सन १९५७ मध्ये अॅग्रीकल्चर प्रोडूस ( डेव्हलपमेंट & वेअरहाउसिंग) कार्पोरेशन अॅक्ट१९५६ नुसार महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ स्थापन झाले. शेतमाल व्यवस्थापनासाठी संसदेने विशेष पारित केलेल्या द वेअरहाउसिंग कार्पोरेशन अॅक्ट१९६२ नुसार हे महामंडळ कार्यरत आहे. सन १९९८ मध्ये झालेल्या घटना दुरुस्तीनुसार शेतकरी, व्यापारी व ग्राहकांच्या हितासाठी विविध बाबींचा अंतर्भाव करण्यात आलेला आहे. कृषी क्षेत्रात महत्वपूर्ण भूमिका पार पडणाऱ्या वखार महामंडळाच्या याच कार्याचा अॅग्रोवर्डने घेतलेला मागोवा…
कार्यविस्तार :
महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचा कार्यविस्तार एकूण ११६५ गोदामांच्या माध्यमातून राज्यभर आहे. त्यामध्ये 8 विभागीय कार्यालये – औरंगाबाद, अमरावती, कोल्हापूर, नागपूर, पुणे, लातूर, मुंबई, नाशिक या ठिकाणी आहेत.
- 1 आयात – निर्यात केंद्र, द्रोणागिरी नोड, नवी मुंबई
- 200 वखार केंद्रे – स्वत: 191, पीपीपी : 07, भाड्याची : 02
- एकुण गोदामांची संख्या : 1165 (924 +146 + 95),
- एकूण साठवणूक क्षमता : 19.60 लाख मे.टन
(स्वमालकीचे – 15.82 लाख मे.टन, पीपीपी – 1.55 लाख मे.टन, भाड्याची – 3.15 लाख मे.टन)
महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाची स्थापना होऊन सहा दशकापेक्षा जास्त कालावधी झालेला आहे. जो उद्देश समोरे ठेऊन (शासनाने) संसदेने अधिनियम पारित करुन या महामंडळाची स्थापना केली होती त्याची साध्य कितपत झालेली आहे?
a)अन्नधान्याची नासाडी रोखण्यास मदत झाली पर्यायाने राष्ट्रीय संपत्तीचे नुकसान कमी झाले.
b)तीन गोदामापासुन सुरूवात होवून जवळपास स्वताची 16 लाख मे.टन साठवणूक क्षमतेची निर्मीती होवून अग्रगण्य संस्था म्हणुन नावरूपास आली.
c)शेतकऱ्यांना साठवणुकीचा अत्यंत अल्पदरात फायदा पर्यायाने वखार पावती तारण सुविधेतुन शेतकऱ्याचे जीवनमान उचवण्यासाठी मोलाची भुमीका
शेतकरी यांना नेमके आतापर्यंत कशाप्रकारे महामंडळाच्या सेवेचा फायदा पोहचलेला आहे?
- a) शेतमाल साठवणुक सुविधा उपलब्ध
- b) वखार पावती तारण सुविधा उपलब्ध
- c) ऑनलाईन वखार भाडे भरता येते, साठवणुकीसाठी जागेची उपलब्धता कळते.
- d) आर्थिक सुलभता प्राप्त होण्यास हातभार लागतो.
नवीन तंत्रज्ञानाच्या आधारे शेतकऱ्यांना तात्काळ सेवा पुरविण्याच्या दृष्टीने उत्तम सेवा पुरविण्यासाठी महामंडळाच्या काय उपाय योजना आहे? त्याचे स्वरुप नेमके कशाप्रकारचे आहे?
इतर क्षेत्राप्रमाणेच आता महामंडळदेखील नवीन तंत्रज्ञानाच्या आधारे शेतकऱ्यांना तात्काळ सेवा पुरविण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील असून त्यानुसार Block chainचे आधारे online loan facility मिळाल्यामुळे वेळेत व खर्चामध्ये बचत होते.
शासनामार्फत किमान आधारभुत किंमतीने करण्यात येत असलेल्या शेतमालाचे खरेदी व साठवणूक कामात महामंडळाचे कितपत योगदान असते?
MSP आधारे शेतामालाची खरेदी सुरूवात होणेकरीता वखार केंद्र परिसराची जागा वापरणेस प्रथमता प्रोत्साहीत करुन शेतकरी व शासनास सहकार्य केले. त्यामुळे ही योजना यशस्वी ठरली.
स्वमालकीचे गोदाम क्षमता अपुरी पडत असल्याचे लक्षात येता भाडेतत्वावरील जवळपास 5 लाख टनाचे गोदामे घेवुन कडधान्य, तेलबिया, कापुसगाठ साठ्याची मोठ्या प्रमाणात विक्रमी साठवणुक केली
वखार पावती Digital तयार होत असल्यामुळे शेतकऱ्याचे शेतमालाचे चुकारे त्वरीत अदा होण्यास सहकार्य झालेले आहे.
महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाने समृध्दी महामार्ग लगत काही ठिकाणी ‘Agri Warehousing & Logistics Park’ उभारणी करण्याचे दिशेने वाटचाल सुरु झाल्याने समजते. अशाप्रकाराचे नविन्यपूर्ण परियोजना राबवून महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ भविष्यकाळात राज्य शासन व सर्वतोपरी जनसाधारणासाठी कशाप्रकारे फायदा मिळवून देणार आहे?
समृध्दी महामर्गालगत शेतकरी समृद्धी केंद्र उभारणी केल्यास एकाच ठिकाणी शेती विषयक सेवा मिळत असल्यामुळे शेतकरी ,व्यापारी, ठेविदार, कंपनी यांना खरेदी, साठवणुक व विक्री अशा विविध सुविधा एकाच छताखाली प्राप्त होणार आहेत.
करोनाच्या आव्हानाला सामोरे जाऊन महामंडळाने केलेले विशेष कामकाज संदर्भात काय सांगाल?
‘Warehousing’ हा अत्यावश्यक सेवा अंतर्गत मोडत असल्याने करोना महामारीच्या कारणाने जाहीर करण्यात आलेल्या Lockdown काळात सुध्दा महामंडळाने अधिकारी / कर्मचारी यांनी जोखीम स्वीकारुन जनतेला अखंड सेवा पुरविली आहे. ते कौतुकास्पद आहे. मोफत अन्नधान्य वाटपसाठी येणारे अन्नधान्याचे मोठ्या प्रमाणात आवक स्विकारताना PDS साठी गहू, तांदुळ, कडधान्य साठा वितरणासाठी महामंडळाचा सहभाग होता.
- b) महामंडळाचे कर्मचारी यांनी स्वजिवनाची जोखीम स्विकारून आस्थापनेस व शासकीय यंत्रणेस सहकार्य केले
महामंडळाला भविष्य काळात सुध्दा प्रगतीपथावर नेऊन नवीन शिखरावर पोहचविण्यासाठी नक्की आपले प्रयत्न सुरु असेल. त्या संदर्भात काही दृष्टीपात?
- मोठ्या Warehousing cluster उभारणी करणे,
- आधुनिक हाताळणी यंत्रणेचा उपयोग करणे,
- हाताळणी व वाहतूक खर्चात बचत करून तो फायदा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे,
- Agri Warehousing & Logistics Hub तयार करणे