• Home
    • आमच्याविषयी
AgroWorld
Advertisement
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

तेलंगणा राज्यात पायाभूत सुविधांमुळे कृषी क्षेत्र 15% नी वाढले..; उत्पादकतेत देखील भरीव वाढ

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 7, 2023
in इतर
0
तेलंगणा राज्यात पायाभूत सुविधांमुळे कृषी क्षेत्र 15% नी वाढले..; उत्पादकतेत देखील भरीव वाढ
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

कृषी क्षेत्रात शेतकऱ्यांना आवश्यक त्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्यास उत्पादकतेत भरीव वाढ होऊन प्रति शेतकरी दरडोई उत्पन्न वाढण्याचे दुर्मिळ उदाहरण म्हणजे तेलंगणा राज्य होय..! तेलंगणा राज्याची पाच जून 2014 मध्ये निर्मिती झाली. मात्र अवघ्या नऊ वर्षात या राज्याने कृषी क्षेत्रासाठी दिलेल्या सोयी सुविधांमुळे शेतकऱ्यांची उत्पादकता तर वाढलीच परंतु कृषी क्षेत्रापासून दूर गेलेला एक वर्ग पुन्हा या क्षेत्राकडे आकर्षित झाला. परिणामी, तेलंगणा राज्याच्या कृषी क्षेत्रात देखील 15 टक्क्यांहून अधिक वाढ झाली. अवघे नऊ वर्षे वय असलेले तेलंगणा राज्य मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव व कृषिमंत्री निरंजन रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांसाठी या पायाभूत सुविधा देऊ शकते तर मग महाराष्ट्रासह इतर राज्य सरकारांसाठी हा नक्कीच आदर्श ठरू शकतो. जाणून घेऊया तेलंगणा राज्याच्या कृषी क्षेत्रातील घोडदौडीविषयी…

मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी शेती व शेतकरी यांचे कल्याण आणि विकासासाठी अनेक योजना राबवल्या. ज्यामुळे तेलंगणा राज्य इतरांसाठी एक आदर्श  राज्य बनले आहे. तेलंगणा राज्य सर्वाधिक 60 लाख एकर क्षेत्रावर कापूस या पिकाची लागवड करणारे तसेच देशातील दुसऱ्या क्रमांकाचे धान उत्पादक आणि खरेदीदार म्हणून उदयास आले आहे. 2014 मध्ये धानची उत्पादन क्षमता 45 लाख टन होती आता यात मोठी वाढ होऊन 2021 मध्ये ही वाढ तीन कोटी टनवर पोहोचली आहे. त्याचप्रमाणे लागवड क्षेत्र 1.34 कोटी एकरवरून 2021 मध्ये 2.3 कोटी एकरवर पोहोचले आहे. राज्य स्थापनेपासून, राज्य सरकारने 97 हजार 924 कोटी रुपयांच्या धानाची खरेदी केली, असल्याची माहिती कृषीमंत्री एस निरंजन रेड्डी यांनी एका दैनिकाशी बोलतांना दिली आहे.

मोफत वीज उपलब्ध

मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या दूरदृष्टीमुळे राज्य सरकारने विविध पाटबंधारे प्रकल्पांच्या उभारणीसाठी दीड लाख कोटींहून अधिक खर्च केला आहे. 28,473 कोटी रुपये खर्चून विजेच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा केल्या आहेत. यासोबतच अखंडीत मोफत वीज उपलब्ध करून दिल्याचेही त्यांनी ते म्हणाले.

१७ हजार कोटी रुपयांची कर्ज माफी

तेलंगणा राज्य सरकारतर्फे रयथू बंधू योजना हाती घेण्यात आली आहे. या योजनेंतर्गत शेतकर्‍यांच्या बँक खात्यात जवळपास 50 हजार 448.16 कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत तर 17 हजार 244 कोटी रुपयांचे कृषी कर्ज माफ करण्यात आले आहे. सरकार राबवित असलेल्या विविध योजनांमुळे राज्यातील कृषी क्षेत्रात मोठी प्रगती झाली आहे. आणि याचा परिणामी म्हणून दरडोई उत्पन्नात 103.46 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

सहकारी संस्थांमार्फत बियाणे आणि खते

शेतकऱ्यांना प्राथमिक कृषी सहकारी संस्था (PACS) मार्फत बियाणे आणि खते पुरवण्याबरोबरच बनावट बियाणांचा पुरवठा करणाऱ्यांविरुद्ध प्रतिबंधक कायदा लागू करणारे तेलंगणा हे एकमेव राज्य ठरले आहे. तसेच राज्य सरकार अनुदानित किमतीत शेती उपकरणे आणि यंत्रसामग्री देखील पुरवत आहे. गोदामाची साठवण क्षमता 2013-14 मध्ये केवळ 4.17 लाख होती त्यातही मोठी वाढ करण्यात आली असून ती 2020-21 मध्ये 24.73 लाख टन इतकी वाढविण्यात आली आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी राज्य सरकार ऑइल पाम लागवडीसह पर्यायी पिकांनाही प्रोत्साहन देत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल.👇

  • Mulching Paper Subsidy : प्लास्टिक मल्चिंग पेपरसाठी मिळतेय इतके टक्के अनुदान
  • Mashroom Farming Success Story : नोकरी सोडून केली मशरुमची शेती

Share this:

  • Facebook
  • X
Tags: कृषिमंत्री निरंजन रेड्डीकृषी क्षेत्रतेलंगणामुख्यमंत्री के चंद्रशेखर राव
Previous Post

Cotton Rate : कापसाला ‘या’ बाजार समितीत मिळतोय सर्वाधिक दर

Next Post

ऊस उत्पादनातून एकरी सव्वा दोन लाखांचा नफा

Next Post
ऊस उत्पादना

ऊस उत्पादनातून एकरी सव्वा दोन लाखांचा नफा

ताज्या बातम्या

देशातील पहिले आंतरराष्ट्रीय कृषी हॅकेथॉन

पुण्यात देशातील पहिले आंतरराष्ट्रीय कृषी हॅकेथॉन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 31, 2025
0

या फळाच्या लागवडीतून एकरी लाखोंचा नफा !

या फळाच्या लागवडीतून एकरी लाखोंचा नफा !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 30, 2025
0

या जिल्ह्यांना आज मुसळधार पावसाचा इशारा

या जिल्ह्यांना आज मुसळधार पावसाचा इशारा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 28, 2025
0

मान्सून मुंबईत दाखल ! पुढील तीन दिवसात हवामान कसे असेल..??

मान्सून मुंबईत दाखल ! पुढील तीन दिवसात हवामान कसे असेल..??

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 26, 2025
0

फळ, भाजीपाल्यातून 10 लाखांचा नफा !

फळ, भाजीपाल्यातून 10 लाखांचा नफा !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 23, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ

मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 19, 2025
0

मान्सून कोकणात धडकणार या तारखेला… !

मान्सून कोकणात धडकणार या तारखेला… !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 16, 2025
0

केळी लागवडीचे यशस्वी रहस्य

🌱 “केळी लागवडीचे यशस्वी रहस्य – रेवा फ्लोरा टिशू कल्चर !” 🍌

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 14, 2025
0

मान्सून अंदमानात

मान्सून अंदमानात… पुढील प्रवास कसा असणार ?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 14, 2025
0

तांत्रिक

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

हळद साठवणूक

हळद साठवणूक प्रक्रिया

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 26, 2025
0

जगाच्या पाठीवर

देशातील पहिले आंतरराष्ट्रीय कृषी हॅकेथॉन

पुण्यात देशातील पहिले आंतरराष्ट्रीय कृषी हॅकेथॉन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 31, 2025
0

या फळाच्या लागवडीतून एकरी लाखोंचा नफा !

या फळाच्या लागवडीतून एकरी लाखोंचा नफा !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 30, 2025
0

या जिल्ह्यांना आज मुसळधार पावसाचा इशारा

या जिल्ह्यांना आज मुसळधार पावसाचा इशारा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 28, 2025
0

मान्सून मुंबईत दाखल ! पुढील तीन दिवसात हवामान कसे असेल..??

मान्सून मुंबईत दाखल ! पुढील तीन दिवसात हवामान कसे असेल..??

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 26, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Home

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.