कमी पावसाच्या पार्श्वभूमीवर काटेकोर नियोजन करा

राज्यात आतापर्यंत सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. ऑगस्टमध्ये फक्त 38 टक्के पाऊस झाला. कमी पावसाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ते नियोजन काटेकोरपणे करण्यात यावे, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शासकीय यंत्रणेला दिले.