• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

पावनखिंड भाग – 20 बाजी प्रभू – इतिहास सन्मानाचा, अभिमानाचा, अतुल्य पराक्रमाचा

Team Agroworld by Team Agroworld
January 5, 2021
in इतर
0
इतिहास  गौरवशाली स्वराज्याचा – पावनखिंड भाग – १  बाजी प्रभू
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

रोहिडा किल्ल्याच्या वाड्यात, सदरेवर मल्हारबा देशमुख बसले होते. तिशीच्या वयाच्या देशमुखांची मुद्रा त्रस्त दिसत होती. देशमुखांचे कारभारी गंगाधरपंत सामोरे उभे होते. वाड्याच्या पायऱ्यांखाली आठ-दहा माणसं उभी होती.
देशमुख गर्जले,
‘दोन वर्ष बेपत्ता! आनि आज भडवे बलुतं मागायला आले. ठेवल्यात त्यांच्या बापानं. गंगाधरपंत, त्यांच्या पदरात एक दाणा टाकू नका.’
‘जी, धनी!’ गंगाधरपंत उद्गारले.
पायरीखाली उभा असलेल्यांतला ज्ञानू लोहार म्हणाला,
‘धनी, पाठीवर मारा पन पोटावर मारू नगासा.’
‘मग कशाला शेण खायला गेला होता?’
‘धनीs तुमीच सांगितलासा, म्हनूनss’


‘मी नव्हे, त्या बाजी देशपांड्यांनं सांगितलं. आनि तुमी ते ऐकलासा. जाण राहिली नाही तुम्हांला. बलुतं आमचं आणि चाकरी त्या शिवाजीची.’
‘शिवाजीराजं व्हतं, म्हनून दोन वर्सं मानसं जगली. त्यो देवमानूस.’ मुकुंदा गवंडी धीर करून म्हणाला.
‘एवढा मान चढला?’ मल्हारबा उठत म्हणाले, ‘कोण आहे, रे, तिकडं या हरामखोरांच्या पाठी सोलून काढायला?
सेवक धावले.
भीतीग्रस्त माणसं त्या आज्ञेनं उभ्या जागी बसली. पण अपेक्षेप्रमाणे काही घडलं नाही. सारे सेवक वाड्यासमोरच्या रस्त्याकडं बघत होते.
बाजींची रूबाबदार मूर्ती वाड्याकडं चालत येत होती. बाजींना येताना पाहताच मल्हारबांचा सारा नूर पालटला. बाजी सदरेखाली जमलेल्या मंडळींच्याकडं नजर टाकून पायऱ्या चढले. त्यांनी मल्हारबांना नमस्कार केला.
‘बाजी! तुम्हांला आठवण झाली. बरं वाटलं!’
बाजींनी उत्तर दिलं,
‘तसं नाही, धनी! जासलोड गडाच्या कामगिरीवर होतो. तेव्हा…’
‘तेच ते!’ देशमुख म्हणाले, ‘आता आम्ही धनी कुठले? आता तुमचे शिवाजीराजे धनी.’
त्या असंयमी उद्गारांनी बाजींना दुःख झालं. आपली अस्वस्थता प्रगट न करता त्यांनी सांगितलं,
‘आम्ही आपली चाकरी करत आलो. ते इमान आम्ही विसरलो नाही. आपणच आमचे धनी. पण शिवाजी आमचे राजे आहेत.’
‘तुमचे राजे?’


‘माझेच नाहीत; आपलेही!’ बाजींचा आवाज थोडा कठोर झाला.
‘ते तुमचे राजे असतील. आमचे नाहीत!’ मल्हारबा त्याच जिद्दीनं उद्गारले.
‘धनी! तुम्ही लहान आहात! तुमच्या वडिलांनी मला दिवाण नेमलं होतं. त्या वडिलकीच्या नात्यानं मी आपल्याला विचारतो. जेव्हा शिवाजी राजांनी हा गड ताब्यात घेतला, तेव्हा तुम्हांला-आम्हांला वतन काढून घेऊन बेघरदार करायला त्यांना कोणी मज्जाव केला होता? तसं केलं असतं, तर तुम्ही काय करणार होतात?’
‘काय म्हणालात?’ मल्हारबा उद्गारले.
‘येवढंच नव्हे, तर गड, मुलूख काबीज करूनही राजांनी तुम्हांला मानलं…’
‘मानलं! उपकार केलेत नाहीत!’ मल्हारबा म्हणाले, ‘आदिलशाहीला कळवलं असतं, तर?’
‘तर काय झालं असतं?’ बाजींचा संयम ढासळला, ‘आजवर आदिलशाहीतच हा गड होता ना? आपल्या पिताजींनी अनेक वेळा शिवाजींच्या विरूद्ध कागाळ्या नेल्या. पण त्या दरबारची एकही माशी जागची हलली नाही. उलट, शिवाजी राजांनी गड जिंकूनही तुमच्या ताब्यात दिला. तुमची आमची वतनं सुरक्षित केली. गड सोडताना त्यांनी आपला एकही माणूस गडावर ठेवला नाही, आणि त्याची कदर आपण ही करता?’
बाजींच्या त्या रोखठोक बोलण्यानं मल्हारबा थोडे भानावर आले होते. त्यांच लक्ष पायरीखाली बसलेल्या इसमांच्याकडं गेलं. परत त्यांचा राग जागा झाला.
‘त्यांची माणसं! पण आमची माणसं पळवली, त्याचं काय? बलुतं आम्ही देणार आणि आमची माणसं…’
‘राजे नसते, तर तुम्ही मालक बनला नसता.’ बाजींनी सांगितलं, ‘आणि या माणसांना पोसण्याची ताकद तुम्हांला राहिली नसती. गंगाधरपंत, हा काय मामला आहे?’
गंगाधरपंत हात जोडून म्हणाले,
‘हे गडाचे बारा बलुतेदार. जासलोड गडाच्या उभारणीच्या कामासाठी तिकडं गुंतले.’
‘आम्हीच सांगितलं होतं.’ बाजी म्हणाले.


‘त्यापायीच धन्यांना राग आला. ते सारे आज बलुतं मागायला आलेत.’
‘त्यांना बलुतं द्या.’ बाजींनी आज्ञा दिली.
‘हे तुम्ही सांगता?’
‘धनी, मी तुमची आज्ञा मोडत नाही. पण बलुतं दिल नाही, तर ही माणसं जगणार कशी? या माणसांचा शिवाजी राजांशी परिचय झाला आहे. शिवाजी राजे आता या भागातला माणूस ओळखतात. ती तक्रार राजांच्या कानांवर गेली, तर आपली गय केली जाणार नाही.’
‘शिवाजी राजे! शिवाजी राजे!’ देशमुख वैतागले, ‘कोण शिवाजी राजे! आम्ही चांगले ओळखतो या शिवाजी राजांना. आमच्या वडिलांचा मृत्यू आम्ही विसरणार नाही.’
‘इथंच राजांचं मोठेपण आहे! त्यांनी सारं विसरून तुम्हां-आम्हांला वतनं परत दिली. पण तुमच्या मनातली कटुता अजून सरत नाही. राजे मोहनगडावर आले होते.’
‘मोहनगड?’ देशमुखांनी विचारलं.
‘जासलोड गडाचं नाव मोहनगड! राजांनी ठेवलं आहे. राजे तुमची आठवण काढीत होते.’
देशमुख घाबरले.
‘आमची आठवण! मग तुम्ही काय सांगितलं?’
‘घाबरण्याचं कारण नाही.’ बाजी हसून म्हणाले, ‘आम्ही त्यांना सांगितलं, तुम्ही गडाच्या उभारणीत गुंतला आहात.’
‘बरं केलं.’ देशमुख म्हणाले, ‘बापाला ठेच लागली, तर मुलानं शहाणं व्हाव!’
बाजी काही क्षण काही बोलले नाहीत. नंतर ते म्हणाले,
‘धनी! राजांनी आज्ञा केली आहे — बांदलांची शिबंदी जेवढी वाढवता येईल, तेवढी वाढवा.’
‘वाढवा! आणि त्याचा खर्च कोण देणार?’
‘अर्थात राजे!’ बाजी विश्वासानं म्हणाले, ‘त्यात कसूर होणार नाही. किती केलं, तरी तो राजा आहे. आपण त्यांची प्रजा.’
‘आम्ही म्हणत नाही.’ देशमुख म्हणाले.
दोन दिवस गडावर मुक्काम करून, गडाची सर्व व्यवस्था देशमुखांना सांगून, बाजी आपल्या सिंद गावी परतले.
सौजन्य :- सर्व क्रमशः लेख ( श्री. सागर पाटील – सोशल मिडिया ) 

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: आदिलशाहीदेशमुखबलुतंबाजीबारा बलुतेदारमल्हारबामोहनगडरोहिडाशिवाजीराजं
Previous Post

हरभरा: मर रोग व्यवस्थापन

Next Post

ओळख महामंडळांची – महाराष्ट्र मत्स्योद्योग विकास महामंडळ मर्यादित

Next Post
ओळख महामंडळांची – महाराष्ट्र मत्स्योद्योग विकास महामंडळ मर्यादित

ओळख महामंडळांची – महाराष्ट्र मत्स्योद्योग विकास महामंडळ मर्यादित

ताज्या बातम्या

शाळकरी बहिणींचा शेळीच्या दुधापासून कोटीचं स्टार्टअप

शाळकरी बहिणींचा शेळीच्या दुधापासून कोटीचं स्टार्टअप !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 21, 2026
0

स्कॉटलंड

दुधाला भाव नाही, घामाचे दाम नाही: स्कॉटलंडमध्ये 20 वर्षांतील सर्वात तीव्र डेअरी संकट!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 20, 2026
0

जळगाव जिल्ह्यात केळी पिकाने बदलले शेतकऱ्यांच्या दोन पिढ्यांचे जीवनमान !

जळगाव जिल्ह्यात केळी पिकाने बदलले शेतकऱ्यांच्या दोन पिढ्यांचे जीवनमान !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 21, 2026
0

उत्तर भारतात पुन्हा कडाक्याची थंडी

उत्तर भारतात पुन्हा कडाक्याची थंडी; महाराष्ट्रात हळूहळू तापमान वाढणार – IMD

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 19, 2026
0

महाराष्ट्रात थंडीचे पुनरागम

महाराष्ट्रात थंडीचे पुनरागम: जाणून घ्या सद्यस्थिती, कारणे आणि पुढील 72 तासांचा हवामान अलर्ट

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 16, 2026
0

भाजीपाल्याची लागवड

जानेवारी-फेब्रुवारीत करा “या” पिकांची, फळ-भाजीपाल्याची लागवड अन् मिळवा रग्गड उत्पन्न!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 14, 2026
0

मोबाईलच सांगणार तुमच्या नुकसानीचा आकडा

पशुपालकांनो, आता मोबाईलच सांगणार तुमच्या नुकसानीचा आकडा! लुवास विद्यापीठाचा ‘हा’ ॲप ठरणार गेम चेंजर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 13, 2026
0

जैन हिल्स कृषी महोत्सव

जैन हिल्स कृषी महोत्सव 2025-26: जिथे तंत्रज्ञान आणि परंपरा एकत्र येऊन शेतकऱ्यांचे भविष्य घडवतात

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 11, 2026
0

महाराष्ट्र थंडीने गारठला: पाच वर्षांतील सर्वात तीव्र हिवाळा; हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा

महाराष्ट्र थंडीने गारठला: पाच वर्षांतील सर्वात तीव्र हिवाळा; हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 10, 2026
0

जानेवारी महिन्यात करावयाची महत्त्वाची शेती कामे

जानेवारी महिन्यात करावयाची महत्त्वाची शेती कामे

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 10, 2026
0

तांत्रिक

स्पायरल सेपरेटर

मळणीनंतर सोयाबीन व तूर साफसफाईसाठी- स्पायरल सेपरेटर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 22, 2025
0

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

जगाच्या पाठीवर

शाळकरी बहिणींचा शेळीच्या दुधापासून कोटीचं स्टार्टअप

शाळकरी बहिणींचा शेळीच्या दुधापासून कोटीचं स्टार्टअप !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 21, 2026
0

स्कॉटलंड

दुधाला भाव नाही, घामाचे दाम नाही: स्कॉटलंडमध्ये 20 वर्षांतील सर्वात तीव्र डेअरी संकट!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 20, 2026
0

जळगाव जिल्ह्यात केळी पिकाने बदलले शेतकऱ्यांच्या दोन पिढ्यांचे जीवनमान !

जळगाव जिल्ह्यात केळी पिकाने बदलले शेतकऱ्यांच्या दोन पिढ्यांचे जीवनमान !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 21, 2026
0

उत्तर भारतात पुन्हा कडाक्याची थंडी

उत्तर भारतात पुन्हा कडाक्याची थंडी; महाराष्ट्रात हळूहळू तापमान वाढणार – IMD

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 19, 2026
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.

EnglishEnglish