मल्चिंग पेपर अंथरल्यानंतर कमीत कमी त्याला दोन दिवस होल पाडायचे नाही. मल्चिंग पेपर अंथरल्यानंतर ऊन हे मल्चिंगवर पडते व त्याला होल नसल्यामुळे मल्चिंग खाली उष्णता तयार होते व तशीच उष्णता ही खाली जमिनीत तयार होते आणि ती उष्णता तयार झाल्यामुळे जमिनीत असलेले घातक बुरशी पूर्णपणे मरण पावण्याची संभावना आहे. तिथे आपण रासायनिक कोणतेही कीटकनाशक किंवा बुरशीनाशक वापरला तरी ते प्रभावी होणार नाही तितकं प्रभावी हे आहे.
मल्चिंगला होल पाडण्या अगोदर 15 ते 20 मिनिट ठिबक सिंचनने पाणी द्यावे. त्यावेळी पाणी आणि हवा या दोघांमध्ये जो काही संघर्ष होतो त्यातून परत मोठ्या प्रमाणात उष्णता तयार होते आणि पूर्ण बेड निर्जंतुक होऊन जातो. ही पूर्ण प्रक्रिया आपल्याला एक दिवस ठेवायचे आहे आणि चौथ्या दिवशी मल्चिंगला सायंकाळी होल पाडावे. होल पाडून झाल्यानंतर 15 ते 20 मिनिटे पाणी द्यायचे कारण सगळी गरम हवा बाहेर निघून जाईल. सायंकाळी होल पडल्यानंतर पूर्ण दिवस थांबावे आणि दुसऱ्या दिवशी सायंकाळी रोप लागवड करावी.