• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

 सततचे ढगाळ हवामान व गायब झालेली थंडीमुळे रब्बीवर होतोय प्रतिकूल परिणाम

Team Agroworld by Team Agroworld
January 20, 2021
in इतर
0
 सततचे ढगाळ हवामान व गायब झालेली थंडीमुळे रब्बीवर होतोय प्रतिकूल परिणाम
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

प्रतिनिधी/ पुणे

हवामान बदलाचे परिणाम आता शेतीवरही दिसायला सुरुवात झाली आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. विदर्भ व मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी पाऊसही पडला आहे. महाराष्ट्राबरोबर देशातील काही भागात हिवाळा संपताना आणि उन्हाळ्याची सुरुवात होत असताना अवकाळी पाऊस पडतो. मात्र यावेळचा अवकाळी पाऊस हिवाळ्यातच सुरू झाला आहे. या वातावरणाचा पिकांवर मात्र प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ढगाळ हवामान रोगांचा प्रादुर्भाव होण्यास अनुकूल आहे. त्यामुळे या दिवसांत रब्बी हंगामातील पिके संकटात सापडली आहेत.

सातत्याने होत असलेल्या हवामान बदलाचा परिणाम पिकांवरही होत आहे. त्यामुळे थंडीदेखील कमी झाली आहे. हरभरा पिकावर घाटे अळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वाढली आहे. तसेच कांदा पिकावर करपा, गहू पिकावर तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. भाजीपाला पिकांनाही हवामान त्रासदायक ठरत आहे. एकूणच रब्बी हंगामातील पिकांना सध्याचे हवामान त्रासदायक ठरत आहे. या काळात प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे. या हवामान काळात पिकांची काळजी कशी घ्यावी, कीडरोगांना प्रतिबंध करण्यासाठी काय उपाययोजना कराव्यात, याबाबत मार्गदर्शन केले जात आहे.


पिकांच्या वाढीसाठी थंडी गरजेची आहे. ढगाळ वातावरण वाढल्यामुळे थंडी कमी झाली आहे. या वातावरणाने हरभरा व गहू, तूर, भाजीपाला आदी रब्बी हंगामातील पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे. ढगाळ व दमट वातावरणामुळे द्राक्षबागायतदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. या वातावरणात द्राक्षबागांवर ‘प्लझमोपॅरा व्हीटीकोला’ म्हणजेच ‘डाऊनी’ रोगाचा प्रादुर्भाव वाढणार आहे. तसेच डाळिंब बागांवर देखील बुरशीजन्य रोगाची शक्यता आहे. द्राक्षावर कमी-अधिक प्रमाणात डाऊनी रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. आर्द्रतायुक्त हवामानात डाऊनी या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. या रोगामुळे द्राक्षपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. या रोगाला दमट वातावरण अनकूल असते. डाऊनीची लागण द्राक्षबागांमध्ये पाने, फुले व घडावर होत असते. त्यामुळे रोगग्रस्त भागावरील विषाणू मृत होतात व रोगग्रस्त भाग निकामी होतो. या रोगाला पोषक हवामान असल्यास रोगाचे नियंत्रण करणे अवघड होते. ढगाळ हवामानामुळे फळबागांवर बुरशीजन्य आजारांचा प्रादुर्भाव वाढणार आहे. तर भाजीपाला आणि तृणधान्य पिकांवर तांबेरा रोग येईल.
यामुळे होतो पिकावर विपरीत परिणाम

रब्बीच्या हंगामासाठी थंडी हा प्रमुख घटक असतो. प्रकाश संश्लेषण क्रिया ढगाळ हवामानामध्ये रोखली जाते. परिणामी फळबागांवर बुरशीजन्य रोग वाढतात. रोगराई रोखण्यासाठी ८० टक्के गंधक असलेली औषधांची फवारणी शेतकऱ्यांनी करावी.-

गव्हाच्या पिकावर परिणाम

गव्हाच्या पीकवाढीच्या अवस्थेत असताना अचानक तापमानात झालेली वाढ या पिकाच्या वाढीच्या दृष्टीने घातक आहे. उष्मांकात वाढ झाल्याने आणि थंडीच्या प्रमाणात घट झाल्याने पिकात लवकर परिपक्वता येण्याच्या क्रियेत झपाट्याने वाढ होते. गव्हाच्या पीकवाढीच्या अवस्था निश्‍चित अथवा ठराविक कालावधीपूर्वी पूर्ण करते. त्याचा पिकाच्या वाढीवर, उंचीवर, कांड्यांच्या लांबीवर, ओंबीच्या लांबीवर, दाण्याच्या संख्येवर आणि दाण्याच्या आकारावर अनिष्ट परिणाम होतो. उत्पादनात, उताऱ्यात घट येऊन दाण्याची प्रत खालावते. जेव्हा थंडीचा कालावधी अधिक असावयास हवा तेव्हा थंडीत चढ- उताराने कालावधी कमी- अधिक होतो आहे. त्याचे थेट परिणाम गव्हाच्या पिकावर दिसतात.

कांदा पिकावर ढगाळ हवामानाचे परिणाम

ढगाळ हवामान येताच तुडतुड्यांची वाढ झपाट्याने होते. पिकातील रस शोषण्याचे काम तुडतुड्यांची पिल्ले सुरवातीच्या काळात मोठ्या प्रमाणात करतात. कांदा पातीचा तजेलदारपणा जातो आणि पाती माना टाकू लागतात. कांदा वाढणे आणि पोसणे हे हवामानावरच अवलंबून असते. तसेच करपा रोगाचा प्रादुर्भावही वाढण्याची भीती असते. याचा पिकाचे वाढीवर, उत्पादनावर आणि प्रतीवर विपरीत परिणाम होऊ शकतो.

ज्वारी पिकावरील परिणाम

ढगाळ हवामान ज्वारी पिकास उपयुक्त ठरेल. मात्र वाढणारे तापमानामुळे हवेतील आर्द्रतेचे प्रमाण कमी होऊन दव पडण्याचे क्रियेत अडथळा येईल, त्याचा परिणाम रब्बी ज्वारी पिकावर होईल. या वेळी पुंकेसर, स्त्रीकेसर आणि फुलधारणेत विशेष अडचणी येणार नाहीत. मात्र दाण्यांची संख्या अधिक असूनही दाण्यांचा आकार लहान राहील. त्यामुळे उत्पादकता घटेल आणि प्रत खालावेल. बागायत रब्बी ज्वारीवर विशेष परिणाम होणार नाही. मात्र कोरडवाहू रब्बी ज्वारीवर त्याचे परिणाम जाणवतील.

हरभरा व तूर पिकावर परिणाम

हरभरा आणि हरभऱ्यावरील घाटे अळीचा उपद्रव वाढेल, तर तुरीच्या शेंगा पोखरणाऱ्या अळीचे प्राबल्य वाढेल. त्यासाठी या दोन्ही किडींपासून पिकाचे संरक्षण करणे आवश्‍यक राहील. अन्यथा नुकसानीच्या पातळीत वाढ होईल.

हवामान आधारीत कृषि सल्ला आपल्याला म.फु. कृषि विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळ किंवा ०२४२६ २४३२३९  या दूरध्वनी.क्रमांकावर मिळू शकेल.   
सौजन्य – इंटरनेट

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: कांदाज्वारीडाऊनीढगाळ हवामानतांबेराथंडीहरभरा व तूर
Previous Post

पावनखिंड भाग – ३४ बाजी प्रभू – इतिहास सन्मानाचा, अभिमानाचा, अतुल्य पराक्रमाचा

Next Post

पावनखिंड भाग – ३५ बाजी प्रभू – इतिहास सन्मानाचा, अभिमानाचा, अतुल्य पराक्रमाचा

Next Post
पावनखिंड भाग – 5  बाजी प्रभू – इतिहास सन्मानाचा, अभिमानाचा, अतुल्य पराक्रमाचा

पावनखिंड भाग – ३५ बाजी प्रभू – इतिहास सन्मानाचा, अभिमानाचा, अतुल्य पराक्रमाचा

ताज्या बातम्या

शाळकरी बहिणींचा शेळीच्या दुधापासून कोटीचं स्टार्टअप

शाळकरी बहिणींचा शेळीच्या दुधापासून कोटीचं स्टार्टअप !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 21, 2026
0

स्कॉटलंड

दुधाला भाव नाही, घामाचे दाम नाही: स्कॉटलंडमध्ये 20 वर्षांतील सर्वात तीव्र डेअरी संकट!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 20, 2026
0

जळगाव जिल्ह्यात केळी पिकाने बदलले शेतकऱ्यांच्या दोन पिढ्यांचे जीवनमान !

जळगाव जिल्ह्यात केळी पिकाने बदलले शेतकऱ्यांच्या दोन पिढ्यांचे जीवनमान !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 21, 2026
0

उत्तर भारतात पुन्हा कडाक्याची थंडी

उत्तर भारतात पुन्हा कडाक्याची थंडी; महाराष्ट्रात हळूहळू तापमान वाढणार – IMD

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 19, 2026
0

महाराष्ट्रात थंडीचे पुनरागम

महाराष्ट्रात थंडीचे पुनरागम: जाणून घ्या सद्यस्थिती, कारणे आणि पुढील 72 तासांचा हवामान अलर्ट

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 16, 2026
0

भाजीपाल्याची लागवड

जानेवारी-फेब्रुवारीत करा “या” पिकांची, फळ-भाजीपाल्याची लागवड अन् मिळवा रग्गड उत्पन्न!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 14, 2026
0

मोबाईलच सांगणार तुमच्या नुकसानीचा आकडा

पशुपालकांनो, आता मोबाईलच सांगणार तुमच्या नुकसानीचा आकडा! लुवास विद्यापीठाचा ‘हा’ ॲप ठरणार गेम चेंजर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 13, 2026
0

जैन हिल्स कृषी महोत्सव

जैन हिल्स कृषी महोत्सव 2025-26: जिथे तंत्रज्ञान आणि परंपरा एकत्र येऊन शेतकऱ्यांचे भविष्य घडवतात

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 11, 2026
0

महाराष्ट्र थंडीने गारठला: पाच वर्षांतील सर्वात तीव्र हिवाळा; हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा

महाराष्ट्र थंडीने गारठला: पाच वर्षांतील सर्वात तीव्र हिवाळा; हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 10, 2026
0

जानेवारी महिन्यात करावयाची महत्त्वाची शेती कामे

जानेवारी महिन्यात करावयाची महत्त्वाची शेती कामे

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 10, 2026
0

तांत्रिक

स्पायरल सेपरेटर

मळणीनंतर सोयाबीन व तूर साफसफाईसाठी- स्पायरल सेपरेटर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 22, 2025
0

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

जगाच्या पाठीवर

शाळकरी बहिणींचा शेळीच्या दुधापासून कोटीचं स्टार्टअप

शाळकरी बहिणींचा शेळीच्या दुधापासून कोटीचं स्टार्टअप !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 21, 2026
0

स्कॉटलंड

दुधाला भाव नाही, घामाचे दाम नाही: स्कॉटलंडमध्ये 20 वर्षांतील सर्वात तीव्र डेअरी संकट!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 20, 2026
0

जळगाव जिल्ह्यात केळी पिकाने बदलले शेतकऱ्यांच्या दोन पिढ्यांचे जीवनमान !

जळगाव जिल्ह्यात केळी पिकाने बदलले शेतकऱ्यांच्या दोन पिढ्यांचे जीवनमान !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 21, 2026
0

उत्तर भारतात पुन्हा कडाक्याची थंडी

उत्तर भारतात पुन्हा कडाक्याची थंडी; महाराष्ट्रात हळूहळू तापमान वाढणार – IMD

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 19, 2026
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.

EnglishEnglish