• Home
    • आमच्याविषयी
AgroWorld
Advertisement
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

द्राक्ष शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून घेतले निर्यातक्षम उत्पादन

नवनाथ गाढवे यांचा सर्वोत्तमाचा ध्यास

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 9, 2025
in यशोगाथा
0
द्राक्ष शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून घेतले निर्यातक्षम उत्पादन
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

ज्ञानेश उगले, नाशिक
महाराष्ट्रातील शेतकरी बांधव आता शेतीमध्ये नाविन्यपूर्ण असा प्रयोग राबवत आहेत. विशेषता पीक पद्धतीत मोठा बदल केला जात आहे. नगदी तसेच फळबाग वर्गीय पिकांची मोठ्या प्रमाणात शेती केली जाऊ लागली आहे. अशातच एका तरुण शेतकऱ्याने द्राक्ष शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून निर्यातक्षम उत्पादन घेतले आहे. चला तर जाणून घेऊया त्यांची प्रेरणादायी यशोगाथा.

 

 

शेती समोर आव्हाने नेहमीच आहे, शेतकरी म्हणून आपण सतत सावध असले पाहिजे. काटेकोर शिस्तीची सवय असेल आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर असेल तरच शेतीत टिकून राहणे आणि प्रगती करणे शक्य आहे. असे नवनाथ गाढवे सांगतात. त्यांचे शेतीतील प्रयोग ही त्यांच्या वरील उक्तीची साक्ष देतात. नाशिक ते पेठ महामार्गालगत प्रसिद्ध रामशेज, देहरगड या ऐतिहासिक किल्ल्यांच्या जवळ रासेगाव वसलेले आहे. रासेगाव फाट्यावरुन कच्च्या सडकेने ३ – ४ किमी अंतर पार केल्यावर गाढवे वस्ती लागते. याच ठिकाणी नवनाथ वाळू गाढवे या तरुण शेतकऱ्याची द्राक्षशेती नजरेत भरते.

 

 

नवनाथ यांच्या रासेगाव परिसरातील वातावरण, जमीन आदी स्थिती पाहता द्राक्षशेती करणे हेच मोठे आव्हान होते. द्राक्षांतील जुने वाण हे तर सगळ्यात मोठे आव्हान होते. दरवर्षी पक्वतेच्या अवस्थेत पाऊस, थंडी यामुळे मणी क्रॅकींग, गळकूज, घड जिरणे या समस्या नेहमीच्याच होत्या. वर्षाच्या शेवटी कमी उत्पादन आणि वाढीव खर्च या दुष्टचक्रात शेती सापडली होती. अशा स्थितीत हार मानून थांबणे हा नवनाथ यांचा स्वभाव नव्हता. एक दिवस ते मामांच्या द्राक्षबागेत पाहणी करीत फिरत असतांना त्यांना काही ठिकाणी रोगग्रस्त पाने व घड आढळून आले. ते त्यांनी मामांच्या निदर्शनास आणून दिले. त्यावर मामा उत्तर दिले की, हा सर्व बाग निर्यातीसाठी असून निर्यातक्षम द्राक्षांचे उत्पादन घेतांना किडनाशकांचा वापर अत्यंत मर्यादित करावा लागतो. म्हणून कीडरोग नियंत्रण ही बाब अवघड बनते. दरवर्षी निर्यातक्षम उत्पादन घेणाऱ्या मामांना द्राक्ष शेतीतून तुलनेने चांगले उत्पन्न मिळत होते. नवनाथ यांनी त्यांच्यापासून प्रेरणा घेत निर्यातक्षम उत्पादन घ्यायचे ठरविले.

सर्वोत्तमाचा ध्यास
वर्ष २०१६ च्या हंगामाच्या वेळी नवनाथ ‘सह्याद्री फार्म्स’च्या संपर्कात आले. द्राक्षतज्ज्ञ मंगेश भास्कर, सचिन वाळुंज, प्रवीण ठाकरे यांचे तांत्रिक मार्गदर्शन त्यांना मिळू लागले. ‘सह्याद्री फार्म्स’ मध्ये येणाऱ्या चिली, द. अफ्रिका येथील जागतिक शास्त्रज्ञांचे मार्गदर्शनही मिळत होते. याचा लाभ अर्थातच द्राक्ष उत्पादन व्यवस्थापनासाठी होत होता. याच काळात ‘सह्याद्री फार्म्स’ने भारतात प्रथमच आयात केलेल्या पेटंट द्राक्षवाणांविषयी त्यांना माहिती मिळाली. द्राक्ष शेती पुढील नैसर्गिक आव्हानांमुळे हतबल झालेल्या नवनाथ यांना या नव्या वाणांच्या रुपाने एक आशेचा किरण सापडला.

नव्या वाणांचे धाडस
द्राक्षाच्या नव्या पेटंट वाणांच्या लागवडीसाठी लागवड अंतरात बदल करण्याची एक अट होती. जुन्या स्वरुपाच्या द्राक्षबागेतील अंतरात एकदम बदल करणे ही बाब अवघड होती. मात्र नवनाथ यांनी हे धाडस करायचे ठरविले. जुनी द्राक्षबाग काढून तिथे नव्याने नव्या वाणांची लागवड करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्यावर वर्षभर सर्व बाजूंनी मेहनत घेतली. वर्ष २०२२ मध्ये त्यांच्या या प्रयत्नांना फळ आले. नव्या आरा- १५ वाणाचा बहर सर्वांना आकर्षित करणारा ठरला. त्यांच्या दीड एकराच्या द्राक्षबागेतील ९९ टक्के फळ हे निर्यातीसाठी निवडले गेले व त्यावर्षीचा उच्चांकी दर त्यांना मिळाला. ही घटना त्यांचा हुरुप वाढविणारी होती. त्यानंतरच्या दुसऱ्या वर्षीही त्यांनी उत्तम व्यवस्थापन करीत उत्पादकता, गुणवत्ता यात सातत्य मिळविले. २०२३-२४ च्या हंगामात गुणवत्तापूर्ण उत्पादन घेतल्याबद्दल त्यांना सह्याद्री फार्म्स कडून ‘सह्याद्री फार्मर ऑफ द ईयर‘ या मानपत्र व रोख १ लाख रुपयांच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. नवनाथ यांनी जुन्या पारंपारिक वाणांना बदलून पूर्ण नव्या वाणांकडे वळविण्याचा निर्णय घेतला आहे. आरा- १५ या वाणाच्या यशस्वी उत्पादनानंतर त्यांनी मागील वर्षी २०२३ मध्ये एआरडी ३५ व एआरडी ३६ या नवीन पेटंटेड रंगीत द्राक्ष वाणांची लागवड केली आहे.

 

 

उत्तम व्यवस्थापन
पाणी, अन्नद्रव्य, कॅनोपी व किडरोग व्यवस्थापन ही कुठल्याही फळपिक व्यवस्थापनातील महत्वाची अंगे आहेत. या सर्व बाजू महत्वाच्या आहेत. किंबहुना यातील एकही बाजू चुकली तरी आपले शंभर टक्के नुकसान होऊ शकते असे नवनाथ सांगतात. ‘द्राक्षशेतीत १०० पैकी १०० गुण मिळविण्याचा ध्यासच महत्वाचा आहे. इथल्या परिक्षेच्या प्रश्नपत्रिकेत एकही प्रश्न ‘ऑप्शन’ला टाकता येत नाही. ‘‘द्राक्षशेतीत बरीच वर्षे आव्हानात्मक स्थितीतून गेल्यानंतर मागील ३-४ वर्षांनी काही प्रमाणात यश दिले आहे. त्यामुळे नवनाथ यांचा हुरुप वाढला आहे.

संपर्क :-
नवनाथ वाळू गाढवे
रासेगाव, जि. नाशिक.,
मो. – 7588015784

 

 

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇

  • वन्य प्राण्यांमुळे पिकांची नासाडी होतेय ; मग हा प्रभावी जुगाड बघाच !
  • शेतीला पूरक व्यवसायाची जोड देऊन केली आर्थिक प्रगती

Share this:

  • Facebook
  • X
Tags: आधुनिक तंत्रज्ञानद्राक्ष शेती
Previous Post

उत्तर प्रदेशातील “लेमन मॅन” ; आनंद मिश्रा यांची यशस्वी कथा

Next Post

शेतकऱ्याची कमाल ! 45 डिग्री तापमानात फुलविली सफरचंदाची बाग

Next Post
45 डिग्री तापमानात फुलविली सफरचंदाची बाग

शेतकऱ्याची कमाल ! 45 डिग्री तापमानात फुलविली सफरचंदाची बाग

ताज्या बातम्या

देशातील पहिले आंतरराष्ट्रीय कृषी हॅकेथॉन

पुण्यात देशातील पहिले आंतरराष्ट्रीय कृषी हॅकेथॉन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 31, 2025
0

या फळाच्या लागवडीतून एकरी लाखोंचा नफा !

या फळाच्या लागवडीतून एकरी लाखोंचा नफा !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 30, 2025
0

या जिल्ह्यांना आज मुसळधार पावसाचा इशारा

या जिल्ह्यांना आज मुसळधार पावसाचा इशारा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 28, 2025
0

मान्सून मुंबईत दाखल ! पुढील तीन दिवसात हवामान कसे असेल..??

मान्सून मुंबईत दाखल ! पुढील तीन दिवसात हवामान कसे असेल..??

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 26, 2025
0

फळ, भाजीपाल्यातून 10 लाखांचा नफा !

फळ, भाजीपाल्यातून 10 लाखांचा नफा !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 23, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ

मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 19, 2025
0

मान्सून कोकणात धडकणार या तारखेला… !

मान्सून कोकणात धडकणार या तारखेला… !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 16, 2025
0

केळी लागवडीचे यशस्वी रहस्य

🌱 “केळी लागवडीचे यशस्वी रहस्य – रेवा फ्लोरा टिशू कल्चर !” 🍌

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 14, 2025
0

मान्सून अंदमानात

मान्सून अंदमानात… पुढील प्रवास कसा असणार ?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 14, 2025
0

तांत्रिक

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

हळद साठवणूक

हळद साठवणूक प्रक्रिया

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 26, 2025
0

जगाच्या पाठीवर

देशातील पहिले आंतरराष्ट्रीय कृषी हॅकेथॉन

पुण्यात देशातील पहिले आंतरराष्ट्रीय कृषी हॅकेथॉन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 31, 2025
0

या फळाच्या लागवडीतून एकरी लाखोंचा नफा !

या फळाच्या लागवडीतून एकरी लाखोंचा नफा !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 30, 2025
0

या जिल्ह्यांना आज मुसळधार पावसाचा इशारा

या जिल्ह्यांना आज मुसळधार पावसाचा इशारा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 28, 2025
0

मान्सून मुंबईत दाखल ! पुढील तीन दिवसात हवामान कसे असेल..??

मान्सून मुंबईत दाखल ! पुढील तीन दिवसात हवामान कसे असेल..??

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 26, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Home

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.