• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

विमा कंपनीकडून फसवणूक झालेल्या शेतकर्‍यांना न्याय मिळणार… शेतकर्‍यांना फसवणार्‍या विमा कंपन्यांवर गुन्हे नोंद करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 25, 2021
in हॅपनिंग
0
विमा कंपनीकडून फसवणूक झालेल्या शेतकर्‍यांना न्याय मिळणार… शेतकर्‍यांना फसवणार्‍या विमा कंपन्यांवर गुन्हे नोंद करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

मुंबई ः खोटे रेकॉर्ड तयार करुन शेतकर्‍यांना फसविणार्‍या विमा कंपन्यांवर तत्काळ गुन्हे दाखल करावेत, असे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. उपमुख्यमंत्र्यांनी दिलेल्या या निर्देशामुळे फसवणूक करणार्‍या विमा कंपन्यांचे धाबे दणाणले आहे. गुन्हे दाखल झाल्यानंतर फसवणूक झालेल्या शेतकर्‍यांना न्याय मिळणार आहे.

मदत वाटपाला गती देणार
मंत्रालयातील उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या समिती सभागृहात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली सोयाबीन-कापूस उत्पादकांच्या विविध प्रश्नांसंबधी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले, की सोयाबीन, कापूस उत्पादकांसह राज्यातील सर्व शेतकर्‍यांच्या पाठीशी राज्य सरकार ठामपणे उभे आहे. केंद्र सरकारच्या अखत्यारीत येणार्‍या सोयाबीनसह कापसाच्या प्रश्नांसंबधी राज्य सरकारचे शिष्टमंडळ पंतप्रधानांना भेटणार आहे. संसदेच्या आगामी अधिवेशनात महाविकास आघाडीचे खासदार यासंबंधीचे प्रश्न सभागृहात मांडतील, अशी ग्वाही त्यांनी दिली. राज्यातील अतिवृष्टी बाधितांना राज्य सरकारतर्फे जाहीर करण्यात आलेल्या मदतीचे वाटप सुरु आहे, त्याला गती देण्यात येईल. शेतकर्‍यांना दिलेले अनुदान तसेच आर्थिक मदत कोणत्याही परिस्थितीत बँकांनी रोखू नये. सदरची रक्कम शेतकर्‍यांच्या कर्जखात्यात जमा करण्यात येऊ नये, याबाबतच्या सूचना संबंधित बँकांना देण्यात येतील असेही उपमुख्यमंत्री अजित पवारांनी स्पष्ट केले.

सीएसआर निधीतून मदत
नदीकाठच्या खरडून गेलेल्या जमिनी तयार करण्यासाठी रोजगार हमी योजनेसह सीएसआर निधीतून मदत करण्याच्या सूचनाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या. कृषीपंपांना दिवसा सुरळीत आणि पुरेसा वीजपुरवठा करण्यासाठी राज्य सरकारने सौरपंपाची योजना आणली आहे, ही योजना अधिक सक्षमपणे राबविण्यात यावी. कर्जमाफीला पात्र असणार्‍या शेतकर्‍यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा करण्याचे काम सुरु असून राज्य सरकार राज्यातील शेतकर्‍यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे त्यांनी सांगितले. शेतकर्‍यांच्या विविध प्रश्नांसंबंधी सकारात्मक मार्ग काढल्याबद्दल शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानले.

मान्यवरांची उपस्थिती
बैठकीला अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, रविकांत तुपकर, डॉ. ज्ञानेश्वर टाले, दामूअण्णा इंगोले, नियोजन विभागाचे अप्पर मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती, वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव मनोज सौनिक, मदत व पुनर्वसन प्रधान सचिव असीम गुप्ता, सहकार व पणन सचिव अनुप कुमार, कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले तर व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी, कृषी विभागाचे आयुक्त धिरज कुमार, सहकार आयुक्त अनिल कवडे, पणन विभागाचे संचालक सुनील पवार आदी उपस्थित होते.

Tags: Ajit PawarCSRInsurance CompanySolar pumpउपमुख्यमंत्री अजित पवारकापूसकृषीपंपछगन भुजबळन्यायमहाविकास आघाडीविमा कंपनीसीएसआरसोयाबीनसौरपंप
Previous Post

शेततळ्यांसाठी 52 कोटींचे अनुदान जाहीर… राज्य सरकारची मोठी घोषणा… 10 हजार 744 शेतकर्‍यांना लाभ मिळणार

Next Post

शेतकर्‍यांनी इथेनॉल निर्मित आधारीत शेती करावी ः केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आवाहन… शेतकर्‍यांना अन्नदात्यासोबतच उर्जादाता होण्याचे आवाहन

Next Post
शेतकर्‍यांनी इथेनॉल निर्मित आधारीत शेती करावी ः केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आवाहन… शेतकर्‍यांना अन्नदात्यासोबतच उर्जादाता होण्याचे आवाहन

शेतकर्‍यांनी इथेनॉल निर्मित आधारीत शेती करावी ः केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आवाहन... शेतकर्‍यांना अन्नदात्यासोबतच उर्जादाता होण्याचे आवाहन

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.