• Home
    • आमच्याविषयी
AgroWorld
Advertisement
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

नंदुरबार, चोपडा, शिरपूरमधील खालावलेल्या भूजल पातळीची धोक्याची घंटा !

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 30, 2022
in तांत्रिक
1
नंदुरबार, चोपडा, शिरपूरमधील खालावलेल्या भूजल पातळीची धोक्याची घंटा !
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

मुंबई : राज्यातील 5 जिल्ह्यांतील 9 तालुक्यांमधील सुमारे 114 गावांतील पाणीपातळी चिंताजनक खालावलेल्या पातळीवर आहे. त्यात खानदेशातील नंदुरबार, जळगाव आणि धुळे जिल्ह्यातील तीन तालुक्यात 26 गावांमधील भूजल पातळी धोकेदायक खोलीच्या स्तरावर पोहोचली आहे. यंदा अजूनपर्यंत समाधानकारक पाऊस झालेला नसल्याचे कारण सरकारी यंत्रणा सांगत असल्या तरी भरमसाठ, धोरणहीन आणि अनियंत्रित पाणी उपशामुळे ही वेळ ओढवल्याचा पर्यावरण तज्ञांचा दावा आहे. राज्यातील पाणी पातळी खालावलेल्या या 114 गावांमध्ये सध्या पिण्याच्या पाण्याची टंचाई असल्याचा अनुमान भूजल सर्वेक्षण विभागाने काढला आहे. त्यामुळे उन्हाळ्यात या गावात टँकरने पाणी पुरवावे लागले होते. याशिवाय अजूनही या गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा सुरूच आहे.

शेतीत रासानिक, सेंद्रियचा समन्वय… प्रयोगशील शेतकरी उमेश बंग यांचा शेतीचा यशस्वी मंत्र

फलटणखालोखाल नंदुरबार राज्यात सर्वात भीषण; “शिरपूर पॅटर्न”चे झाले काय?

खालावलेल्या पाणी पातळीच्या गंभीर स्थितीबाबत सर्वाधिक पुणे जिल्ह्यातील 4 तालुके आणि 31 गावे आहेत. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव 5, बारामती 16, शिरूर 8 आणि वेल्हे तालुक्यातील 2 गावात भूजल पातळी खालावली आहे. सातारा जिल्ह्यातील फलटण या एकाच तालुक्यातील 56 गावांत भूजल पातळी खालावलेली आहे. त्या अर्थाने हा तालुका राज्यात सर्वात भीषण स्थितीत आहे. त्या खालोखाल नंदुरबार जिल्ह्यात नंदुरबार या एकाच तालुक्यात 19 गावे असल्याचे भूजल सर्वेक्षण आणि विकास आयुक्त चिंतामणी जोशी यांनी सांगितले. जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात 5 तर धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात 2 गावातील पाणीपातळी खालावली आहे. त्यामुळे राज्यभर बोलबाला झालेला “शिरपूर पॅटर्न” सध्या थंडावला की काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

भूजल पातळीत 2 ते 3 मीटरने घट

भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेद्वारे दरवर्षी एका जलवर्षातून चार वेळा (माहे ऑक्टोबर, जानेवारी, मार्च व मे) पाणलोट क्षेत्रनिहाय निश्चित केलेल्या विहिरीमधील भूजल पातळीचा अभ्यास केला जातो. भूजलाची उपलब्धता मुख्यत्वे जून ते सप्टेंबर या कालावधीत पडणाऱ्या नैऋत्य मोसमी पावसावर अवलंबून असल्यामुळे माहे सप्टेंबर अखेर राज्यात पर्जन्यमान व माहे ऑक्टोबर मधील भूजल पातळी यांच्या नोंदी घेऊन सरासरीच्या तुलनेत पर्जन्यमान व भूजल पातळीत झालेली बाड अथवा घट यांचा तुलनात्मक अभ्यास करून राज्यातील पिण्याच्या पाण्याच्या टंचाईबाबत संभाव्य अनुमान काढले जाते. भूजल पातळीमध्ये 2 ते 3 मीटर घट असलेल्या 2 तालुक्यांतील 5 गावांचा आणि 1 ते 2 मीटर घट असलेल्या 9 तालुक्यांतील 109 गावांचा समावेश आहे.

रोजगार निर्मितीसाठी ; शेळी समूह योजना राज्यातील शेती पूरक उद्योगाची जोड देणे अतिशय आवश्‍यक आहे. शेतीच्या उत्पादनावर आधारित आणि हमखास उत्पन्न देणारा शेळीपालन पूरक उद्योग रुजला आहे .या उद्योगाला चालना देऊन शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे तसेच ग्रामीण भागात रोजगार निर्मिती करण्यासाठी राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागामार्फत शेळी समूह योजना सुरू करण्यात आली आहे या योजनेबाबत..

जिल्हास्तरावर टंचाई निवारणार्थ उपाययोजनांसाठी उपयुक्त आराखडा

माहे सप्टेंबर अखेर झालेले पर्जन्यमान व निरिक्षण विहिरीतील स्थिर भूजल पातळीचा तुलनात्मक अभ्यासाआधारे संभाव्य पाणी टंचाई गावाची संख्या अनुमानित केली जाते व ऑक्टोबर अखेर जिल्हा स्तरावर तयार झालेल्या टंचाई आराखडयानुसारच जिल्हास्तरावर टंचाई निवारणार्थ उपाययोजनांच्या अंमलबजावणीची कामे केली जातात. जानेवारी, मार्च आणि मे अखेरील भूजल पातळीच्या तुलनात्मक अभ्यासाआधारे टंचाई परिस्थितीचा केवळ अंदाज घेतला जातो, मात्र या आधारे नव्याने संभाव्य पाणी टंचाई भासणारी गावे अनुमानित अथवा घोषित केली जात नाहीत.

मार्च 2022 मधील भूजल पातळीचा तुलनात्मक अभ्यास

ऑक्टोबर 2021 ते मार्च 2022 या कालावधीत जलधारातून विविध कामासाठी मुख्यत्वे सिंचनाकरिता तसेच पिण्याच्या पाण्यासाठी झालेला भूजल उपसा व त्यामुळे भूजल पातळीत झालेला बदल याबाबतची माहिती मार्च 2022 मध्ये निरिक्षण विहिरीमधील घेतलेल्या स्थिर भूजल पातळीच्या अभ्यासावरुन कळून येते. मार्च 2022 अखेर निरिक्षण विहिरीमधील भूजल पातळीच्या घेतलेल्या नोंदीची तुलना मागील पाच वर्षाच्या जानेवारीमधील भूजल पातळीच्या सरासरांशी केली असता, राज्यातील एकूण निरिक्षण विहिरीपैकी 2,978 विहिरीमधील भूजल पातळीमध्ये सरासरीपेक्षा वाढ तर 720 निरिक्षण विहिरीमधील भूजल पातळीत सरासरीच्या तुलनेत घट आढळून आलेली आहे. यापैकी 18 निरिक्षण विहिरीतील भूजल पातळीमध्ये 3 मीटरपेक्षा जास्त घट, 33 निरिक्षण विहिरीतील भूजल पातळीमध्ये 2 ते 3 मीटर एवढी घट. 119 निरिक्षण विहिरीतील भूजल पातळीमध्ये 1 ते 2 मीटर एव्हढी घट तर 550 निरिक्षण विहिरीतील भूजल पातळीमध्ये 1 मीटर एव्हढी घट आढळून आली आहे.

पिण्याच्या पाण्याची टंचाई सदृश्य परिस्थिती

माहे मार्च 2022 अखेरील निरिक्षण विहिरीतील स्थिर भूजल पातळीच्या तुलनात्मक अभ्यासाआधारे उपरोक्त पैकी अवर्षण प्रवण व शाश्वत पर्जन्यमान असलेल्या 6 जिल्हयातील 9 तालुक्यातील निरिक्षण विहिरीतील भूजल पातळीमध्ये 1 मीटर पेक्षा जास्त घट आढळून आल्यामुळे या 9 तालुक्यांतील साधारणत: 114 गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई सदृश्य परिस्थिती असण्याचे अनुमान आहे. यामध्ये भूजल पातळीमध्ये 2 ते 3 मीटर घट असलेल्या 2 तालुक्यातील 5 गावांचा आणि 1 ते 2 मीटर घट असलेल्या 9 तालुक्यातील 109 गावांचा समावेश असण्याची शक्यता आहे.

गेल्या वर्षी 355 पैकी 270 तालुक्यांमध्ये सरासरी एवढा पाऊस

गेल्या वर्षी माहे सप्टेंबर 2021 अखेर 355 पैकी 270 तालुक्यांमध्ये सरासरी एवढा पाऊस झालेला होता व 85 तालुक्यामध्ये सरासरीच्या तुलनेत घट आढळून आलेली आहे. पर्जन्यमानाचा थेट परिणाम भूजल पातळीवर होत असल्यामुळे त्याचा परिणाम माहे सप्टेंबर 2021 अखेर 3,660 निरिक्षण विहिरीद्वारे मोजण्यात आलेल्या भूजल पातळीच्या अभ्यासाआधारे राज्यातील 268 गावांमध्ये सरासरीच्या तुलनेत 1 मीटर पेक्षा जास्त भूजल पातळी खालावलेली आढळलो. त्यापैकी 17 गावामधील भूजल पातळीमध्ये 3 मीटरपेक्षा जास्त घट, 38 गावांमधील भूजल पातळीमध्ये 2 ते 3 मीटर एवढी घट व 213 गावांमधील भूजल पातळीमध्ये 1 ते 2 मीटर एवढी घट आढळली.

The Department of Groundwater Survey and Development recently concluded that the ground water level in about 114 villages has dropped

 

Share this:

  • Facebook
  • X
Tags: Groundwater Level Surveyचोपडाटंचाई आराखडाधुळेनंदुरबारपर्जन्यमानपाणी घटभूजल पातळीविहिरी खोलशिरपूर पॅटर्नसर्वेक्षण विभाग
Previous Post

शेतीत रासानिक, सेंद्रियचा समन्वय… प्रयोगशील शेतकरी उमेश बंग यांचा शेतीचा यशस्वी मंत्र

Next Post

पाऊस असमाधानकारक, पेरण्या खोळंबल्या ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पदभार स्वीकारताच पहिल्या बैठकीत घेतला खरीप हंगामाचा आढावा

Next Post
पाऊस असमाधानकारक, पेरण्या खोळंबल्या ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पदभार स्वीकारताच पहिल्या बैठकीत घेतला खरीप हंगामाचा आढावा

पाऊस असमाधानकारक, पेरण्या खोळंबल्या ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पदभार स्वीकारताच पहिल्या बैठकीत घेतला खरीप हंगामाचा आढावा

Comments 1

  1. Pingback: पाऊस असमाधानकारक, पेरण्या खोळंबल्या ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पदभार स्वीकारताच पहिल्या ब

ताज्या बातम्या

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ

मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 19, 2025
0

मान्सून कोकणात धडकणार या तारखेला… !

मान्सून कोकणात धडकणार या तारखेला… !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 16, 2025
0

केळी लागवडीचे यशस्वी रहस्य

🌱 “केळी लागवडीचे यशस्वी रहस्य – रेवा फ्लोरा टिशू कल्चर !” 🍌

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 14, 2025
0

मान्सून अंदमानात

मान्सून अंदमानात… पुढील प्रवास कसा असणार ?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 14, 2025
0

IMD

IMD – जळगाव, नाशिकसह या जिल्ह्यांना यलो अलर्ट !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 13, 2025
0

बंगालच्या उपसागरात मान्सूनची चाहूल

काय..! मेच्या मध्यातच बंगालच्या उपसागरात मान्सूनची चाहूल ; काय म्हणाले माणिकराव खुळे

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 8, 2025
0

पीएम किसान

20 व्या हप्त्यापूर्वी पीएम किसान योजनेत मोठा बदल

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 6, 2025
0

देवगड हापूस हंगाम संपला..

देवगड हापूस हंगाम संपला..! ॲग्रोवर्ल्ड मार्फत आता पुढच्या वर्षी गुढीपाडव्यालाच देवगड हापूसचा मुहूर्त 🥭

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 6, 2025
0

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठे ठेवा – शिवकुमार एस

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठे ठेवा – शिवकुमार एस

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 5, 2025
0

तांत्रिक

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

हळद साठवणूक

हळद साठवणूक प्रक्रिया

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 26, 2025
0

जगाच्या पाठीवर

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ

मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 19, 2025
0

मान्सून कोकणात धडकणार या तारखेला… !

मान्सून कोकणात धडकणार या तारखेला… !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 16, 2025
0

केळी लागवडीचे यशस्वी रहस्य

🌱 “केळी लागवडीचे यशस्वी रहस्य – रेवा फ्लोरा टिशू कल्चर !” 🍌

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 14, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Home

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.