• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

भारतात वाढतेय नैसर्गिक शेती; अन्न सुरक्षेला बाधा न आणता 2030 पर्यंत 30% कृषिक्षेत्रात “नॅचरल फार्मिंग”चा अंदाज

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 13, 2022
in हॅपनिंग
0
भारतात वाढतेय नैसर्गिक शेती; अन्न सुरक्षेला बाधा न आणता 2030 पर्यंत 30% कृषिक्षेत्रात “नॅचरल फार्मिंग”चा अंदाज
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

भारतात अन्न सुरक्षेला कोणतीही बाधा न आणता भारतात 2030 पर्यंत 30% कृषिक्षेत्रात नैसर्गिक शेती (नॅचरल फार्मिंग) वाढू शकते, असा नीति आयोगाचा अंदाज आहे. नीति आयोगाचे सदस्य रमेश चंद यांनी हा अंदाज व्यक्त केला आहे. खतांचा वापर कमी असलेल्या मध्य प्रदेश, राजस्थान या राज्यांसह उत्तर प्रदेशातील गंगा काठच्या भागात एकूण पिकाच्या 6% भागात नैसर्गिक शेती वाढू शकते. तर पुढील दशकांत भारताच्या अन्नसुरक्षेला धोका न पोहोचवता अशा शेती पद्धतींचा हळूहळू विस्तार होऊ शकतो, अशी शक्यता चंद यांनी व्यक्त केली आहे.

 

रासायनिक मुक्त शेतीचे प्रयोग जगभर वाढत आहेत. नॅचरल उत्पादनांना मोठी मागणीही आहे. मात्र, वाढीव उत्पादन खर्च आणि तुलनेने कमी उत्पादन यामुळे नैसर्गिक शेतीच्या हव्यासात राष्ट्रीय अन्न सुरक्षेला धक्का पोहोचू शकतो, असा प्रमुख आक्षेप घेतला जातो. भारत मात्र अन्न सुरक्षा व उत्पादनाचे गणित न बिघडवता रासायनिक मुक्त शेतीचे एकरी क्षेत्र 15% आणि 2030 पर्यंत 30% पर्यंत दुप्पट करू शकतो, असे नीति आयोगाला वाटते. कारण खत अनुदान कमी करून उत्पादन आणि निर्यातीत होणारे नुकसान भरून काढता येऊ शकेल.

 

श्रीलंकेचा धडा घेऊन खबरदारी

श्रीलंकेने रासायनिक खत वापरावर पूर्ण बंदी घातली होती. मात्र, श्रीलंकाप्रमाणे नैसर्गिक शेतीचा अवास्तव प्रयोग टाळून भारताच्या अन्न सुरक्षेशी तडजोड न करता, 2030 पर्यंत भारताला 30% क्षेत्रात नैसर्गिक शेती करणे परवडेल, असे चंद म्हणाले. “गेल्या अनेक वर्षांत भारताचे अन्न उत्पादन वार्षिक 3-3.25% ने वाढत आहे तर लोकसंख्या वाढीचा दर 1.5% च्या खाली गेला आहे. “म्हणून, देशांतर्गत मागणी 2-2.25%/वार्षिक वाढीसह, आमच्याकडे उत्पादन वाढीचा 1 टक्के पॉइंट आहे, जो देशांतर्गत वापरासाठी आवश्यक नाही.”

रासायनिक खते न वापरल्याने उत्पादनात होणारी घट भरून काढणार

नैसर्गिक, सेंद्रिय शेतीमध्ये, कृषी-रसायनांचा वापर न केल्यास 30-35% उत्पादनाचे नुकसान होते. मात्र, भारत आता हळूहळू निर्यात व्यापार बंद करण्याच्या स्थितीत आहे. सध्या देशातून 6-7% उत्पादन निर्यात केले जाते. जर आपण सेंद्रिय शेतीसाठी एकरी 20% उत्पादन घट गृहीत धरली तरी त्याचा एकूण अन्न-धान्य उत्पादनावर विपरित परिणाम होणार नाही, असे चंद म्हणाले.

 

खतांच्या वाढत्या किंमतीचा भार

खतांच्या किमतीतील वाढीचा मोठा बोझा सरकारवर पडत आहे. 2022-23 मध्ये सबसिडी 2.15 ट्रिलियन रुपयांवर जाण्याची अपेक्षा आहे. 2021-22 मध्ये ती 1.62 ट्रिलियन रुपये होती. मुख्यत: फॉस्फेट आणि पोटॅशच्या जागतिक किमतीत वाढ झाल्यामुळे हा भार पडतो. पुढील काही वर्षांत नैसर्गिक शेतीचे यशस्वी मॉडेल्स विकसित होण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे खतांच्या वाढत्या अनुदानात व सरकारवरील बोझ्यात घट होईल.

 

रसायने आरोग्याला घातक

हरितक्रांतीत रसायने आणि खतांची भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक वेळा मान्य केली आहे; परंतु कीटकनाशके आणि आयात केलेल्या खतांच्या धोक्यांविरुद्ध त्यांनी वेळोवेळी इशारा दिला आहे. यामुळे निविष्ठांच्या खर्चातही वाढ होते, शिवाय आरोग्यालाही हानी होते. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी, 2022-23 च्या अर्थसंकल्पीय भाषणात म्हटले होते की, गंगा नदीकाठी 5 किमी रुंद कॉरिडॉरमधील शेतापासून नैसर्गिक, सेंद्रीय शेतीची सुरुवात केली जाईल. नंतर या रसायनमुक्त शेतीला देशभर प्रोत्साहन दिले जाईल.

भारतीय प्राकृत कृषी पदधती BPKP द्वारे नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन

2022-23 च्या बजेटमध्ये सरकारचा अन्न अनुदान खर्च आणखी वाढण्याची अपेक्षा आहे.

त्यामुळेच कृषी मंत्रालयाकडून भारतीय प्राकृत कृषी विकास योजना 2020-21 मध्ये सादर केली गेली. भारतीय प्राकृत कृषी पदधती (BPKP) द्वारे नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन दिले जात आहे. BPKP दत्तक घेण्यासाठी शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 12,200ची आर्थिक मदत दिली जाते आणि सुमारे 0.4 दशलक्ष हेक्टर क्षेत्र नैसर्गिक शेतीखाली आहे.

 

 

अन्न अनुदानामध्ये डीबीटी लागू करणे अवघड

सार्वजनिक वितरण प्रणाली अर्थात रेशन, पीडीएस अंतर्गत अनुदानित अन्नधान्याच्या बदल्यात रोख थेट लाभ हस्तांतरण (DBT) लागू करण्यास अनेक समस्या आहेत. मुख्यत: यामुळे देशाची अन्न सुरक्षा धोक्यात येऊ शकते. अन्न अनुदानामध्ये डीबीटी लागू करताना येणाऱ्या आव्हानांबद्दल चंद म्हणाले की, देश बफर स्टॉक आणि खरेदी व्यवस्था सोडू शकेल, अशा टप्प्यावर अजून पोहोचलेला नाही. ते म्हणाले, “भारताचे अन्नधान्याच्या बफर स्टॉकिंगचे धोरण अन्न संकट आणि किमतीच्या धक्क्यापासून देशाचे संरक्षण करण्यासाठी उपयुक्त ठरले आहे.”

 

चंद म्हणाले की, खतांच्या वापरामध्ये राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात तफावत आहे. याशिवाय भाड्याच्या, करार शेतीमध्ये गुंतलेल्या शेतकऱ्यांच्या गटाला, शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये थेट खत अनुदानाचे पेमेंट जमा होणे मान्य नाही.

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: अनुदानअन्न अनुदानामध्ये डीबीटी लागू करणे अवघडअन्न सुरक्षाअर्थमंत्री निर्मला सीतारामननॅचरल फार्मिंगनॅचरल फार्मिंगचा अंदाजबफर स्टॉकभारतात वाढतेय नैसर्गिक शेतीभारतीय प्राकृत कृषी विकास योजना
Previous Post

काय? पीएम किसान योजनेचे दोन हजार रुपये मिळालेले नाहीत? तर मग अशी करा तक्रार आणि तात्काळ मिळवा रक्कम!

Next Post

कृषि क्षेत्रातील तांत्रिक प्रगतीमुळे ॲग्रीटेक स्पेसमध्ये नवीन नोकऱ्या, करिअरच्या वाढत्या संधी

Next Post
कृषि क्षेत्रातील तांत्रिक प्रगतीमुळे ॲग्रीटेक स्पेसमध्ये नवीन नोकऱ्या, करिअरच्या वाढत्या संधी

कृषि क्षेत्रातील तांत्रिक प्रगतीमुळे ॲग्रीटेक स्पेसमध्ये नवीन नोकऱ्या, करिअरच्या वाढत्या संधी

ताज्या बातम्या

धराक्षा इकोसोल्युशन्स : पिकांच्या अवशेषांचे सोने करणारे स्टार्ट अप !

धराक्षा इकोसोल्युशन्स : पिकांच्या अवशेषांचे सोने करणारे स्टार्ट अप !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 16, 2025
0

गावठी कोंबडीचा स्टार्ट-अप

आईसोबत तरुणाने सुरु केला गावठी कोंबडीचा स्टार्ट-अप; आज 45 कोटींचा व्यवसाय !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 15, 2025
0

खान्देशातील धरणे फुल्ल

खान्देशातील धरणे फुल्ल; रब्बी “नो टेन्शन”; मका, भाजीपालासह रब्बी क्षेत्र वाढीचा अंदाज

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 14, 2025
0

अमेरिकेत विक्रमी मका उत्पादन

अमेरिकेत विक्रमी मका उत्पादन; निर्यातीसाठी दबाव

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 14, 2025
0

राज्यातून मान्सून माघारीला सुरुवात

राज्यातून मान्सून माघारीला सुरुवात; येत्या 24 तासात संपूर्ण महाराष्ट्रातून होणार एक्झिट – आयएमडी

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 13, 2025
0

हवामान दुष्चक्र

हवामान दुष्चक्र: युरोपात उष्णतेच्या लाटेने घेतले 62 हजार बळी!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 11, 2025
0

हुश्श… रिटर्न मान्सून दोन दिवसात राज्यातून परतणार; अशी असेल वाटचाल – आयएमडी

हुश्श… रिटर्न मान्सून दोन दिवसात राज्यातून परतणार; अशी असेल वाटचाल – आयएमडी

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 10, 2025
0

हवामान विभागा

आजचा दिवस पावसाचा! “या” जिल्ह्यांसाठी हवामान विभागाचा अलर्ट जारी

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 9, 2025
0

Agriculture Minister Dattatray Bharane

Agriculture Minister Dattatray Bharane Receives Invitation for AgroWorld Agricultural Expo

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 8, 2025
0

विदर्भातील 30,000 शेतकऱ्यांना कर्जाच्या चक्रव्युहातून बाहेर येण्यास मदत करणारे स्टार्टअप

विदर्भातील 30,000 शेतकऱ्यांना कर्जाच्या चक्रव्युहातून बाहेर येण्यास मदत करणारे स्टार्टअप

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 8, 2025
0

तांत्रिक

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

जगाच्या पाठीवर

धराक्षा इकोसोल्युशन्स : पिकांच्या अवशेषांचे सोने करणारे स्टार्ट अप !

धराक्षा इकोसोल्युशन्स : पिकांच्या अवशेषांचे सोने करणारे स्टार्ट अप !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 16, 2025
0

गावठी कोंबडीचा स्टार्ट-अप

आईसोबत तरुणाने सुरु केला गावठी कोंबडीचा स्टार्ट-अप; आज 45 कोटींचा व्यवसाय !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 15, 2025
0

खान्देशातील धरणे फुल्ल

खान्देशातील धरणे फुल्ल; रब्बी “नो टेन्शन”; मका, भाजीपालासह रब्बी क्षेत्र वाढीचा अंदाज

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 14, 2025
0

अमेरिकेत विक्रमी मका उत्पादन

अमेरिकेत विक्रमी मका उत्पादन; निर्यातीसाठी दबाव

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 14, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.

EnglishEnglish