• Home
    • आमच्याविषयी
  • Services
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

शेतकऱ्यांनो, पेरणीची घाई नको; आता पाऊस पडला तरी जुलैपर्यंत धीर धरा!

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 12, 2023
in हवामान अंदाज
0
शेतकऱ्यांनो, पेरणीची घाई नको; आता पाऊस पडला तरी जुलैपर्यंत धीर धरा!
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

मुंबई : शेतकऱ्यांनो, पेरणीची घाई नको. आता पाऊस पडला तरी जुलैपर्यंत धीर धरा, असा सबुरीचा सल्ला राज्य सरकारकडून देण्यात आला आहे. भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) मान्सून राज्यात दाखल झाल्याचे व येत्या 48 तासात महाराष्ट्रात सर्वत्र पोहोचण्याचे अनुमान वर्तविले आहे. दुसरीकडे, ‘स्कायमेट’ने मात्र सध्याचे बिपोरजॉय चक्रीवादळ विसर्जित होईपर्यंत मान्सून कमजोर राहण्याचे अनुमान जाहीर केले आहे. चक्रीवादळाच्या जोडीलाच ‘एल निनो’चे सावट यंदाही असणार आहे. हे सारे पाहता, अनियमित मान्सूनमुळे खरीप पेरणीसाठी शेतकऱ्यांनी घाई करू नये, असे आवाहन राज्य सरकारने केले आहे.

कृषी विभागाने यापूर्वीच पेरणीला जाण्यापूर्वी पावसाची तीव्रता पडताळून पाहण्याचा सल्ला शेतकऱ्यांना दिला आहे. यंदा ऑगस्टपर्यंत खरीपाची पेरणी सुरू राहणार असल्याच्या अनुषंगाने राज्य सरकारचे नियोजन आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीसाठी जुलैपर्यंत वाट पाहावी, असे सांगण्यात आले आहे.

Sunshine Power House of Nutrients

कृषी विभागाने दिला हा इशारा

राज्यात मान्सूनचा पाऊस काही ठिकाणी सुरू झाला असला तरी खरीप पिकांच्या लवकर पेरणीसाठी शेतकऱ्यांनी घाई करू नये, असा इशारा महाराष्ट्र सरकारने दिला आहे. कृषी विभागाने मार्गदर्शक तत्त्वे जारी करून शेतकऱ्यांना स्पष्टपणे हा इशारा दिला आहे. पावसाची तीव्रता पडताळून न पाहता पेरणी केल्यास बियाणे उगवण होऊ शकत नाही. आपल्या परिसरात किमान 100 मिमी पाऊस झाल्यानंतरच पिकांची पेरणी सुरू करावी, असे सांगण्यात आले आहे. थोड्याशा पावसाच्या आधारावर पेरणी सुरू करू नका, असे कृषी विभागाने सांगितले आहे.

दरवर्षी साधारणपणे, 10 जूनपर्यंत मान्सून महाराष्ट्रात म्हणजे कोकण-मुंबईत येतो. हळूहळू सर्व 36 जिल्ह्यांमध्ये मान्सून तीव्र होतो आणि पेरणीचा हंगाम जूनच्या मध्यात सुरू होतो. मात्र, यंदा मान्सून लांबला आहे. काल मान्सून तळकोकणात आला असला तरी चक्रीवादळामुळे त्याची सक्रियता कमी राहण्याची शक्यता आहे. पावसाच्या पहिल्या काही सरींनंतर लगेच पेरणी सुरू करण्याचा प्रयत्न धोकादायक ठरू शकतो. कारण, सुरुवातीच्या अल्प पावसानंतर पुढील पावसासाठी दीर्घ अंतर राहिल्यास, बियाणे उगवत नाही किंवा पिकांची सुरुवातीची वाढ खुंटते. शिवाय, शेतकऱ्यांना “दुबार पेरणी” करावी लागते, ज्यामुळे त्यांच्या खर्चात भर पडते. या पार्श्वभूमीवर, राज्य सरकारच्या सूचनेनुसार, त्यादृष्टीने तालुका अधिकारी आणि कृषी केंद्रांसह जिल्हा प्रशासन शेतकऱ्यांना नियमित अलर्ट जारी करत आहे.

Panchaganga Seeds

‘एल निनो’ने वाढविली चिंता

राज्यात कोकण पट्ट्याच्या तुलनेत, उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा तसेच विदर्भाचा काही भाग हा दुष्काळी भाग आहे. त्यात पॅसिफिक महासागरावर विकसित होत असलेल्या ‘एल निनो’ने चिंता आणखी वाढवली आहे. सरकार आणि हवामान तज्ञांना भीती आहे, की ‘एल निनो’मुळे उद्भवणारी हवामानाची स्थिती राज्यातील मान्सून आणखी कमकुवत करू शकेल.

“यंदा अल निनो हे चिंतेचे कारण आहे. त्यामुळे काही जिल्ह्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. मात्र, सरासरीच्या 85टक्के पाऊस पडला तरी सध्याच्या जलसंधारण प्रकल्पांतून आपण दुष्काळावर मात करू शकू,” असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी झालेल्या वार्षिक खरीप आढावा बैठकीत व्यक्त केला होता.

यंदाच्या खरीप आढावा बैठकीत उपमुख्यमंत्र्यांनी जलयुक्त शिवार अभियान टप्पा 2 वर भर दिला. “आपल्याकडे पाण्याची व्यवस्था असायला हवी. काही जोरदार सरी पडल्या तरी शेतकऱ्यांना सहज पाणी मिळू शकते. संरक्षित सिंचन हा हवामानातील आव्हानांवर मात करण्याचा एक चांगला मार्ग आणि शाश्वत शेतीच्या दिशेने उत्तम पाऊल आहे,” असे ते म्हणाले होते.

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: पेरणीबिपोरजॉय चक्रीवादळमान्सूनशेतकरीस्कायमेट वेदर
Previous Post

Monsoon Update : मान्सून येत्या 2 दिवसात संपूर्ण महाराष्ट्र व्यापणार ; पण शेतकऱ्यांनो, पेरणीची घाई नको!

Next Post

Monsoon Update : महाराष्ट्रासह मध्य, पश्चिम भारतात मान्सूनची आगामी महिनाभराची स्थिती “निराशाजनक” – स्कायमेट

Next Post
Monsoon Update : महाराष्ट्रासह मध्य, पश्चिम भारतात मान्सूनची आगामी महिनाभराची स्थिती “निराशाजनक” – स्कायमेट

Monsoon Update : महाराष्ट्रासह मध्य, पश्चिम भारतात मान्सूनची आगामी महिनाभराची स्थिती "निराशाजनक" - स्कायमेट

ताज्या बातम्या

मान्सून पुन्हा सक्रिय होणार

मान्सून पुन्हा सक्रिय होणार; राज्याच्या काही भागात आज पुन्हा मुसळधार !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 25, 2025
0

राज्यात थंड

राज्यात थंड, बोचरे वारे! आरोग्याला फायदा की नुकसान? जाणून घ्या …

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 25, 2025
0

दुग्धव्यवसाय कार्यशाळा

बुकिंगची आज शेवटची संधी…; पुढची दुग्धव्यवसाय कार्यशाळा पुढच्या वर्षी…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 23, 2025
0

पावसाचा आगामी दोन आठवड्यांचा अंदाज

पावसाचा आगामी दोन आठवड्यांचा अंदाज; 25 ऑगस्टला कमी दाबाचे नवे क्षेत्र, महाराष्ट्रात पाऊस सुरूच राहणार !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 22, 2025
0

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा 2)

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 21, 2025
0

मिल्की मिस्ट : दुधाचा एक थेंबही न विकता उभा केला 2,000 कोटींचा मिल्क ब्रँड !

मिल्की मिस्ट : दुधाचा एक थेंबही न विकता उभा केला 2,000 कोटींचा मिल्क ब्रँड !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 21, 2025
0

आज 20 ऑगस्ट 2025

आज 20 ऑगस्ट 2025 : जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, अकोला, बुलढाणा, छ. संभाजीनगर, जालनाची स्थिती

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 20, 2025
0

महाराष्ट्रासह देशभरातील पावसाची स्थिती

आज 20 ऑगस्ट 2025 : महाराष्ट्रासह देशभरातील पावसाची स्थिती

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 20, 2025
0

5 म्हशीपासून 120 म्हशीपर्यंतचा प्रवास...??

5 म्हशीपासून 120 म्हशीपर्यंतचा प्रवास…??

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 20, 2025
0

दुग्धव्यवसायासाठी अनुदान

दुग्धव्यवसायासाठी अनुदान… वैयक्तिक ₹ 10 लाख तर सामूहिक ₹ 3 कोटींपर्यंत..

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 19, 2025
0

तांत्रिक

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

जगाच्या पाठीवर

मान्सून पुन्हा सक्रिय होणार

मान्सून पुन्हा सक्रिय होणार; राज्याच्या काही भागात आज पुन्हा मुसळधार !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 25, 2025
0

राज्यात थंड

राज्यात थंड, बोचरे वारे! आरोग्याला फायदा की नुकसान? जाणून घ्या …

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 25, 2025
0

दुग्धव्यवसाय कार्यशाळा

बुकिंगची आज शेवटची संधी…; पुढची दुग्धव्यवसाय कार्यशाळा पुढच्या वर्षी…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 23, 2025
0

पावसाचा आगामी दोन आठवड्यांचा अंदाज

पावसाचा आगामी दोन आठवड्यांचा अंदाज; 25 ऑगस्टला कमी दाबाचे नवे क्षेत्र, महाराष्ट्रात पाऊस सुरूच राहणार !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 22, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Home
  • Services

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.