन व तूर साफसफाईसाठी- स्पायरल सेपरेटर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 22, 2025
0

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

जगाच्या पाठीवर

शाळकरी बहिणींचा शेळीच्या दुधापासून कोटीचं स्टार्टअप

शाळकरी बहिणींचा शेळीच्या दुधापासून कोटीचं स्टार्टअप !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 21, 2026
0

स्कॉटलंड

दुधाला भाव नाही, घामाचे दाम नाही: स्कॉटलंडमध्ये 20 वर्षांतील सर्वात तीव्र डेअरी संकट!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 20, 2026
0

जळगाव जिल्ह्यात केळी पिकाने बदलले शेतकऱ्यांच्या दोन पिढ्यांचे जीवनमान !

जळगाव जिल्ह्यात केळी पिकाने बदलले शेतकऱ्यांच्या दोन पिढ्यांचे जीवनमान !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 21, 2026
0

उत्तर भारतात पुन्हा कडाक्याची थंडी

उत्तर भारतात पुन्हा कडाक्याची थंडी; महाराष्ट्रात हळूहळू तापमान वाढणार – IMD

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 19, 2026
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.

EnglishEnglish