प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (PM KISAN):

– या योजनेत, केंद्र सरकार लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये आर्थिक मदत करते. ही मदत तीन हप्त्यांमध्ये दिली जाते.

प्रधानमंत्री फसल विमा योजना (PMFBY):

– या योजनेत, शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती किंवा हवामानामुळे होणाऱ्या नुकसानीपासून संरक्षण मिळते. या योजनेच्या माध्यमातून, शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळते, जी त्यांच्या पिकांच्या नुकसानीच्या भरपाईसाठी वापरली जाते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना:

या योजनेत, शेतकऱ्यांना सिंचन सुविधा, शेततळे, यंत्रसामग्री आणि बांधकामाला मदत करण्यासाठी अनुदान दिले जाते.

प्रधानमंत्री धन-धान्य कृषी योजना:

या योजनेचा उद्देश कृषी क्षेत्रातील पायाभूत सुविधा विकसित करणे आणि शेतकऱ्यांच्या उत्पादनामध्ये वाढ करणे आहे. तसेच शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते.

राष्ट्रीय कृषी बाजार (eNAM):

eNAM हा एक ऑनलाइन प्लॅटफॉर्म आहे. जिथे शेतकरी त्यांच्या उत्पादनांची विक्री करू शकतात.

गट शेती योजना:

या योजनेत, शेतकऱ्यांच्या गटांना एकत्रितपणे शेती करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. ज्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणात उत्पादन मिळवण्यास मदत होते.

महाराष्ट्र सौर पंप योजना:

या योजनेत शेतकऱ्यांना सौर पंप खरेदी करण्यासाठी अनुदान दिले जाते.

Thick Brush Stroke

लिंबू बागेचे ऊन्हापासून संरक्षण