• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

मधमाशी पालनातून पीकवृद्धीचा लाभ आणि रोजगाराची सुवर्णसंधी

बसवंत गार्डनचाही मधमाशी पालनाचा अनोखा उपक्रम

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 21, 2024
in इतर
0
मधमाशी पालनातून पीकवृद्धीचा लाभ आणि रोजगाराची सुवर्णसंधी
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

मधमाश्यांच्या वसाहती मानवी वस्तीसाठी सर्वार्थाने फलदायी ठरतील; तसेच मधमाशीजन्य उत्पादनांपेक्षाही परागीभवनाचा लाभ पीकवृद्धीसाठी लाखमोलाचा असतो, हे देखील लक्षात घेतले पाहिजे. या दृष्टिकोनातून मधमाशी पालन आणि संवर्धनासाठी कृषी उद्योगाशी निगडित सर्व संस्थांचे समायोजन करणे गरजेचे ठरते. दि. 20 मे हा ‘जागतिक मधमाशी दिन’ म्हणून साजरा केला जातो, त्यानिमित्ताने हे विचारमंथन…

मधमाशी हा निसर्गाने तयार केलेला अत्यंत हुशार, कार्यक्षम तसाच शिस्तबद्ध काम करणारा एक छोटासा कीटक. मधमाशी फुलांपासून परागकण- मकरंद गोळा करून आपला उदरनिर्वाह करते; परंतु हे सर्व करत असताना ती सर्वात महत्त्वाचे कार्य करते ते म्हणजे पिकांचे परागीभवन. पिकांचे परागीभवन झाल्यामुळेच आज सर्व सजीवांना अन्नधान्याचा पुरवठा होतो. म्हणजेच निसर्गाने मधमाशीला पिकांचे पुनर्जीवन- प्रजनन आणि उत्पादन यासाठीच तयार केले आहे. या कीटकापासून मानवाला- निसर्गाला कोणताही त्रास तर होत नाहीच, उलट त्याच्यामुळे पिकांच्या उत्पादनात वाढच होते.

 

‘मधुक्रांती’साठी एकात्मिक नियोजनाची गरज
कृषी मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या संशोधन संस्था, शिक्षण संस्था तसेच विस्तार संस्थांनी एकत्रित प्रयत्न करून या व्यवसायाचा विकास करणे आवश्यक आहे. ज्याप्रमाणे हरितक्रांती, धवलक्रांती, नीलक्रांती आणि फलोत्पादन क्रांतीतून शेती उत्पादन, दुग्ध व्यवसाय, मत्स्य व्यवसाय, फलोत्पादन वाढले त्याप्रमाणेच ‘मधुक्रांती’च्या माध्यमातून मधमाशी पालनाचा वेग वाढवून मध आणि इतर पदार्थांचे उत्पादन वाढवता येईल. त्याबरोबरच पिकांना परागीभवनाची सेवा देण्यासाठी मधमाश्यांच्या वसाहती भाडेतत्त्वावर देऊन शेतीच्या उत्पादनात वाढ साध्य करता येईल. या माध्यमातून पुढील 20-30 वर्षांत फार मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होण्यास वाव आहे.

 

 

देशामध्ये ‘मधुक्रांती’ सुरू झालेली असून, मधाचे जे उत्पादन 2005-06 मध्ये 35,000 टन होते, ते आज 1.30 लाख टनांपर्यंत पोहोचले आहे. म्हणजेच मागील 15 वर्षांमध्ये मधाच्या उत्पादनात 3.5 पट वाढ झाली आहे. यामुळे जागतिक पातळीवर भारत आता पाचव्या क्रमांकावरील मध उत्पादक देश झाला आहे. मधाचे वाढलेले उत्पादन ही निश्चितच एक चांगली बाब आहे. परंतु आपण मधमाशी पालनामध्ये फार मोठी प्रगती केली, असे नक्कीच म्हणता येणार नाही; याचे कारण जागतिक आकडेवारीवरून काही बाबींचा नक्कीच विचार करण्याची गरज आहे. जागतिक सर्वेक्षणानुसार असे दिसते की, जगातील एकूण 9.22 कोटी मधमाश्यांच्या वसाहतींपैकी आपल्या देशात 1.30 कोटी वसाहती आहेत. मधमाश्यांच्या वसाहतींच्या संख्येचा विचार केला तर भारत हा पहिल्या क्रमांकावरील देश आहे. परंतु भारताचे मधाचे उत्पादन मात्र फक्त 1.25 लाख टन आहे. मधमाश्यांच्या वसाहतींच्या बाबत आपण पहिल्या क्रमांकावर पण मधाच्या उत्पादनात मात्र आपण जगात पाचव्या क्रमांकावर आहोत.

 

 

महाराष्ट्रातील एकूण 45,000 गावांचा विचार केला आणि प्रत्येक गावामध्ये मधमाश्यांच्या 50 वसाहती ठेवल्या तरी जवळ जवळ 20 लाख मधमाश्यांच्या वसाहती राज्यामध्ये ठेवता येतील. राज्यातील 174 लाख हेक्टरपैकी 100 लाख हेक्टर क्षेत्रावर मधमाशीला उपयुक्त असलेला फुलोरा मिळाला- आणि हा फुलोरा एक-दोन महिने मधमाशीला उपयुक्त होईल, असा विचार केला तरी वर्षातील प्रत्येक महिन्यात कमीत कमी 4 ते 5 लाख हेक्टर फुलोरा उपलब्ध होईल. चार लाख हेक्टर फुलोरा आणि प्रतिहेक्टरी मधमाश्यांच्या पाच वसाहती असा विचार केला तरी जवळ जवळ 20 लाख वसाहतींचे संवर्धन राज्यामध्ये करता येईल.

 

 

प्रतिवसाहत 10 किलो मधाचे उत्पादन धरले तरी महाराष्ट्रामध्ये 2 लाख टन मधाचे उत्पादन मिळू शकेल. तसेच पिकांच्या उत्पादनांत हेक्टरी 5000 ची वाढ झाली तरी राज्याला शेती उत्पादनांमधून 2000 ते 3000 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळेल. एवढ्या मोठ्या प्रमाणात मधमाश्यांच्या वसाहती तयार करणे, पेट्या तयार करणे, त्यांचे संगोपन करणे, मध आणि इतर पदार्थांचे उत्पादन घेणे, प्रक्रिया आणि विक्री व्यवस्था करणे याचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये कमीत कमी 20 ते 25 हजार व्यक्तींना रोजगार मिळू शकतो. तरुणांना या व्यवसायामध्ये रोजगार निर्मिती करण्यासाठी उद्युक्त करावे. मधमाशी पालनासाठी क्लस्टर तयार करून प्रक्रिया, विक्री व्यवस्था तसेच मधमाश्यांच्या वसाहती, मधपेट्या यांसह आवश्यक सेवा सुविधा उपलब्ध करून दिल्या तर निश्चितच महाराष्ट्रामध्ये ‘मधुक्रांती’ होईल. यासाठी सर्व यंत्रणांनी एकत्र येऊन नियोजनबद्ध आणि कालबद्ध प्रयत्न मात्र करावे लागतील.

 

डॉ. भास्कर गायकवाड
(संपादक : ‘पूर्वा कृषिदूत’)
मो. 9822519260
gaikwadbh@yahoo.com

 

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇

  • केळीची या बाजार समितीत झाली सर्वाधिक आवक ; वाचा बाजारभाव
  • मान्सून अंदमान – निकोबारमध्ये दाखल ; महाराष्ट्रात कधी येणार ?

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: कृषी मंत्रालयजागतिक मधमाशी दिनमधमाशी पालन
Previous Post

केळीची या बाजार समितीत झाली सर्वाधिक आवक ; वाचा बाजारभाव

Next Post

ग्रामसंस्कृतीचा दुवा जपून ठेवल्यास राज्यात कृषी पर्यटनाला सुवर्णसंधी – बाळासाहेब बराटे

Next Post
ग्रामसंस्कृतीचा दुवा जपून ठेवल्यास राज्यात कृषी पर्यटनाला सुवर्णसंधी – बाळासाहेब बराटे

ग्रामसंस्कृतीचा दुवा जपून ठेवल्यास राज्यात कृषी पर्यटनाला सुवर्णसंधी - बाळासाहेब बराटे

ताज्या बातम्या

मुंबई-कोकणासह पुण्यात धो-धो पाऊस का? जाणून घ्या नेमके कारण…

मुंबई-कोकणासह पुण्यात धो-धो पाऊस का? जाणून घ्या नेमके कारण…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 6, 2026
0

आजपासून राज्यात 3 दिवस धुमशान

आजपासून राज्यात 3 दिवस धुमशान

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 4, 2026
0

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी: शेतीकामासाठी माती-मुरूम वापरण्यावरील ‘रॉयल्टी’ माफ; पोलिसांचा ससेमिराही टळणार!

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी: शेतीकामासाठी माती-मुरूम वापरण्यावरील ‘रॉयल्टी’ माफ; पोलिसांचा ससेमिराही टळणार!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2026
0

भूमीहीन महिलांनाही मिळणार ‘शेतकरी’ दर्जा

भूमीहीन महिलांनाही मिळणार ‘शेतकरी’ दर्जा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2026
0

देशभरात मान्सूनचा जोर; 15 राज्यात पावसाचा धुमाकूळ, महाराष्ट्रात रेड अलर्ट!

देशभरात मान्सूनचा जोर; 15 राज्यात पावसाचा धुमाकूळ, महाराष्ट्रात रेड अलर्ट!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 2, 2026
0

आता आठवडाभर राज्यात पावसाचा जोर

आता आठवडाभर राज्यात पावसाचा जोर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 1, 2026
0

कमी दाबाचा पट्टा सक्रिय; आजपासून महाराष्ट्रात पावसाचा जोर पुन्हा वाढणार

कमी दाबाचा पट्टा सक्रिय; आजपासून महाराष्ट्रात पावसाचा जोर पुन्हा वाढणार

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 29, 2026
0

राज्यात आजपासून तीन दिवस पावसाचे..; 23 जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’

राज्यात आजपासून तीन दिवस पावसाचे..; 23 जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 27, 2026
0

राज्यात पावसाचा जोर वाढणार..

राज्यात पावसाचा जोर वाढणार..

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 24, 2026
0

मान्सून 2/3 दिवसात पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता

मान्सून 2/3 दिवसात पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 20, 2026
0

तांत्रिक

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 6, 2026
0

स्पायरल सेपरेटर

मळणीनंतर सोयाबीन व तूर साफसफाईसाठी- स्पायरल सेपरेटर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 22, 2025
0

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

जगाच्या पाठीवर

मुंबई-कोकणासह पुण्यात धो-धो पाऊस का? जाणून घ्या नेमके कारण…

मुंबई-कोकणासह पुण्यात धो-धो पाऊस का? जाणून घ्या नेमके कारण…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 6, 2026
0

आजपासून राज्यात 3 दिवस धुमशान

आजपासून राज्यात 3 दिवस धुमशान

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 4, 2026
0

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी: शेतीकामासाठी माती-मुरूम वापरण्यावरील ‘रॉयल्टी’ माफ; पोलिसांचा ससेमिराही टळणार!

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी: शेतीकामासाठी माती-मुरूम वापरण्यावरील ‘रॉयल्टी’ माफ; पोलिसांचा ससेमिराही टळणार!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2026
0

भूमीहीन महिलांनाही मिळणार ‘शेतकरी’ दर्जा

भूमीहीन महिलांनाही मिळणार ‘शेतकरी’ दर्जा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2026
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.

EnglishEnglish